Phir Hera Pheri 3 : ये बाबुराव का स्टाइल है... अखेर ‘बाबू भैय्या’चं 'Phir Hera Pheri 3' मध्ये दणक्यात पुनरागमन!

अक्षय कुमार-प्रियदर्शन बरोबरच्या वादावर पडदा


मुंबई : परेश रावल यांनी हेरा फेरी ३ चा वाद संपुष्टात आणत या चित्रपटात परतण्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. काही दिवसांपूर्वी मतभेदांमुळे परेश रावल यांनी हेरा फेरी ३ हा चित्रपट सोडला होता.ज्यामुळे चाहते निराश झाले होते. पण,आता या चित्रपटात परतण्याची पुष्टी त्यांनी केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, सर्वांनी एकत्र येऊन कठोर परिश्रम करावे अशी आपली इच्छा आहे. परेश रावल यांना एका पॉडकास्टमध्ये हेरा फेरी ३ शी संबंधित वादाबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता.



या वादावर काय म्हणाले परेश रावल?


परेश रावल यांनी त्याला उत्तर देताना म्हटलंय, 'नाही, कोणताही वाद नाही. मला वाटते की, जेव्हा प्रेक्षकांना एखादी गोष्ट खूप आवडते तेव्हा तुम्ही जास्त काळजी घेतली पाहिजे. प्रेक्षकांप्रती आपल्या काही जबाबदाऱ्या असतात. प्रेक्षकांनी तुमचे खूप कौतुक केले आहे. तुम्ही गोष्टी हलक्यात घेऊ शकत नाही. कठोर परिश्रम करून त्या द्या. शेवटीप्रत्येकजण खूप सर्जनशील आहे. मग तो प्रियदर्शन असो, अक्षय कुमार असो किंवा सुनील शेट्टी असो. ते माझे वर्षानुवर्षे मित्र आहेत.' परेश रावल हेरा फेरी ३ चा भाग होते. पण त्यांनी अचानक एका मुलाखतीत चित्रपट सोडण्याचा निर्णय जाहीर केला होता. या चित्रपटाची निर्मिती अक्षय कुमार करत आहे. अशा परिस्थितीत परेश रावल अचानक चित्रपट सोडल्याची बातमी आल्यानंतर अभिनेत्याच्या टीमने त्यांना कायदेशीर नोटीस पाठवली. अक्षयच्या वकीलांनी सांगितले होते की, निर्मिती कंपनीने चित्रपटावर खूप पैसे खर्च केले आहेत. त्यामुळे या प्रकरणात कायदेशीर कारवाई केली जाऊ शकते.




 

‘हेरा फेरी ३’ बद्दलचा वाद काय होता?


परेश रावल यांच्या या संभाषणातून हे स्पष्ट होते की हेरा फेरी ३ बद्दल सुरू असलेला जो काही वाद अखेर मिटला आहे. यासोबतच, चित्रपटातील बाबू भैयाच्या भूमिकेच्या पुनरागमनाबद्दल एक संकेत देखील मिळाला आहे. आता निर्माते हेरा फेरी ३ मध्ये परेश रावलच्या पुनरागमनाला अधिकृतपणे कधी पुष्टी देतात हे पाहणे मनोरंजक ठरणार आहे. तसेच, यापूर्वी परेश रावल यांनी स्वतः हेरा फेरी ३ सोडल्याची पुष्टी केली होती. तसेच, ११ लाख रुपयांची साइनिंग रक्कम १५% व्याजासह निर्मात्यांना परत करण्यात आली आहे. आता त्यांच्या पुनरागमनामुळे चाहते खूप खुश झाले आहेत.

Comments
Add Comment

‘तो ती आणि फुजी’ पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सुपरहिट

पुणे : शिलादित्य बोरा निर्मित आणि मोहित टकळकर दिग्दर्शित मराठी–जापानी चित्रपट ‘तो ती आणि फुजी’चा २४व्या पुणे

साईबाबांच्या पालखीच्या प्रवासातील साई भक्तांच्या अढळ श्रद्धेवर आणि भक्तीवर आधारित , 'पालखी' चित्रपटाचा मुहूर्त

मुंबई : श्रद्धा ही केवळ भावना नाही, ती आयुष्याला नवी दिशा देणारी शक्ती आहे. साईबाबांच्या कृपेवर आणि अढळ

करण जौहरचा चित्रपट ऑस्कर 2026 मधुन बाहेर;चाहत्यांमध्ये निराशा..

मुंबई :ऑस्कर २०२६, ९८व्या अकॅडमी अवॉर्ड्सच्या नामांकनांची अधिकृत यादी जाहीर झाली असून, भारताकडून अधिकृत प्रवेश

भय आणि भ्रमाच्या विळख्यातला थरार ‘सालबर्डी’

मुंबई : इतिहासाच्या गर्भात दडलेल्या अनेक रहस्यांचा कधीच शोध लागत नाही, ती नेहमीच अनुत्तरीतच रहातात. काहींचा शोध

मराठी मनोरंजनाचा समृद्ध खजिना घेऊन 'नाफा स्ट्रीम'ची नॉर्थ अमेरिकेत धडाकेबाज एंट्री!

सॅन होजे (मनोरंजन प्रतिनिधी) : राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त ‘देऊळ’ आणि ‘भारतीय’ या गाजलेल्या चित्रपटांचे

फरहान अख्तर अभिनीत ‘120 बहादूर’पासून सनी देओलच्या ‘बॉर्डर’पर्यंत – या प्रजासत्ताक दिनी पाहा 7 देशभक्तीपर चित्रपट

प्रजासत्ताक दिन विशेष: फरहान अख्तर अभिनीत ‘120 बहादूर’पासून सनी देओलच्या ‘बॉर्डर’पर्यंत – हे सात प्रेरणादायी