मुरबाड तालुक्यातील ११ जिल्हा परिषद शाळा शिक्षकांविना

  94

सामाजिक कार्यकर्ते दिनेश जाधव यांचा आंदोलनाचा इशारा!


मुरबाड : मुरबाड तालुक्यातील ११ जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी कायमस्वरूपी एकही शिक्षक नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोकादायक आहे. सामाजिक कार्यकर्ते दिनेश जाधव यांनी जिल्हा शिक्षणाधिकारी यांचेकडे यासंबंधीचे निवेदन देऊन नाराजी व्यक्त केली आहे.


मुरबाडमधील जिल्हा परिषदेच्या एकूण ३२९ जिल्हा परिषद शाळा आहेत. यापैकी ९ केंद्रातील ११ शाळांना एकही शिक्षक नाही. अंदाजे ३५० विद्यार्थी एकही शिक्षक नसलेल्या शाळेत शिक्षण घेतात. गट शिक्षण अधिकारी मुरबाड यांच्याशी संपर्क साधला असता जवळच्या शाळेतील तात्पुरती शिक्षक दिले असल्याचे सांगितले. शासनाच्या धोरणानुसार बहुतांश शाळांना मोजके शिक्षक असल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याने अनेक पालकांनी आपल्या पाल्यास खासगी शाळेत दाखल केल्याचे समजते.


या शैक्षणिक धोरणाच्या आडमुठ्या भूमिकेमुळे जिल्हा परिषदेच्या शाळेतील पटसंख्या कमी झाल्याचे दिसून येते. याबाबत अनेक पालकांनी रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीचे ठाणे जिल्हा ग्रामीण अध्यक्ष दिनेश जाधव यांच्याशी संपर्क साधून खंत व्यक्त केली असता त्यांनी येत्या आठ दिवसांत ११ शाळांना कायमस्वरूपी शिक्षक न दिल्यास पक्षाच्या वतीने ११ जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना घेऊन पंचायत समिती मुरबाड येथे शाळा भरविण्यात येईल असा गर्भित इशारा शालेय प्रशासनाला दिला आहे.

Comments
Add Comment

आनंदाची बातमी शिळफाटा-कल्याण ते रांजनोली वाहतूककोंडी सुटणार

ठाणे : शिळफाटा-कल्याण ते रांजनोली या पट्ट्यात वाहतूक कोंडी ही रोजची समस्या झाली आहे. यावर उपाय करण्यासाठी

कल्याणमध्ये भीषण अपघात: ट्रकने दुचाकीस्वार महिलेला चिरडले, जागीच मृत्यू

ठाणे: कल्याण पश्चिम येथील निक्कीनगर परिसरात एका दुचाकीस्वार महिलेचा भीषण अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. आपल्या

ठाणे महानगरपालिकेची प्रभाग रचना जाहीर, नगरसेवक संख्येत वाढ नाहीच, यंदाही 131 नगसेवक

मुंबई, नवी मुंबई, कल्याण डोंबिवली, ठाणे महापालिकेच्या निवडणुकीची धामधूम सुरू झाली असून आज ठाणे महानगरपालिकेची

Bhiwandi Accident : भिवंडीत खड्ड्यांनी घेतला डॉक्टरचा बळी; आतापर्यंत जीवघेण्या खड्ड्यामुळे तिघांचे प्राण गेले, जबाबदार कोण?

भिवंडी : भिवंडी शहरातील रस्त्यांची दयनीय अवस्था पुन्हा एकदा जीवघेणी ठरली आहे. वंजारपट्टी नाका परिसरात उघडखाबड

ठाण्यात मुसळधार पावसामुळे गणपती कारखान्यात शिरलं पाणी

ठाण्यात सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं असताना पावसाचा फटका गणपती मूर्तीला देखील बसला

पावसामुळे ठाण्यात ४ महिन्यांत २० जणांचा बळी!

ठाणे: गेल्या चार महिन्यांत ठाणे जिल्ह्यात पावसामुळे संबंधित घटनांमध्ये किमान २० लोकांचा मृत्यू झाला आहे, तर या