Mumbai Airport: परदेशी प्रवास ठप्प; मुंबई विमानतळावरील १२५ विमानांची उड्डाणं रद्द

मुंबई: मध्यपूर्वेतील इस्राईल, अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्धजन्य संघर्षाचा मोठा फटका मुंबईतील आंतरराष्ट्रीय हवाई वाहतुकीला बसला आहे. रविवारी (१ मार्च) दुपारी अडीच वाजेपर्यंत मुंबई विमानतळावरून सुटणारी तब्बल १२५ उड्डाणे रद्द करण्यात आली. यामुळे शेकडो विद्यार्थी, पर्यटक आणि खेळाडू विमानतळावर अडकून पडले असून प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत.



आखाती देशांचे हवाई क्षेत्र बंद



अमेरिका आणि इस्राईलने इराणवर संयुक्त लष्करी कारवाई केल्यानंतर सुरक्षिततेच्या कारणास्तव अनेक आखाती देशांनी आपले हवाई क्षेत्र (Airspace) तात्पुरते बंद केले आहे. परिणामी, युरोप आणि अमेरिकेकडे जाणारी विमाने लांबणीवर पडली आहेत किंवा रद्द करण्यात आली आहेत.



कोणत्या सेवांवर परिणाम?



एअर इंडिया: मुंबईहून लंडन, न्यूयॉर्क, शिकागो, टोरंटो, फ्रँकफर्ट आणि पॅरिसला जाणारी रविवार आणि सोमवारची सर्व उड्डाणे रद्द झाली आहेत. दिल्लीहून तेल अवीवला जाणारे विमानही सुरक्षिततेसाठी अर्ध्यातून पुन्हा मुंबईला वळवण्यात आले.


इंडिगो: इंडिगोनेही पश्चिम आशियातील आपली उड्डाणे रद्द केली असून मुंबई-लंडन सेवा विस्कळीत झाली आहे.



प्रवाशांमध्ये संतापाचे वातावरण



विमान वाहतूक अचानक कोलमडल्याने प्रवाशांमध्ये संतापाचे वातावरण आहे. अनेक विमान कंपन्या प्रवाशांना तिकिटाचा परतावा किंवा पर्यायी मार्गांचे आश्वासन देत आहेत. पण, हा युद्धजन्य संघर्ष अधिक लांबल्यास आंतरराष्ट्रीय विमान तिकीट दरात मोठी वाढ होण्याची आणि हवाई वाहतूक दीर्घकाळ विस्कळीत राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Comments
Add Comment

Divyastra Mk-3 : भारताची आकाशात आणखी एक झेप! ‘दिव्यास्त्र Mk-3’चे यशस्वी उड्डाण; स्वदेशी जेट ड्रोनची ताकद जगासमोर

Divyastra Mk-3 : भारताच्या स्वदेशी संरक्षण तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात आणखी एक महत्त्वाची भर पडली आहे. भारतात विकसित

Air India Express : एअर इंडिया एक्सप्रेसच्या प्रवाशाने केला विमानतळावर गोळीबार; २ जण जखमी

वाराणसी : रविवार १६ ऑगस्ट रोजी सकाळी लाल बहादूर शास्त्री आंतरराष्ट्रीय विमानतळावर शस्त्र तपासणीदरम्यान एका

Weather Alert India : देशातील 12 राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा; नेमका कुठे आणि कसा पाऊस पडणार? जाणून घ्या

नवी दिल्ली : बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या हवामान प्रणालीमुळे देशातील अनेक भागांत मान्सून सक्रिय झाला

Arunachal Pradesh : अरुणाचल प्रदेशला पुराचा तडाखा; पाच सैनिक वाहून गेले तर चार नागरिकांचा मृत्यू

नवी दिल्ली : मुसळधार पावसामुळे अरुणाचल प्रदेशला पावसाचा जबर तडाखा बसला आहे. दिबांग व्हॅली जिल्ह्यात अचानक

PM Modi Speech : एका वर्षात एक कोटी युवकांना कृत्रिम बुद्धिमत्तेचे कौशल्य प्रशिक्षण देण्याची पंतप्रधानांची घोषणा

नवी दिल्ली : देशाच्या ८० व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र

Narendra Modi : 'सेमीकंडक्टरपासून अणुऊर्जेपर्यंत...'; जाणून घ्या पंतप्रधान मोदींच्या भाषणातील प्रमुख मुद्दे

नवी दिल्ली : भारताच्या ८०व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून देशाला