भविष्यकाळात वीजदरात आणखी होणार घट

महावितरणचे अध्यक्ष लोकेश चंद्र यांचे प्रतिपादन


मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महावितरणने गेल्या अडीच वर्षात राज्याच्या वीज पुरवठ्यासाठी केलेल्या नियोजनामुळे आगामी पाच वर्षात कंपनीची वीज खरेदी खर्चात ६६ हजार कोटी रुपयांची बचत होणार असल्याने त्याचा लाभ वीज ग्राहकांना देऊन आगामी पाच वर्षांसाठी वीजदरात कपात करता आली. महावितरणने नवीकरणीय ऊर्जेवर भर दिला असून, त्यांचे वीजदर कायम राहणार असल्याने पाच वर्षानंतर वीजदरात आणखी घट होईल, असे प्रतिपादन महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी गुरुवारी मुंबईत केले.


ते पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी महावितरणचे संचालक (संचलन) सचीन तालेवार, संचालक (वाणिज्य) योगेश गडकरी, संचालक (वित्त) अनुदीप दिघे व संचालक (मानव संसाधन) राजेंद्र पवार उपस्थित होते. महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने बुधवारी महावितरणच्या वीजदराबाबत आदेश जारी केला. महावितरणचा वीजदर कमी करण्याचा प्रस्ताव मान्य केला. या पार्श्वभूमीवर लोकेश चंद्र बोलत होते.



लोकेश चंद्र म्हणाले की, महाराष्ट्र राज्याची आगामी काळातील विजेची गरज ध्यानात घेऊन महावितरणने २०३४ -३५ या आर्थिक वर्षापर्यंत पुरेशा विजेसाठीचे नियोजन केले आहे. आगामी पाच वर्षात राज्याची विजेची क्षमता ४५ हजार मेगावॅटने वाढविण्यासाठी वीजखरेदी करार केले आहेत. यामध्ये प्रामुख्याने सौर, पवन, पंप स्टोरेज, बॅटरी स्टोरेज अशा नवीकरणीय ऊर्जास्त्रोतांवर भर दिला आहे. या स्त्रोतांमधून वीज स्वस्त दरात मिळणार असल्याने कंपनीची आगामी पाच वर्षात वीजखरेदीची ६६ हजार कोटी रुपयांची बचत होणार आहे. त्याचा लाभ घरगुती, औद्योगिक आणि व्यावसायिक ग्राहकांना वीजदर कपातीच्या स्वरुपात करून देण्यात आला आहे. यासाठी गेली अडीच वर्षे नियोजनबद्धरित्या काम सुरू होते.


त्यांनी सांगितले की, नवीकरणीय ऊर्जेवर भर दिल्यामुळे वीजखरेदीत बचत होण्यामध्ये मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० या गेमचेंजर योजनेचा महत्त्वाचा वाटा आहे. शेतकऱ्यांना कृषी पंपासाठी दिवसा वीज देण्यासाठीच्या या १६ हजार मेगावॅट क्षमतेच्या सौर ऊर्जा प्रकल्पातून सरासरी तीन रुपये प्रती युनिट इतक्या कमी दरात वीज उपलब्ध होणार आहे. अशा प्रकारच्या कल्पक उपायांमुळे महावितरणची वीजखरेदी खर्चात बचत होणार आहे.


लोकेश चंद्र म्हणाले की, महावितरणने रिन्युएबल अर्थात नवीकरणीय ऊर्जेवर भर दिला आहे. त्याद्वारे मिळणाऱ्या विजेचे दर सौर ऊर्जेच्या बाबतीत आगामी २५ वर्षे तर पंप स्टोरेजच्या बाबतीत ४० वर्षे बदलणार नाहीत. स्वस्त व स्थिर दराची वीज मिळाल्यामुळे भविष्यकाळात पाच वर्षानंतर वीजदरात आणखी घट होऊ शकते. राज्यातील घरगुती, औद्योगिक व व्यावसायिक ग्राहकांचे वीजदर आगामी पाच वर्षात वाढणार नाहीत तर कमीच होत जातील.


Comments
Add Comment

Supriya Sule : खासदार सुप्रिया सुळेंनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, भेटीचं कारण जगजाहीर...

मुंबई : देशभरात सध्या बिहार विधानसभा निवडणुकीची (Bihar Assembly Election) प्रचंड रणधुमाळी सुरू आहे. बिहारमध्ये मोठ्या प्रमाणावर

Dharmendra Hospital Video Leak : अभिनेते धर्मेंद्र यांची तब्येत क्रिटिकल; हॉस्पिटलमधील VIDEO लीक, पत्नी प्रकाश कौर ढसाढसा रडल्या

मुंबई : ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र (Dharmendra) यांच्या नाजूक प्रकृतीमुळे संपूर्ण सिनेसृष्टीत चिंतेचे वातावरण असतानाच,

मुंबईतील उद्यान विभागाच्या निविदा होणार रद्द? महापालिका उद्यान विभागाकडून अनामत स्वीकारण्याच्या परिपत्रकाचे उल्लंघन

मुंबई (खास प्रतिनिधी): मुंबईतील उद्यान विभागाच्या देखभाल आणि दुरुस्तीसाठी मागवण्यात आलेली निविदा वादात

Mangesh Desai : आता 'धर्मवीर ३' नाही, तर 'गुवाहाटी फाइल्स'? निर्माते मंगेश देसाईंच्या वक्तव्याने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ; म्हणाले...

मुंबई : दिवंगत ठाणे जिल्हाप्रमुख आनंद दिघे (Anand Dighe) यांच्या आयुष्यावर आधारित असलेला आणि शिवसेनेसाठी महत्त्वाचा

डिजिटल व्यवसाय आणि उद्योजकता

करिअर : सुरेश वांदिले डिजिटल व्यवसाय आणि उद्योजकता विषयातील बॅचलर ऑफ बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशन (बीबीए-डीबीइ) हा

Bihar Vidhan Sabha Election Result : बिहार विधानसभा मतमोजणीला लवकरच सुरुवात; नवे सरकार आज स्थापन होण्याच्या दिशेने पहिले पाऊल...

नवी दिल्ली : बिहार विधानसभा निवडणुकीसाठीचे मतदान नुकतेच पार पडले असून, आज, निकालाचा 'महादिवस' आहे. आज या निवडणुकीचे