"स्वबळाची परिक्षा होणार की नाही, पक्षातील वरिष्ठ नेते ठरवतील," गिरीश महाजन स्पष्टच बोलले...

  30

मुंबई : राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचं बिगुल वाजल्यानंतर सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारीला सुरवात केली. तसेच महायुतीला विधानसभा निवडणुकीत बहुमत मिळालं होत. त्यानंतर राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाकडे सर्वांच लक्ष लागलं आहे. त्यामुळे या निवडणुकीत महायुतीला किती जागा जिंकता येणार याबाबत प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. निवडणुकी संदर्भात बोलताना भाजप नेते गिरीश महाजन यांनी मोठं वक्तव्य केले आहे.


महायुतीत जागा वाटपाचा निर्णय अद्याप झालेला नाही. विधानसभेत ज्या जागा पक्षाच्या चिन्हावर लढवल्या गेल्या, त्या जागा देखील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत लढवल्या जातील. कारण त्या जागा आमच्याच आहेत. जर युतीत गुंतागुंतीचा विषय ठरत असेल तर त्यावर चर्चा काढून तोडगा काढण्यात येईल. महायुतीतील सर्व घटक पक्षांचा विचार करुनच निडवणुकींचा निर्णय घेणार आहोत. फार काही तोडगा निघाला नाही तर मैत्री पूर्ण लढत होऊ शकते, तेसच स्वबळाची परिक्षा होणार की नाही, पक्षातील वरिष्ठ नेते ठरवतील. असंं गिरीष महाजन यांनी म्हटलं आहे.


खडसे साहेबांना सांगा मी बाल स्वयंसेवक होतो...


मी भाजपात होतो तेव्हा गिरीष महाजन सामान्य कार्यकर्ते होते, असा दावा एकनाथ खडसे यांनी केला होता. पत्रकारांच्या प्रश्नांवर महाजन यांनी प्रतिक्रिया दिली, "बरोबर आहे मी साधा कार्यकर्ताच आहे. लहानपणापासून मी संघाचा स्वयंसेवक आहे, खडसे साहेबांना म्हणा मी बाल स्वयंसेवक होतो,  मी भाजप युवा मोर्चाचा कार्यकर्ता होतो.  तालुक्याचा  त्यानंतर जिल्ह्याचा मग राज्याचा झालो. हे १९९० साली आले, मी शाळेत होतो, तेंव्हापासून शाखेत जात होतो. मी त्यांना कार्यकर्ता म्हणणार नाही,  त्यांना नेताच म्हणेल."असं महाजन यांनी म्हटलं आहे.


गेल्या काही दिवसांपासून एकनाथ शिंदे आणि अजित पवार नाराज असल्याची चर्चा सुरु आहे.  यावर देखील महाजन यांनी प्रतिक्रिया दिली. नाराजी मित्र पक्षातही असते काल आमची सर्वांची बैठक झाली. दोघांमध्ये कुठेही नाराजी नाही. नाराजी माध्यमांमधून दिसते आमच्या सर्वांमध्ये एकमत आहे. एकमतांच्या सल्ल्याने पुढच्या निवडणुका लढणार असे महाजन यांनी प्रतिक्रिया दिली..


Comments
Add Comment

राज्यात वीज दर कपातीला एमईआरसी हिरवा कंदील

पहिल्यावर्षी १० टक्के आणि टप्प्याटप्प्याने कपात करीत ५ वर्षांत २६ टक्के वीजदर होणार कमी मुंबई : राज्याच्या

आदित्य ठाकरेची अटक टाळण्यासाठी हैद्राबादवरुन आणला मांत्रिक!

शिवसेना नेते रामदास कदम यांचा आरोप मुंबई : शिवसेनेतील अंतर्गत वाद आता काळी विद्या, जादूटोणा आणि तांत्रिक

Numerology: वयाच्या ३५ वर्षानंतर प्रचंड संपत्ती मिळवतात या ३ तारखांना जन्मलेले लोक

मुंबई: अंकज्योतिषामध्ये प्रत्येक अंकाचे खास महत्त्व आहे. १ ते ९ अंकांचा संबंध ग्रह, राशी आणि नक्षत्रांशी जोडलेला

गावा गावात क्रीडा सुविधांसाठी ५० कोटी रुपयांची तरतूद - क्रीडा मंत्री

मुंबई : राज्यातील ग्रामीण भागात क्रीडा क्षेत्रात अनेक गुणवंत विद्यार्थी आहेत. त्यांच्या गुणांना वाव मिळावा तसेच

वाढीव मतदानासंदर्भातील याचिका फेटाळली

उच्च न्यायालयाचा प्रकाश आंबेडकरांना धक्का मुंबई : राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या निकालावर सर्वच विरोधी

"आम्ही संघर्ष करुन लोकशाही टिकवली," आणीबाणीवर बोलताना मुख्यमंत्री फडणवीस काय म्हणाले ?

मुंबई : आणीबाणीत संर्घष करणाऱ्याला स्मरणार्थ ५० वर्ष पूर्ण झालेले असून मुंबई येथे संविधान हत्या दिन कार्यक्रम