"स्वबळाची परिक्षा होणार की नाही, पक्षातील वरिष्ठ नेते ठरवतील," गिरीश महाजन स्पष्टच बोलले...

  78

मुंबई : राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचं बिगुल वाजल्यानंतर सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारीला सुरवात केली. तसेच महायुतीला विधानसभा निवडणुकीत बहुमत मिळालं होत. त्यानंतर राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाकडे सर्वांच लक्ष लागलं आहे. त्यामुळे या निवडणुकीत महायुतीला किती जागा जिंकता येणार याबाबत प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. निवडणुकी संदर्भात बोलताना भाजप नेते गिरीश महाजन यांनी मोठं वक्तव्य केले आहे.


महायुतीत जागा वाटपाचा निर्णय अद्याप झालेला नाही. विधानसभेत ज्या जागा पक्षाच्या चिन्हावर लढवल्या गेल्या, त्या जागा देखील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत लढवल्या जातील. कारण त्या जागा आमच्याच आहेत. जर युतीत गुंतागुंतीचा विषय ठरत असेल तर त्यावर चर्चा काढून तोडगा काढण्यात येईल. महायुतीतील सर्व घटक पक्षांचा विचार करुनच निडवणुकींचा निर्णय घेणार आहोत. फार काही तोडगा निघाला नाही तर मैत्री पूर्ण लढत होऊ शकते, तेसच स्वबळाची परिक्षा होणार की नाही, पक्षातील वरिष्ठ नेते ठरवतील. असंं गिरीष महाजन यांनी म्हटलं आहे.


खडसे साहेबांना सांगा मी बाल स्वयंसेवक होतो...


मी भाजपात होतो तेव्हा गिरीष महाजन सामान्य कार्यकर्ते होते, असा दावा एकनाथ खडसे यांनी केला होता. पत्रकारांच्या प्रश्नांवर महाजन यांनी प्रतिक्रिया दिली, "बरोबर आहे मी साधा कार्यकर्ताच आहे. लहानपणापासून मी संघाचा स्वयंसेवक आहे, खडसे साहेबांना म्हणा मी बाल स्वयंसेवक होतो,  मी भाजप युवा मोर्चाचा कार्यकर्ता होतो.  तालुक्याचा  त्यानंतर जिल्ह्याचा मग राज्याचा झालो. हे १९९० साली आले, मी शाळेत होतो, तेंव्हापासून शाखेत जात होतो. मी त्यांना कार्यकर्ता म्हणणार नाही,  त्यांना नेताच म्हणेल."असं महाजन यांनी म्हटलं आहे.


गेल्या काही दिवसांपासून एकनाथ शिंदे आणि अजित पवार नाराज असल्याची चर्चा सुरु आहे.  यावर देखील महाजन यांनी प्रतिक्रिया दिली. नाराजी मित्र पक्षातही असते काल आमची सर्वांची बैठक झाली. दोघांमध्ये कुठेही नाराजी नाही. नाराजी माध्यमांमधून दिसते आमच्या सर्वांमध्ये एकमत आहे. एकमतांच्या सल्ल्याने पुढच्या निवडणुका लढणार असे महाजन यांनी प्रतिक्रिया दिली..


Comments
Add Comment

पवईतील गोविंदाचा उपचारादरम्यान मृत्यू

मुंबई : विक्रोळीच्या कन्नमवार नगरमध्ये आमदार सुनील राऊत यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या तब्बल २५

लालबागच्या राजाचं पहिलं दर्शन, सुवर्ण गजानन महालात शाही थाटात आगमन !

मुंबई: मुंबईत गणेशोत्सवाची सुरुवात होते ती लालबागच्या राजाच्या आगमनाने. यंदाही गणेशोत्सवापूर्वी लालबागच्या

मालाडमध्ये वैष्णवी हाइट्सला आग

मुंबई : मुंबईच्या पश्चिम उपनगरातून आगीची बातमी आली आहे. मालाड पूर्व येथे राणी सती मार्गावर असलेल्या वैष्णवी

एअरटेल कंपनीचे मोबाईल नेटवर्क कोलमडले, ग्राहक त्रस्त

मुंबई : देशभरात एअरटेलचे नेटवर्क पुन्हा एकदा बंद पडले आहे. हजारो ग्राहकांना कॉलिंग आणि इंटरनेट सेवेचा वापर करणे

मुंबईच्या राजाच्या आरतीचा मान यंदा 'कोकण नगर गोविंदा पथकाला

मुंबई: मुंबईचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यंदा आपला ९८ वा गणेशोत्सव साजरा करत आहे. गेली अनेक वर्षे सामाजिक

रोहिंग्या बांगलादेशींसाठी मनपा शाळांच्या जमिनी हडपण्याचा प्रयत्न?

लोढा यांचा रोखठोक सवाल मुंबई : मुंबई महापालिकेच्या शासन निर्णयानुसार महापालिकेच्या शाळा चालवण्यासाठी कोणतीही