बीड विनयभंग प्रकरण: आरोपी विजय पवारवर आणखी गंभीर आरोप; एसआयटी चौकशीचे आदेश

बीड : बीड जिल्ह्यातील अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणाने आता आणखी गंभीर वळण घेतले आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी विजय पवार याच्यावर आणखी एका पीडितेच्या पालकांनी गंभीर आरोप केले आहेत. दोन वर्षांपूर्वीही विजय पवारने आपल्या मुलीचा छळ केल्याचे या पालकांचे म्हणणे आहे. या वाढत्या आरोप-प्रत्यारोपांनंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची एसआयटी (Special Investigation Team) चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

विजय पवारवर "बॅड टच" आणि छळाचे आरोप

नवीन आरोपानुसार, विजय पवार हा आपल्या मुलीला केबिनमध्ये बोलावून 'बॅड टच' करायचा, असा दावा पीडितेच्या पालकांनी केला आहे. विजय पवार संचालक असलेल्या एका शाळेत दोन वर्षांपूर्वी अशाच प्रकारे एका विद्यार्थिनीला शाळेत झालेल्या वादामुळे त्रास दिला गेला होता. त्यावेळीही मुलीला शाळेबाहेर उभे करणे किंवा केबिनमध्ये बोलावून छेडछाड करणे असे प्रकार घडले होते. या पालकांनी गेल्या दोन वर्षांपासून यावर कारवाईसाठी पाठपुरावा केला होता, परंतु अद्याप कोणतीही कारवाई झाली नव्हती. आता पोलीस अधीक्षकांनी केलेल्या आवाहनानंतर हे पालक समोर आले असून त्यांनी आपली तक्रार दाखल केली आहे. आता पोलीस अधीक्षक या तक्रारीची चौकशी करणार आहेत.

नेमके काय आहे प्रकरण?

बीडमधील नामांकित उमाकिरण शैक्षणिक संकुलातील एका खासगी क्लासेसमध्ये जुलै २०२४ ते २५ मे २०२५ या कालावधीत एका अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग झाल्याची तक्रार २६ जून २०२५ रोजी शिवाजीनगर पोलिसांत दाखल झाली होती. याच दिवशी पोक्सो कायद्यांतर्गत (POCSO Act) गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणात आरोपी प्रशांत खाटोकर आणि विजय पवार हे दोघे फरार झाले होते. २८ जून रोजी स्थानिक गुन्हे शाखेने विजय पवारला लिंबागणेश परिसरातून, तर प्रशांत खाटोकरला चौसाळा बायपासवरून ताब्यात घेतले. २९ जून रोजी या दोघांनाही बीड जिल्हा न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

धनंजय मुंडेंनी केले गंभीर आरोप
या प्रकरणानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा आमदार धनंजय मुंडे यांनी पीडित कुटुंबाची भेट घेतली. त्यानंतर पत्रकार परिषद घेऊन त्यांनी स्थानिक आमदार संदीप क्षीरसागर यांच्यावर गंभीर आरोप केले. गुन्हा दाखल झाला त्या दिवशी रात्री ११ वाजता संदीप क्षीरसागर आरोपींसोबत होते आणि आरोपींना त्यांचे पाठबळ आहे, असे मुंडे यांनी म्हटले. संदीप क्षीरसागर आणि आरोपींचे संबंध समोर यावेत यासाठी सखोल चौकशीची मागणीही त्यांनी केली आहे.
Comments
Add Comment

वैमानिकाच्या सतर्कतेमुळे मोठे संकट टळले! नागपूरहून उड्डाण केलेल्या विमानाला धडकला पक्षी...

नागपूर: नागपूरहून दिल्लीला निघालेल्या एअर इंडियाच्या विमानावरील मोठे संकट टळले. विमानाने उड्डाण करताच

राज्यातील बांगलादेशी घुसखोरांना दणका! राज्य सरकारचे मोठे पाऊल, रेशनकार्ड पडताळणीचे आदेश

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात बांगलादेशी नागरिकांची घुसखोरी वाढत चालली आहे. याकरता राज्यभरात

‘एमयुएचएस’ च्‍या कुलगुरूपदी डॉ. अजय चंदनवाले

नाशिक : राज्‍य शासनाने वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाचे संचालक डॉ. अजय चंदनवाले यांची नियुक्‍ती ‘महाराष्‍ट्र

“मोदी मिशन हे पुस्तक पुढच्या पिढीला प्रेरणा देणारं”, 'मोदीज् मिशन' मधील काही भाग पाठ्यपुस्तकात समाविष्ट करावा; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सूचना

मुंबई :“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित ‘मोदीज् मिशन’ हे पुस्तक प्रत्येकाने वाचावे आणि संग्रहित

मुंबईनजिक बांधणार देशातील सर्वाधिक लांबीची भिंत! पण यामागचे कारण काय?

मुंबई : पालघर जिल्ह्यात बांधले जाणारे वाढवण बंदर हा केंद्र सरकारचा एक खूप महत्त्वाचा प्रकल्प आहे. या बंदरात

कार्तिकी वारीनिमित्त पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! मध्य रेल्वेकडून विशेष गाड्यांचे आयोजन

सोलापूर: येत्या काही दिवसांत पंढरपूर येथे कार्तिकी वारीचा सोहळा रंगणार आहे. यासाठी विविध राज्यातून वारकऱ्यांचा