Mumbai Airport: परदेशी प्रवास ठप्प; मुंबई विमानतळावरील १२५ विमानांची उड्डाणं रद्द

मुंबई: मध्यपूर्वेतील इस्राईल, अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्धजन्य संघर्षाचा मोठा फटका मुंबईतील आंतरराष्ट्रीय हवाई वाहतुकीला बसला आहे. रविवारी (१ मार्च) दुपारी अडीच वाजेपर्यंत मुंबई विमानतळावरून सुटणारी तब्बल १२५ उड्डाणे रद्द करण्यात आली. यामुळे शेकडो विद्यार्थी, पर्यटक आणि खेळाडू विमानतळावर अडकून पडले असून प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत.



आखाती देशांचे हवाई क्षेत्र बंद



अमेरिका आणि इस्राईलने इराणवर संयुक्त लष्करी कारवाई केल्यानंतर सुरक्षिततेच्या कारणास्तव अनेक आखाती देशांनी आपले हवाई क्षेत्र (Airspace) तात्पुरते बंद केले आहे. परिणामी, युरोप आणि अमेरिकेकडे जाणारी विमाने लांबणीवर पडली आहेत किंवा रद्द करण्यात आली आहेत.



कोणत्या सेवांवर परिणाम?



एअर इंडिया: मुंबईहून लंडन, न्यूयॉर्क, शिकागो, टोरंटो, फ्रँकफर्ट आणि पॅरिसला जाणारी रविवार आणि सोमवारची सर्व उड्डाणे रद्द झाली आहेत. दिल्लीहून तेल अवीवला जाणारे विमानही सुरक्षिततेसाठी अर्ध्यातून पुन्हा मुंबईला वळवण्यात आले.


इंडिगो: इंडिगोनेही पश्चिम आशियातील आपली उड्डाणे रद्द केली असून मुंबई-लंडन सेवा विस्कळीत झाली आहे.



प्रवाशांमध्ये संतापाचे वातावरण



विमान वाहतूक अचानक कोलमडल्याने प्रवाशांमध्ये संतापाचे वातावरण आहे. अनेक विमान कंपन्या प्रवाशांना तिकिटाचा परतावा किंवा पर्यायी मार्गांचे आश्वासन देत आहेत. पण, हा युद्धजन्य संघर्ष अधिक लांबल्यास आंतरराष्ट्रीय विमान तिकीट दरात मोठी वाढ होण्याची आणि हवाई वाहतूक दीर्घकाळ विस्कळीत राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Comments
Add Comment

NTA : पेपरफुटीवर केंद्राचा 'मास्टरप्लॅन'! NTA साठी 'सुपर 6' समितीची नियुक्ती

पेपर लीकवर केंद्राचा मोठा प्रहार! दोषींना १० वर्षांपर्यंत तुरुंगवास, ₹१० कोटींपर्यंत दंड; संसदेत सोमवारी

PM Narendra Modi : 'युवकांना स्वावलंबी बनवणे हे सरकारचे ध्येय'

नवी दिल्ली: 'विकसित वायब्रंट व्हिलेज कार्यक्रम २०२६' च्या सहभागींसोबत रविवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे

Amit Shah : युवा पिढी आणि विद्यार्थी आमच्यासाठी महत्वाचे : अमित शाह

धर्मेंद्र प्रधान यांनी केलेल्या कामाचंही कौतुक नवी दिल्ली : भाजप कार्यकर्त्यांसाठी पदापेक्षा देश खूप जास्त

Karnataka Politics : '२०२८ ची कर्नाटक विधानसभा निवडणूक लढवणार नाही': माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या

बंगळुरु : कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी निवडणूक राजकारणातून निवृत्तीची घोषणा केली आहे.

Assam Factory Blast : आसाममधील रॉड मॅन्युफॅक्चरिंग कारखान्यात भीषण स्फोट; ४ कामगारांचा मृत्यू

दिसपुर : आसाममधील कछार जिल्ह्यात रविवारी सकाळी रॉड उत्पादन करणाऱ्या एका कारखान्यात भीषण स्फोट होऊन किमान चार

Viral Love Story : NEET आंदोलनात गेले अन् जुळली रेशीमगाठ; जंतर-मंतरवर घडली अनोखी प्रेमकहाणी

Viral Love Story : दिल्लीतील जंतर-मंतरवर झालेले नीट परीक्षा गैरप्रकाराविरोधातील आंदोलन देशभर चर्चेत