Devendra Fadanvis : "...नंतर गाशा गुंडाळून गायब होतात", CM फडणवीसांचं महाराष्ट्रातील जनतेला आवाहन

'कुणीही स्वतःच्या खिशातून पैसे देत नाही'- मुख्यमंत्री फडणवीस


मुंबई : आज विधानसभेत टोरेस कंपनीच्या (Torres Company) घोटाळ्यासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला. अशा प्रकारच्या आर्थिक फसवणुकीच्या घटनांबद्दल चिंता व्यक्त करण्यात आली. याबद्दल बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील जनतेला आवाहन केले. पोलिसांकडून केल्या जात असलेल्या उपाययोजनांबद्दलही मुख्यमंत्री फडणवीस यांनी माहिती दिली.


सिस्का एल.ई.डी. कंपनीच्या संचालकांनी पैसे दुप्पट करण्याचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याचा मुद्दा विधानसभेत उपस्थित करण्यात आला. आ. भीमराव तापकीर यांनी हा प्रश्न उपस्थित केला. तर नाना पटोले आणि जितेंद्र आव्हाड यांनी या चर्चेत सहभाग घेतला.


यावर उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, "अशा प्रकारची आमिषे दाखवणाऱ्या कंपन्या, आकर्षक परतावा देण्याच्या योजना चालवणाऱ्या कंपन्या याच्यामध्ये गुंतवणूक करू नका अशी मोहीम पोलिसांनी हाती घेतली आहे. जाहिराती पण दिल्या आहेत. त्यासंदर्भात जनजागृतीची मोहिमही हाती घेण्यात आली आहे. अर्थात अशी कंपनी सुरू झाल्याबरोबर पोलिसांना कारवाई करण्याचा मार्ग नाहीये. कारण अशी कंपनी सुरू करण्यासाठी कंपनी अधिनियमाच्या अंतर्गत नोंदणी करावी लागते. पोलिसांची परवानगी घ्यावी लागत नाही."




...नंतर गाशा गुंडाळून गायब होतात -फडणवीस


"आपण आर्थिक गुप्तचर शाखाही सुरू केली आहे. कंपन्यांनी अधिकचा नफा देणाऱ्या जाहिराती दिल्या. तर त्या आधारावर कारवाई आपण करतो आहे. पण, यामध्ये व्यापक जनजागृती हाच एक महत्त्वाचा विषय आहे. कारण अनेकवेळा अशा घटना घडलेल्या आहेत की, या कंपन्या नोंदणीकृतही नसतात. कुणाची परवानगी नसते. थेट बोर्ड लावतात. लोकांकडून पैसे घेतात. पहिले दोन-तीन महिने व्याज सांगितलेलं असतं, तसं परत करतात. नंतर सगळा गाशा गुंडाळून गायब होतात", असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.



फडणवीसांचं जनतेला आवाहन


"मी या सभागृहाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील जनतेला विनंती करतो की, कुणीही तुम्हाला अधिकचं व्याजदर देण्याची हमी देत असेल किंवा तशी योजना आणत असेल, तर विश्वास ठेवू नका. त्यांच्याकडे सगळ्या परवानग्या आहे की, नाही बघा. ते कशाच्या आधारावर देणार आहेत? कुणीही स्वतःच्या खिशातून पैसे देत नाही. त्यामुळे अशा प्रकारच्या फसवणुकीच्या संदर्भात लोकांनी जागरूक राहिले पाहिजे. पोलिसही जास्तीत जास्त जाणीव जागृतीचा कार्यक्रम हाती घेतील", अशी माहिती फडणवीस यांनी विधानसभेत दिली.

Comments
Add Comment

मुंबईचा पश्चिम आणि पूर्व द्रुतगती महामार्ग पावसाळ्यापूर्वी समतल करा; उपमहापौरांची आयुक्तांकडे निवेदनाद्वारे मागणी

मुंबई: मुंबई महानगरातील रस्त्यांची स्थिती अधिक सुधारण्यासाठी पश्चिम व पूर्व द्रुतगती महामार्ग तसेच प्रमुख

महापालिकेच्यावतीने मुंबई क्लीन लीग स्पर्धा; स्वच्छता विषयक स्पर्धेच्या नोंदणीचा अक्षय कुमार यांच्या उपस्थितीत शुभारंभ

मुंबई: मुंबई अधिक स्वच्छ आणि सुंदर ठेवण्याच्या अनुषंगाने, महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या वतीने

मुंबई वॉटर मेट्रो जलवाहतूक प्रकल्पाला गती देण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश

मुंबई : "मुंबई महानगर प्रदेशात जलप्रवासी वाहतुकीसाठी वॉटर मेट्रो प्रकल्प तीन टप्प्यात कार्यान्वित करण्यात

आमदार हेमंत पाटील यांनी मांडली 'लव्ह जिहाद' आणि 'लोकसंख्या नियंत्रणाची' आग्रही भूमिका

विधान परिषदेत धर्मांतर विरोधी विधेयकावर चर्चा मुंबई : विधान परिषदेत आज धर्मांतर विरोधी विधेयकावर अत्यंत

धर्मांतर हा श्रद्धेचा विषय, व्यवहाराचा नाही!"; विधान परिषदेत आमदार प्रवीण दरेकरांची ठाम भूमिका

मुंबई: "धर्म हा केवळ मानवी श्रद्धेचा भाग असून त्याचा व्यवहारासाठी किंवा स्वार्थासाठी वापर करणे चुकीचे आहे.

राज्यातील कालबाह्य ८० कायदे रद्द

विधेयक मंजूर; मुंबई फटक्यांची शिक्षा रद्द करण्याचा अधिनियम रद्द मुंबई : महाराष्ट्रातील कालबाह्य झालेले ८०