"स्वबळाची परिक्षा होणार की नाही, पक्षातील वरिष्ठ नेते ठरवतील," गिरीश महाजन स्पष्टच बोलले...

मुंबई : राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचं बिगुल वाजल्यानंतर सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारीला सुरवात केली. तसेच महायुतीला विधानसभा निवडणुकीत बहुमत मिळालं होत. त्यानंतर राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाकडे सर्वांच लक्ष लागलं आहे. त्यामुळे या निवडणुकीत महायुतीला किती जागा जिंकता येणार याबाबत प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. निवडणुकी संदर्भात बोलताना भाजप नेते गिरीश महाजन यांनी मोठं वक्तव्य केले आहे.


महायुतीत जागा वाटपाचा निर्णय अद्याप झालेला नाही. विधानसभेत ज्या जागा पक्षाच्या चिन्हावर लढवल्या गेल्या, त्या जागा देखील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत लढवल्या जातील. कारण त्या जागा आमच्याच आहेत. जर युतीत गुंतागुंतीचा विषय ठरत असेल तर त्यावर चर्चा काढून तोडगा काढण्यात येईल. महायुतीतील सर्व घटक पक्षांचा विचार करुनच निडवणुकींचा निर्णय घेणार आहोत. फार काही तोडगा निघाला नाही तर मैत्री पूर्ण लढत होऊ शकते, तेसच स्वबळाची परिक्षा होणार की नाही, पक्षातील वरिष्ठ नेते ठरवतील. असंं गिरीष महाजन यांनी म्हटलं आहे.


खडसे साहेबांना सांगा मी बाल स्वयंसेवक होतो...


मी भाजपात होतो तेव्हा गिरीष महाजन सामान्य कार्यकर्ते होते, असा दावा एकनाथ खडसे यांनी केला होता. पत्रकारांच्या प्रश्नांवर महाजन यांनी प्रतिक्रिया दिली, "बरोबर आहे मी साधा कार्यकर्ताच आहे. लहानपणापासून मी संघाचा स्वयंसेवक आहे, खडसे साहेबांना म्हणा मी बाल स्वयंसेवक होतो,  मी भाजप युवा मोर्चाचा कार्यकर्ता होतो.  तालुक्याचा  त्यानंतर जिल्ह्याचा मग राज्याचा झालो. हे १९९० साली आले, मी शाळेत होतो, तेंव्हापासून शाखेत जात होतो. मी त्यांना कार्यकर्ता म्हणणार नाही,  त्यांना नेताच म्हणेल."असं महाजन यांनी म्हटलं आहे.


गेल्या काही दिवसांपासून एकनाथ शिंदे आणि अजित पवार नाराज असल्याची चर्चा सुरु आहे.  यावर देखील महाजन यांनी प्रतिक्रिया दिली. नाराजी मित्र पक्षातही असते काल आमची सर्वांची बैठक झाली. दोघांमध्ये कुठेही नाराजी नाही. नाराजी माध्यमांमधून दिसते आमच्या सर्वांमध्ये एकमत आहे. एकमतांच्या सल्ल्याने पुढच्या निवडणुका लढणार असे महाजन यांनी प्रतिक्रिया दिली..


Comments
Add Comment

थरारक! मेट्रो स्टेशनखालील खड्ड्यात अडकला तरूणाचा पाय, मोठ्या प्रयत्नाने केली सुटका

मुंबई: मुंबईत शुक्रवारी रात्री थरारक सुटकेची घटना घडली. जोगेश्वरी मेट्रो स्टेशनखाली असलेल्या खड्ड्यात तरूणाचा

गिरगावात आगीच्या दुर्घटनेत फूड स्टॉल जळून खाक

मुंबई: दक्षिण मुंबईतील गिरगाव येथे एका फूड स्टॉलला मोठी आग लागल्याची घटना घडली. या आगीच्या दुर्घटनेत हा फूड स्टॉल

भूखंड पालिकेचा की, खासगी विकासकांचा ?

पालिकेच्या नावाचे फलक बसवण्याची मागणी मुंबई (प्रतिनिधी) : उपनगरात बहुतांश ठिकाणी मनपा प्रशासनाचे मोकळे भूखंड,

मुबंईत येत्या मंगळवारपासून तीन दिवस १० टक्के पाणीकपात

मुंबई : मुंबई महानगरपालिकेस पाणीपुरवठा करणाऱ्या पिसे, पांजरापूर येथील जलशुद्धीकरण केंद्रातील १०० किलोव्हॅट

भायखळा-सायन स्थानकांदरम्यान पायाभूत कामांसाठी ब्लॉक

मुंबई (प्रतिनिधी) : सायन (शीव) आणि भायखळा अशा दोन रेल्वे स्थानकांवरील पादचारी पुलाच्या कामांसाठी मध्य रेल्वेकडून

पथदर्शी धोरणानुसार मुंबई महापालिकेच्या शाळा १० मजली होणार

मुंबई (प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेने आपल्या शाळांच्या जुन्या इमारतींचा पुनर्विकास करण्याचा निर्णय घेतला आहे.