बीड विनयभंग प्रकरण: आरोपी विजय पवारवर आणखी गंभीर आरोप; एसआयटी चौकशीचे आदेश

  83

बीड : बीड जिल्ह्यातील अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणाने आता आणखी गंभीर वळण घेतले आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी विजय पवार याच्यावर आणखी एका पीडितेच्या पालकांनी गंभीर आरोप केले आहेत. दोन वर्षांपूर्वीही विजय पवारने आपल्या मुलीचा छळ केल्याचे या पालकांचे म्हणणे आहे. या वाढत्या आरोप-प्रत्यारोपांनंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची एसआयटी (Special Investigation Team) चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

विजय पवारवर "बॅड टच" आणि छळाचे आरोप

नवीन आरोपानुसार, विजय पवार हा आपल्या मुलीला केबिनमध्ये बोलावून 'बॅड टच' करायचा, असा दावा पीडितेच्या पालकांनी केला आहे. विजय पवार संचालक असलेल्या एका शाळेत दोन वर्षांपूर्वी अशाच प्रकारे एका विद्यार्थिनीला शाळेत झालेल्या वादामुळे त्रास दिला गेला होता. त्यावेळीही मुलीला शाळेबाहेर उभे करणे किंवा केबिनमध्ये बोलावून छेडछाड करणे असे प्रकार घडले होते. या पालकांनी गेल्या दोन वर्षांपासून यावर कारवाईसाठी पाठपुरावा केला होता, परंतु अद्याप कोणतीही कारवाई झाली नव्हती. आता पोलीस अधीक्षकांनी केलेल्या आवाहनानंतर हे पालक समोर आले असून त्यांनी आपली तक्रार दाखल केली आहे. आता पोलीस अधीक्षक या तक्रारीची चौकशी करणार आहेत.

नेमके काय आहे प्रकरण?

बीडमधील नामांकित उमाकिरण शैक्षणिक संकुलातील एका खासगी क्लासेसमध्ये जुलै २०२४ ते २५ मे २०२५ या कालावधीत एका अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग झाल्याची तक्रार २६ जून २०२५ रोजी शिवाजीनगर पोलिसांत दाखल झाली होती. याच दिवशी पोक्सो कायद्यांतर्गत (POCSO Act) गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणात आरोपी प्रशांत खाटोकर आणि विजय पवार हे दोघे फरार झाले होते. २८ जून रोजी स्थानिक गुन्हे शाखेने विजय पवारला लिंबागणेश परिसरातून, तर प्रशांत खाटोकरला चौसाळा बायपासवरून ताब्यात घेतले. २९ जून रोजी या दोघांनाही बीड जिल्हा न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

धनंजय मुंडेंनी केले गंभीर आरोप
या प्रकरणानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा आमदार धनंजय मुंडे यांनी पीडित कुटुंबाची भेट घेतली. त्यानंतर पत्रकार परिषद घेऊन त्यांनी स्थानिक आमदार संदीप क्षीरसागर यांच्यावर गंभीर आरोप केले. गुन्हा दाखल झाला त्या दिवशी रात्री ११ वाजता संदीप क्षीरसागर आरोपींसोबत होते आणि आरोपींना त्यांचे पाठबळ आहे, असे मुंडे यांनी म्हटले. संदीप क्षीरसागर आणि आरोपींचे संबंध समोर यावेत यासाठी सखोल चौकशीची मागणीही त्यांनी केली आहे.
Comments
Add Comment

साई बाबांचा प्रसाद महागला! दरवाढीमुळे जनसामान्यांमध्ये नाराजी

अहिल्यानगर: शिर्डीच्या साईबाबांच्या दर्शनाला दररोज लाखों भाविक शिर्डीत येतात. साईबाबांचे दर्शन घेऊन घरी

अजित पवारांच्या जिल्ह्यातच लाडकी बहीण योजनेचे सर्वाधिक बोगस लाभार्थी

राज्य सरकारची 'मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण' योजनेचा गैरफायदा घेतलेल्या बोगस लाभार्त्यांच्या संख्येत वाढ

चिपळूण पिंपळी येथे कोसळलेल्या पुलाची मंत्री उदय सामंत करणार पाहणी

शनिवारी रात्री चिपळूण तालुक्यात पूल दुर्घटना घडली. चिपळूण तालुक्यातील खडपोली एमआयडीसीकडे जाणारा महत्वाचा पूल

कल्याणमध्ये भीषण अपघात: ट्रकने दुचाकीस्वार महिलेला चिरडले, जागीच मृत्यू

ठाणे: कल्याण पश्चिम येथील निक्कीनगर परिसरात एका दुचाकीस्वार महिलेचा भीषण अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. आपल्या

बैलपोळाच्या दिवशी नदीमध्ये वाहून गेलेल्या युवकाचा मृतदेह गवसला

अकोला: मूर्तिजापूर तालुक्यातील एक युवक बैलपोळा सणाच्या दिवशी बैलांना धुण्यासाठी पेढी नदीवर गेला असता, अचानक पाय

छत्रपती संभाजीनगरला २४x७ शाश्वत पाणीपुरवठ्याचा मार्ग मोकळा; २६ द.ल.ली. जलशुद्धीकरण केंद्राचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर शहर पाणीपुरवठा योजनेच्या माध्यमातून पुढील २५-३० वर्षे शहराच्या अपेक्षित