Devendra Fadanvis : "...नंतर गाशा गुंडाळून गायब होतात", CM फडणवीसांचं महाराष्ट्रातील जनतेला आवाहन

'कुणीही स्वतःच्या खिशातून पैसे देत नाही'- मुख्यमंत्री फडणवीस


मुंबई : आज विधानसभेत टोरेस कंपनीच्या (Torres Company) घोटाळ्यासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला. अशा प्रकारच्या आर्थिक फसवणुकीच्या घटनांबद्दल चिंता व्यक्त करण्यात आली. याबद्दल बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील जनतेला आवाहन केले. पोलिसांकडून केल्या जात असलेल्या उपाययोजनांबद्दलही मुख्यमंत्री फडणवीस यांनी माहिती दिली.


सिस्का एल.ई.डी. कंपनीच्या संचालकांनी पैसे दुप्पट करण्याचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याचा मुद्दा विधानसभेत उपस्थित करण्यात आला. आ. भीमराव तापकीर यांनी हा प्रश्न उपस्थित केला. तर नाना पटोले आणि जितेंद्र आव्हाड यांनी या चर्चेत सहभाग घेतला.


यावर उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, "अशा प्रकारची आमिषे दाखवणाऱ्या कंपन्या, आकर्षक परतावा देण्याच्या योजना चालवणाऱ्या कंपन्या याच्यामध्ये गुंतवणूक करू नका अशी मोहीम पोलिसांनी हाती घेतली आहे. जाहिराती पण दिल्या आहेत. त्यासंदर्भात जनजागृतीची मोहिमही हाती घेण्यात आली आहे. अर्थात अशी कंपनी सुरू झाल्याबरोबर पोलिसांना कारवाई करण्याचा मार्ग नाहीये. कारण अशी कंपनी सुरू करण्यासाठी कंपनी अधिनियमाच्या अंतर्गत नोंदणी करावी लागते. पोलिसांची परवानगी घ्यावी लागत नाही."




...नंतर गाशा गुंडाळून गायब होतात -फडणवीस


"आपण आर्थिक गुप्तचर शाखाही सुरू केली आहे. कंपन्यांनी अधिकचा नफा देणाऱ्या जाहिराती दिल्या. तर त्या आधारावर कारवाई आपण करतो आहे. पण, यामध्ये व्यापक जनजागृती हाच एक महत्त्वाचा विषय आहे. कारण अनेकवेळा अशा घटना घडलेल्या आहेत की, या कंपन्या नोंदणीकृतही नसतात. कुणाची परवानगी नसते. थेट बोर्ड लावतात. लोकांकडून पैसे घेतात. पहिले दोन-तीन महिने व्याज सांगितलेलं असतं, तसं परत करतात. नंतर सगळा गाशा गुंडाळून गायब होतात", असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.



फडणवीसांचं जनतेला आवाहन


"मी या सभागृहाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील जनतेला विनंती करतो की, कुणीही तुम्हाला अधिकचं व्याजदर देण्याची हमी देत असेल किंवा तशी योजना आणत असेल, तर विश्वास ठेवू नका. त्यांच्याकडे सगळ्या परवानग्या आहे की, नाही बघा. ते कशाच्या आधारावर देणार आहेत? कुणीही स्वतःच्या खिशातून पैसे देत नाही. त्यामुळे अशा प्रकारच्या फसवणुकीच्या संदर्भात लोकांनी जागरूक राहिले पाहिजे. पोलिसही जास्तीत जास्त जाणीव जागृतीचा कार्यक्रम हाती घेतील", अशी माहिती फडणवीस यांनी विधानसभेत दिली.

Comments
Add Comment

X अर्थात Twitter बंद पडलं, युझर त्रस्त

मुंबई : सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स (X) जो आधी ट्विटर (Twitter) या नावाने ओळखला जात होता तो शुक्रवार १६ जानेवारी २०२६ रोजी

काँग्रेसमुळे मुंबईत ठाकरे बंधूंच्या ७ जागा पडल्या

मुंबई : ज्या काँग्रेसपायी उबाठाने भाजपशी नाते तोडले, त्याच काँग्रेसमुळे मुंबई पालिका निवडणुकीत त्यांना ७

भावनिक आवाहनाला न फसता महाराष्ट्राच्या विकासाला मतदारांची पसंती - भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण

मुंबई : वर्षानुवर्षे भाजपा कार्यकर्त्याने यशाच्या दिशेने पार्टीला नेण्याचे स्वप्न पाहिले आणि ते स्वप्न साकार

BMC Election 2026 : भाजपची ऐतिहासिक मुसंडी तर ठाकरे, काँग्रेसचं काय? २९ महापालिकांच्या रणसंग्रामाचे 'A to Z' अपडेट्स!

मुंबई : भाजपचे निर्विवाद वर्चस्व राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने (भाजप) दणदणीत

 कॅबिनेट मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी मलबार हिलचा गड राखला, भाजपाचे पाचही उमेदवार विजयी - मलबार हिल मध्ये कार्यकर्त्यांचा जल्लोष

मुंबई : राज्याचे कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दक्षिण मुंबईतला आपला मलबार हिलचा गड राखला आहे. त्यांच्या

BMC Election 2026 : शरद पवारांच्या राष्ट्रवादीची २९ पैकी १४ महापालिकेत घसरगुंडी! पुणे-पिंपरी चिंचवडमध्येही भोपळा फुटला नाही

मुंबई : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांचा निकाल आज समोर येत असून, शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील