धर्मांतराविरुद्ध सर्व देशवासियांनी एकत्र येणं गरजेचं - अमित शाह

शीख पंथाच्या दहा गुरूंनी अशी परंपरा निर्माण केली आहे, जी केवळ भारतासाठीच नव्हे तर संपूर्ण जगासाठी अनुकरणीय आहे. त्यामुळे शीखांच्या गुरूंच्या जीवनातून प्रेरणा घेऊन धर्मांतराच्या विरोधात सर्व देशवासीयांनी एकजूट व्हायला हवे असे गृहमंत्री अमित शाह यांनी सांगितले.


नवी मुंबई येथे गुरु श्री तेगबहादूर जी यांच्या ३५० व्या शहीदी दिवस समागम समारंभात गुरु साहेबांच्या स्मृतीस अभिवादन करून उपस्थितांशी अमित शाह यांनी संवाद साधला. यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.



काय म्हणाले अमित शाह ?


आपल्या संबोधनात केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय स्तरावर श्री गुरु तेगबहादूर साहिब जी यांचा ३५० वा शहीदी दिवस साजरा करण्याचा निर्णय घेतला, जो संपूर्ण भारतासाठी भाग्याचा विषय आहे. ते म्हणाले की, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संपूर्ण महाराष्ट्रात गुरु तेगबहादूर यांचे जीवनकार्य तरुणांपर्यंत पोहोचवण्यासाठी विशेष कार्यक्रम आयोजित केले. जर नववे गुरु तेगबहादूर यांनी हिंदू धर्म आणि हिंदूंच्या रक्षणासाठी बलिदान दिले नसते, तर संपूर्ण जगात एकही हिंदू उरला नसता. संपूर्ण भारत आणि जगभरातील सनातन धर्माचे अनुयायी गुरु तेगबहादूर यांनी हिंदू धर्म वाचवण्यासाठी यातना सहन करत आपले बलिदान दिले.





अमित शाह पुढे म्हणाले की, शीख परंपरेचा मूळ आधार एकता, बंधुत्व, सर्वसमावेशकता आणि वीरता हा राहिला आहे आणि गुरु ग्रंथ साहिबमध्ये याच तत्वांचा समावेश करण्यात आला आहे. संत नामदेव, नरसी मेहता, कबीर, संत रविदास यांसारख्या अनेक प्रसिद्ध संतांच्या पदांना गुरु ग्रंथ साहिबमध्ये स्थान देण्याचे काम दशम पित्याने केले आहे. त्यांनी असेही नमूद केले की, महाराष्ट्र सरकारने अनेक समाजांना गुरु तेगबहादूर जी यांच्या विचारांशी जोडण्याचे काम केले आहे.


Comments
Add Comment

Shani Shingnapur : शनी शिंगणापुरात 24 तास दर्शन सुरू, पण कधीपर्यंत ? जाणून घ्या

शनीभक्तांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. शनी शिंगणापूर येथील शनि मंदिर आता 19 मे पर्यंत तब्बल 24 तास दर्शनासाठी खुले

Tamil Nadu : विजय यांचा पहिला ‘यू-टर्न’, विरोधकांच्या टीकेनंतर 'त्या' व्यक्तीची नियुक्ती रद्द

Tamil Nadu : तमिळनाडूच्या राजकारणात मुख्यमंत्री जोसेफ विजय यांनी घेतलेला एक मोठा निर्णय कालपासून चर्चेत राहिला. त्या

Supreme Court : ....तो अॅट्रॉसिटीचा गुन्हा ठरणार नाही, सर्वोच्च न्यायालयाने महत्वाचा निर्णय

Supreme Court : जातीय शिवीगाळ प्रकरणांमध्ये अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याची नेमकी मर्यादा काय आहे,

Prateek Yadav Death : अखिलेश यादव यांचे बंधू प्रतीक यादव यांचे संशयास्पद निधन; लखनौमध्ये खळबळ

लखनौ : उत्तरप्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिवंगत मुलायम सिंह यादव यांचे धाकटे चिरंजीव आणि भाजप नेत्या अपर्णा यादव

Gold Silver Price Hike : एका झटक्यात बदलले सोन्या-चांदीचे भाव; केंद्र सरकारचा रात्रीत मोठा निर्णय; ग्राहकांच्या खिशाला कात्री

नवी दिल्ली : जर तुम्ही येत्या काही दिवसांत लग्नसराईसाठी दागिने खरेदी करण्याचा किंवा गुंतवणुकीसाठी सोने-चांदी

Monsoon Update : आनंदाची बातमी, अंदमानात 'मान्सून'साठी पोषक वातावरण; कोकणात ६ जूनला आगमनाचा अंदाज

नवी दिल्ली : राज्यात एकीकडे कडाक्याचे ऊन आणि उष्णतेची लाट असतानाच, दुसरीकडे मान्सूनच्या आगमनाबाबत दिलासादायक