हिमाचल प्रदेशमध्ये ढगफुटीमुळे पाच जणांचा मृत्यू

कुल्लू : हिमाचल प्रदेशमधील कुल्लू आणि कांगडा जिल्ह्यांसह काही भागांमध्ये ढगफुटी, मुसळधार पाऊस आणि पूर यामुळे प्रचंड नुकसान झाले. आतापर्यंत या संकटामुळे पाच जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच पाच जण बेपत्ता आहेत. मृतांच्या संख्येत वाढ होण्याची भीती व्यक्त होत आहे. हवामान विभागाकडून हिमाचल प्रदेशला रविवार २९ जून साठीही ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

उना, बिलासपूर, सोलन, शिमला, सिरमौर, कांगडा, चंबा, कुल्लू आणि मंडी या हिमाचलमधील जिल्ह्यांमध्ये दोन - तीन दिवस मुसळधार पावसाची तसेच जमीन खचण्याची शक्यता हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आली आहे. महत्त्वाचे काम नसल्यास मुसळधार पाऊस पडत असताना घराबाहेर पडणे टाळा, असे आवाहन नागरिकांना करण्यात आले आहे.



हिमाचल प्रदेशमधील तीन ठिकाणी ढगफुटी झाली आहे आणि नऊ ठिकाणी पूर आला आहे. या अचानक आलेल्या संकटामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. घटनास्थळी मदतकार्य सुरू आहे, असे मुख्यमंत्री सुखविंदर सुखू म्हणाले म्हणाले.

आतापर्यंत २५० लोकांना वाचवण्यात आले आहे. ज्या पाच जणांचा मृत्यू झाला आहे, त्यातील चार जणांची ओळख पटली असल्याचे पोलिसांनी सांगितले. जंगलातून एकाला वाचवण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. अचानक आलेल्या संकटामुळे अनेक घरांचे नुकसान झाले. मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली आहे.
Comments
Add Comment

India Seychelles Relations : सेशेल्स दौऱ्यात भारताचे मोठे पाऊल; १९ करारांवर स्वाक्षऱ्या, संरक्षण ते UPI पर्यंत सहकार्याला चालना

सेशेल्स : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या सेशेल्स दौऱ्यात भारत (India) आणि सेशेल्स (Seychelles) यांच्यातील संबंध अधिक

Monsoon News : देशात पावसाची ४३ टक्के तूट; १४६ वर्षांतील सर्वात कोरडा जून

नवी दिल्ली : केरळमध्ये ४ जून रोजी झाला. मात्र अल निनोच्या इफेक्टमुळे जून महिना सरत आला तरी पावसाला अपेक्षित गती

Petrol Pump News : बाप रे काय दिमाग लावलाय! कारमध्ये ६ हजारांचं डिझेल भरलं अन् थेट सुसाट

गुरुग्राममधील पेट्रोल पंपावरचा व्हिडिओ व्हायरल, पोलिसही हैराण!  हरियाणा : हरियाणातील गुरुग्राममध्ये पेट्रोल

Railway Security : दगडफेक करणाऱ्यांवर रेल्वे सुरक्षा दलाची ड्रोनद्वारे करडी नजर

नवी दिल्ली : धावत्या रेल्वेगाड्यांवर होणाऱ्या दगडफेकीच्या घटनांना आळा घालण्यासाठी रेल्वे सुरक्षा दलाने

अनंत अंबानींच्या भक्तीची भाविकांमध्ये चर्चा; रिलायन्स इंडस्ट्रीकडून तिरूपतीच्या बालाजी मंदिराला २७ कोटींची भेट !

तिरुपती : आशियातील सर्वात श्रीमंत उद्योगपतींपैकी एक असलेल्या मुकेश अंबानी यांचे सुपुत्र आणि रिलायन्स

PM Narendra Modi : पावसाच्या पाण्याचा एक-एक थेंब वाचवा; पंतप्रधान मोदींचे नागरिकांना आवाहन

नवी दिल्ली : प्रत्येकाने स्वतःची आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्या. आपल्याला जलसंचय करायचाच आहे. पावसाच्या