Phir Hera Pheri 3 : ये बाबुराव का स्टाइल है... अखेर ‘बाबू भैय्या’चं 'Phir Hera Pheri 3' मध्ये दणक्यात पुनरागमन!

अक्षय कुमार-प्रियदर्शन बरोबरच्या वादावर पडदा


मुंबई : परेश रावल यांनी हेरा फेरी ३ चा वाद संपुष्टात आणत या चित्रपटात परतण्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. काही दिवसांपूर्वी मतभेदांमुळे परेश रावल यांनी हेरा फेरी ३ हा चित्रपट सोडला होता.ज्यामुळे चाहते निराश झाले होते. पण,आता या चित्रपटात परतण्याची पुष्टी त्यांनी केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, सर्वांनी एकत्र येऊन कठोर परिश्रम करावे अशी आपली इच्छा आहे. परेश रावल यांना एका पॉडकास्टमध्ये हेरा फेरी ३ शी संबंधित वादाबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता.



या वादावर काय म्हणाले परेश रावल?


परेश रावल यांनी त्याला उत्तर देताना म्हटलंय, 'नाही, कोणताही वाद नाही. मला वाटते की, जेव्हा प्रेक्षकांना एखादी गोष्ट खूप आवडते तेव्हा तुम्ही जास्त काळजी घेतली पाहिजे. प्रेक्षकांप्रती आपल्या काही जबाबदाऱ्या असतात. प्रेक्षकांनी तुमचे खूप कौतुक केले आहे. तुम्ही गोष्टी हलक्यात घेऊ शकत नाही. कठोर परिश्रम करून त्या द्या. शेवटीप्रत्येकजण खूप सर्जनशील आहे. मग तो प्रियदर्शन असो, अक्षय कुमार असो किंवा सुनील शेट्टी असो. ते माझे वर्षानुवर्षे मित्र आहेत.' परेश रावल हेरा फेरी ३ चा भाग होते. पण त्यांनी अचानक एका मुलाखतीत चित्रपट सोडण्याचा निर्णय जाहीर केला होता. या चित्रपटाची निर्मिती अक्षय कुमार करत आहे. अशा परिस्थितीत परेश रावल अचानक चित्रपट सोडल्याची बातमी आल्यानंतर अभिनेत्याच्या टीमने त्यांना कायदेशीर नोटीस पाठवली. अक्षयच्या वकीलांनी सांगितले होते की, निर्मिती कंपनीने चित्रपटावर खूप पैसे खर्च केले आहेत. त्यामुळे या प्रकरणात कायदेशीर कारवाई केली जाऊ शकते.




 

‘हेरा फेरी ३’ बद्दलचा वाद काय होता?


परेश रावल यांच्या या संभाषणातून हे स्पष्ट होते की हेरा फेरी ३ बद्दल सुरू असलेला जो काही वाद अखेर मिटला आहे. यासोबतच, चित्रपटातील बाबू भैयाच्या भूमिकेच्या पुनरागमनाबद्दल एक संकेत देखील मिळाला आहे. आता निर्माते हेरा फेरी ३ मध्ये परेश रावलच्या पुनरागमनाला अधिकृतपणे कधी पुष्टी देतात हे पाहणे मनोरंजक ठरणार आहे. तसेच, यापूर्वी परेश रावल यांनी स्वतः हेरा फेरी ३ सोडल्याची पुष्टी केली होती. तसेच, ११ लाख रुपयांची साइनिंग रक्कम १५% व्याजासह निर्मात्यांना परत करण्यात आली आहे. आता त्यांच्या पुनरागमनामुळे चाहते खूप खुश झाले आहेत.

Comments
Add Comment

अभिनेत्री नीना कुळकर्णी यांना विष्णुदास भावे पदक जाहीर

सांगली (वार्ताहर) : मराठी रंगभूमीवरील मानाचा समजला जाणारा नाट्य क्षेत्रातील यंदाचा विष्णुदास भावे गौरव पदक

गरोदरपणानंतर रुबिना दिलीकचा आत्मविश्वास डगमगला!

मुंबई: पती-पत्नी और पंगा या शोमध्ये अभिनेत्री रुबिना दिलैक पती अभिनव शुक्ला सोबत मस्ती करताना दिसत आहे. या

डीपफेक व्हिडिओंचा गैरवापर: ऐश्वर्या-अभिषेकची थेट हायकोर्टात धाव, YouTube-Google कडे ४ कोटींची मागणी!

मुंबई: बॉलिवूडचे पॉवर कपल अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चन यांनी यूट्यूब आणि त्याची मूळ कंपनी गुगल

दशावतार सिनेमाने अवघ्या तीन आठवड्यात केला विक्रम... २१ दिवसात किती कोटी कमावले?

दशावतार हा मराठी सिनेमा बॉक्स ऑफिसवर आपली छप्प्पर फाड कमाई करत आला आहे. तब्ब्ल तीन आठवडयांनी सुद्धा

महात्मा गांधींच्या पणतीचे ग्लॅमरच्या जगात वेगळे स्थान!

महात्मा गांधी यांचे नाव संपूर्ण जग आदराने आणि श्रद्धेने लक्षात ठेवते. त्यांचे विचार, तत्त्वे आणि सत्य व अहिंसेचा

नांदेडच्या कैलास यांनी केबीसी १७ मध्ये जिंकले ५० लाख रुपये

कौन बनेगा करोडपती’ हा शो छोट्या पडद्यावरील सगळ्यात लोकप्रिय शो आहे. आजवर लाखो स्पर्धकांनी या शोमध्ये सहभागी होत