Phir Hera Pheri 3 : ये बाबुराव का स्टाइल है... अखेर ‘बाबू भैय्या’चं 'Phir Hera Pheri 3' मध्ये दणक्यात पुनरागमन!

अक्षय कुमार-प्रियदर्शन बरोबरच्या वादावर पडदा


मुंबई : परेश रावल यांनी हेरा फेरी ३ चा वाद संपुष्टात आणत या चित्रपटात परतण्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. काही दिवसांपूर्वी मतभेदांमुळे परेश रावल यांनी हेरा फेरी ३ हा चित्रपट सोडला होता.ज्यामुळे चाहते निराश झाले होते. पण,आता या चित्रपटात परतण्याची पुष्टी त्यांनी केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, सर्वांनी एकत्र येऊन कठोर परिश्रम करावे अशी आपली इच्छा आहे. परेश रावल यांना एका पॉडकास्टमध्ये हेरा फेरी ३ शी संबंधित वादाबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता.



या वादावर काय म्हणाले परेश रावल?


परेश रावल यांनी त्याला उत्तर देताना म्हटलंय, 'नाही, कोणताही वाद नाही. मला वाटते की, जेव्हा प्रेक्षकांना एखादी गोष्ट खूप आवडते तेव्हा तुम्ही जास्त काळजी घेतली पाहिजे. प्रेक्षकांप्रती आपल्या काही जबाबदाऱ्या असतात. प्रेक्षकांनी तुमचे खूप कौतुक केले आहे. तुम्ही गोष्टी हलक्यात घेऊ शकत नाही. कठोर परिश्रम करून त्या द्या. शेवटीप्रत्येकजण खूप सर्जनशील आहे. मग तो प्रियदर्शन असो, अक्षय कुमार असो किंवा सुनील शेट्टी असो. ते माझे वर्षानुवर्षे मित्र आहेत.' परेश रावल हेरा फेरी ३ चा भाग होते. पण त्यांनी अचानक एका मुलाखतीत चित्रपट सोडण्याचा निर्णय जाहीर केला होता. या चित्रपटाची निर्मिती अक्षय कुमार करत आहे. अशा परिस्थितीत परेश रावल अचानक चित्रपट सोडल्याची बातमी आल्यानंतर अभिनेत्याच्या टीमने त्यांना कायदेशीर नोटीस पाठवली. अक्षयच्या वकीलांनी सांगितले होते की, निर्मिती कंपनीने चित्रपटावर खूप पैसे खर्च केले आहेत. त्यामुळे या प्रकरणात कायदेशीर कारवाई केली जाऊ शकते.




 

‘हेरा फेरी ३’ बद्दलचा वाद काय होता?


परेश रावल यांच्या या संभाषणातून हे स्पष्ट होते की हेरा फेरी ३ बद्दल सुरू असलेला जो काही वाद अखेर मिटला आहे. यासोबतच, चित्रपटातील बाबू भैयाच्या भूमिकेच्या पुनरागमनाबद्दल एक संकेत देखील मिळाला आहे. आता निर्माते हेरा फेरी ३ मध्ये परेश रावलच्या पुनरागमनाला अधिकृतपणे कधी पुष्टी देतात हे पाहणे मनोरंजक ठरणार आहे. तसेच, यापूर्वी परेश रावल यांनी स्वतः हेरा फेरी ३ सोडल्याची पुष्टी केली होती. तसेच, ११ लाख रुपयांची साइनिंग रक्कम १५% व्याजासह निर्मात्यांना परत करण्यात आली आहे. आता त्यांच्या पुनरागमनामुळे चाहते खूप खुश झाले आहेत.

Comments
Add Comment

Rashmika-Vijay Reception : कुर्गमध्ये पार पडला रश्मिका-विजयचा दुसरा ग्रँड रिसेप्शन सोहळा, रश्मिकाला मिळालं 'हे' कोट्यवधींच सरप्राइज

साऊथबरोबरच संपूर्ण देशात प्रसिद्ध असलेली जोडी म्हणजेच अभिनेता विजय देवरकोंडा आणि नॅशनल क्रश रश्मिका मंदाना

Lata Deenanath Mangeshkar Award : यंदा 'लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार'ने कैलाश सत्यार्थी सन्मानित

लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार २०२६ यंदा नोबेल पुरस्कार विजेते कैलाश सत्यार्थी यांना जाहीर करण्यात आला आहे.

Bigg Boss Marathi Ticket To Finale: अखेर 'ही' सदस्य ठरली पहिली फायनलिस्ट, 'तिकीट टू फिनाले'च्या टास्कमध्ये मारली बाजी

मुंबई : बिग बॉस मराठी ( Bigg Boss Marathi ) सीझन ६ आता अंतिम टप्प्यात येऊन पोहोचले असून अनेक टास्क आणि आव्हानं पार करुन घरातील ७

'तारक मेहता का उल्टा चश्मा' फेम दिशा वकानीच्या वडिलांचं निधन

मुंबई: टेलिव्हिजनवरील सर्वात लोकप्रिय मालिका 'तारक मेहता का उल्टा चश्मा' मधील दयाबेनच्या भूमिकेसाठी ओळखली

Dhurandhar 2 ; Virushka : वीरूष्काला पडली धुरंधर २ ची भुरळ; इंस्टाग्रामवर स्टोरी शेअर करत.....

मुंबई : धुरंधर या चित्रपटाने सर्वानाच भुरळ पाडली आहे. पहिल्या भागाने जोरदार कमाई करत. भारतीयांच्या लोकांच्या

Gautami patil : गौतमी पाटीलच्या 'या' नवीन गाण्यानं घातला धूमाकूळ

मुंबई : आपल्या मनमोहक अदांनी प्रेक्षकांची मनं जिंकणारी महाराष्ट्राची लाडकी नृत्यागंणा गौतमी पाटील ( Gautami Patil ) चा