Devendra Fadnavis : दोन भावांनी एकत्र येऊ नये असा GR मी काढलाय का? दोघांनी एकत्र यावं अन् क्रिकेट खेळावं; आम्हाला काहीही फरक... : मुख्यमंत्री फडणवीस

मुंबई : राज्यातील शाळांमध्ये पहिलीपासून हिंदी भाषेसंबंधी काढण्यात आलेले जीआर राज्य शासनाने रद्द ठरवले. हा मराठी माणसाच्या एकजुटीचा विषय असल्याचं ठाकरे बंधूंनी सांगितलं. त्यावर मुख्यमंत्र्यांनी प्रतिक्रिया दिली. आम्ही निर्णय घेताना कोणत्याही पक्षाचं हित पाहणार नाही, आम्ही महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचं हित पाहणार. त्यामुळे कुणाच्याही दबावाखाली न येता योग्य तोच निर्णय घेऊन असं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. दोन ठाकरे बंधू एकत्र येऊ नये असा काही जीआर आम्ही काढला नाही, त्यांनी एकत्र यावं आणि किक्रेट खेळावं, जेवण करावं. आम्हाला त्याचा काही फरक पडणार नाही असंही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.



काय म्हणाले फडणवीस ?


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांचा उजवा हात समजल्या जाणाऱ्या नेत्याने हिंदी सक्तीची करा अशी शिफारस केली होती. तो अहवाल उद्धव ठाकरेंनी स्वीकारला. त्यामुळे हिंदीचा निर्णय त्यांच्या कार्यकाळातच झाला होता. हे दुटप्पी लोक आहेत. याचं सत्तेतले रुप वेगळं आणि विरोधातले रुप वेगळं आहे."



क्रिकेट खेळावं अन् टेनिस खेळावं


ठाकरे बंधू एकत्र न येण्यासाठी भाजप प्रयत्न करतंय का असा प्रश्न विचारला असता देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये म्हणून मी जीआर काढलेला नाही. दोन भावांना एकत्र येण्यासाठी मी रोखलंय का? त्यांनी एकत्र यावे, क्रिकेट खेळावं, टेनिस खेळावं, जेवण करावं, काहीही करावं आम्हाला काहीही फरक पडत नाही." पुढे फडणवीस म्हणाले की, "राज्यात त्रिभाषा सूत्र स्वीकारायचं की नाही यावर आम्ही एक समिती नेमली आहे. ती समिती आता ठरवेल. आम्ही कुठल्याही पक्षाचं हित पाहणार नाही. आम्ही महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांचं हित पाहणार. कुणाच्याही दबावाखाली झुकणार नाही."

Comments
Add Comment

Nitesh Rane : नवी मुंबई ते सिंधुदुर्ग विमानसेवा १५ ऑगस्टपासून - पालकमंत्री नितेश राणे

- गणेशोत्सवापूर्वी कोकणवासीयांना मोठा दिलासा मुंबई : गणेशोत्सव अगदी काही दिवसांवर येऊन ठेपला असतानाच, मुंबईत

SIR Form : मतदारांसाठी दिलासा! राज्यातील निवडणूक आयोगाच्या SIR मोहिमेला दहा दिवसांची मुदतवाढ

मुंबई : मतदार यादी अधिक अचूक आणि अद्ययावत करण्यासाठी सुरू असलेल्या विशेष सखोल पुनरिक्षण (maharashtra  - SIR) अभियानाला

Mumbai Water Stock : मुंबईला दिलासा! तलावक्षेत्रात मुसळधार पाऊस; जलसाठा ४८.६६% वर, दोन तलाव ओव्हरफ्लो

मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलाव क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जलसाठ्यात वेगाने वाढ होत

Vinayak Raut : विनायक राऊतांच्या अडचणी वाढल्या; २३ जुलैच्या सुनावणीपूर्वी कोर्टाने दिला मोठा झटका

मुंबई : ठाकरे गटाचे नेते आणि माजी खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) यांच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत. सून गिरीजा राऊत (Girija Raut)

Maharashtra Rain Update : पावसाचा दमदार कमबॅक! पुण्यासह 'या' जिल्ह्यांत यलो अलर्ट, हवामान विभागाचा इशारा

मुंबई : जुलैच्या सुरुवातीला महाराष्ट्रात (Maharashtra) मान्सूनने (Monsoon) दमदार हजेरी लावली होती. मात्र, गेल्या काही

Ketan Agarwal Murder Case : केतन अग्रवाल हत्या प्रकरणानंतर सिया गोयलच्या कुटुंबाला आणखी एक धक्का; वडिलांच्या दुकानावर 'FDA'ची कारवाई

मुंबई : केतन अग्रवाल हत्या प्रकरणातील (Murder Case) आरोपी सिया गोयल हिच्या कुटुंबाशी संबंधित व्यवसायावर अन्न व औषध