"स्वबळाची परिक्षा होणार की नाही, पक्षातील वरिष्ठ नेते ठरवतील," गिरीश महाजन स्पष्टच बोलले...

मुंबई : राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचं बिगुल वाजल्यानंतर सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारीला सुरवात केली. तसेच महायुतीला विधानसभा निवडणुकीत बहुमत मिळालं होत. त्यानंतर राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाकडे सर्वांच लक्ष लागलं आहे. त्यामुळे या निवडणुकीत महायुतीला किती जागा जिंकता येणार याबाबत प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. निवडणुकी संदर्भात बोलताना भाजप नेते गिरीश महाजन यांनी मोठं वक्तव्य केले आहे.


महायुतीत जागा वाटपाचा निर्णय अद्याप झालेला नाही. विधानसभेत ज्या जागा पक्षाच्या चिन्हावर लढवल्या गेल्या, त्या जागा देखील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत लढवल्या जातील. कारण त्या जागा आमच्याच आहेत. जर युतीत गुंतागुंतीचा विषय ठरत असेल तर त्यावर चर्चा काढून तोडगा काढण्यात येईल. महायुतीतील सर्व घटक पक्षांचा विचार करुनच निडवणुकींचा निर्णय घेणार आहोत. फार काही तोडगा निघाला नाही तर मैत्री पूर्ण लढत होऊ शकते, तेसच स्वबळाची परिक्षा होणार की नाही, पक्षातील वरिष्ठ नेते ठरवतील. असंं गिरीष महाजन यांनी म्हटलं आहे.


खडसे साहेबांना सांगा मी बाल स्वयंसेवक होतो...


मी भाजपात होतो तेव्हा गिरीष महाजन सामान्य कार्यकर्ते होते, असा दावा एकनाथ खडसे यांनी केला होता. पत्रकारांच्या प्रश्नांवर महाजन यांनी प्रतिक्रिया दिली, "बरोबर आहे मी साधा कार्यकर्ताच आहे. लहानपणापासून मी संघाचा स्वयंसेवक आहे, खडसे साहेबांना म्हणा मी बाल स्वयंसेवक होतो,  मी भाजप युवा मोर्चाचा कार्यकर्ता होतो.  तालुक्याचा  त्यानंतर जिल्ह्याचा मग राज्याचा झालो. हे १९९० साली आले, मी शाळेत होतो, तेंव्हापासून शाखेत जात होतो. मी त्यांना कार्यकर्ता म्हणणार नाही,  त्यांना नेताच म्हणेल."असं महाजन यांनी म्हटलं आहे.


गेल्या काही दिवसांपासून एकनाथ शिंदे आणि अजित पवार नाराज असल्याची चर्चा सुरु आहे.  यावर देखील महाजन यांनी प्रतिक्रिया दिली. नाराजी मित्र पक्षातही असते काल आमची सर्वांची बैठक झाली. दोघांमध्ये कुठेही नाराजी नाही. नाराजी माध्यमांमधून दिसते आमच्या सर्वांमध्ये एकमत आहे. एकमतांच्या सल्ल्याने पुढच्या निवडणुका लढणार असे महाजन यांनी प्रतिक्रिया दिली..


Comments
Add Comment

Pune: दहावी-बारावी परीक्षेआधी पुणे प्रशासन ॲक्शन मोडवर; नियमांचे पालन न केल्यास होणार कडक कारवाई

पुणे: पुढील काही दिवसांमध्ये राज्यात सर्वत्र परीक्षांचे वारे वाहू लागणार आहेत. बारावीच्या परीक्षा १०

वांद्रे (पश्चिम) येथे ९०० मिलिमीटर व्यासाच्या जलवाहिनीला गळती, येत्या १० फेब्रुवारी २०२६ रोजी दुरुस्तीचे काम घेणार हाती

मुंबई :  एच पश्चिम विभागातील काही भागांचा पाणीपुरवठा राहणार बंद; काही भागात कमी दाबाने पाणीपुरवठा पाली हिल

खेळाडूंना ५ टक्के आरक्षणाचा लाभ जलदगतीने मिळण्यासाठी ब्लॉकचेन तंत्रज्ञान वापरण्यास मान्यता

मुंबई : गुणवत्ताधारक शासकीय व निमशासकीय सेवेमधील ५ टक्के आरक्षणाचा लाभ खेळाडूंना पारदर्शक, जलद व त्रुटीमुक्त

मुंबईच्या महापौर पदासाठी रितू तावडे आणि उपमहापौर संजय घाडी यांची उमेदवारी जाहीर; महापालिका राजकारणात नव्या पर्वाची सुरुवात

मुंबई विशेष प्रतिनिधी : मुंबई महानगरपालिकेच्या महापौर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज महापालिका राजकारणात मोठी

मुंबई महापालिकेचे महापौर आणि उपमहापौरपदाचे उमेदवार जाहीर

मुंबई : मुंबई महापालिकेच्या निवडणुकीचा निकाल १६ जानेवारी २०२६ रोजी जाहीर झाला. निकालानंतर महायुतीचाच महापौर

अजित पवारांच्या खासगी सचिवाची कसून चौकशी

मुंबई : अजित पवारांचे बारामती विमानतळाच्या धावपट्टीजवळ विमान अपघातात निधन झाले. या प्रकरणी राज्याच्या गुन्हे