डॉक्टरकडून सहकारी महिला डॉक्टरला गंडा

विवाहाचे आमिष; साडेसात लाखांची फसवणूक


नाशिक : समाजमाध्यमाद्वारे महिलेशी ओळख करून तिला लग्न करण्याचे आमिष दाखवून, एका तरुणाने महिलेला साडेसात लाख रुपयांचा गंडा घातल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पीडित महिलेच्या फिर्यादीनुसार आरोपी स्वप्नील देवरे याच्याविरुद्ध सरकारवाडा पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक डंबाळे करीत आहेत.


याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी महिला ही ३५ वर्षीय असून, ती मूळची जळगावची राहणारी असून, मुंबई येथे नोकरी करते. आरोपी स्वप्नील संजय देवरे (वय ३५, रा. बळीराज मंदिराजवळ, नाशिक) याने मार्च २०२५ ते दि. २२ जून २०२५ या कालावधीत नाशिकच्या सिव्हिल हॉस्पिटल येथे फिर्यादी महिलेशी ओळख केली.


त्यानंतर जीवनसाथी मेट्रोमोनी व फेसबुक या ऑनलाईन अ‍ॅपद्वारे फिर्यादीशी अधिकची ओळख केली. त्यानंतर फिर्यादी व त्यांच्या मुलांची अधिकची काळजी घेत असल्याचे भासवून आपण लवकरच लग्न करू, असे फिर्यादीला वारंवार सांगून फिर्यादीचा विश्‍वास संपादन केला. त्यानंतर आरोपी स्वप्नील देवरे याने त्याच्या कोटक महिंद्रा बँक, पिंपळगाव बसवंत शाखेच्या अकाऊंटवर फिर्यादीच्या स्टेट बँक भुसावळ शाखेच्या खात्यावरून ८० हजार रुपये, दि. ६ एप्रिल रोजी पाच लाख रुपये, दि. १० एप्रिल रोजी १ लाख ५० हजार रुपये व २८ एप्रिल २०२५ रोजी फिर्यादी महिलेच्या आयसीआयसीआय बँकेच्या चाळीसगाव शाखेच्या खात्यावरून आरोपी देवरे यांच्या कोटक महिंद्रा बँकेच्या खात्यावर फोन पेद्वारे ३० हजार रुपये अशी एकूण ७ लाख ६० हजार रुपये इतकी रक्कम स्वीकारली; मात्र ही रक्कम फिर्यादीला परत न करता महिलेची आर्थिक फसवणूक केली. महिलांनी समाज माध्यम वापरताना काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहेत.

Comments
Add Comment

अशोक खरात कारनाम्याचा भांडाफोड, १८ मार्च रोजी कसा झाला आरोपी?, जाणून घ्या

नाशिक: बड्या बेड्या नेत्यांचा 'गुरु' असलेल्या कॅप्टन अशोक खरातच्या कारनाम्याचा भांडाफोड सुरू झाला आहे. जवळपास ५८

सोसाट्याचा वाऱ्यासह गाराचा पाऊस पडणार, हवामान विभागाकडून पाच जिल्ह्यांना अलर्ट

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा चटका सोसणाऱ्या महाराष्ट्रासाठी हवामान खात्याने महत्त्वाची अपडेट दिली

पेपर सुरु असताना विद्यार्थिंनीसोबत घडला लाजिरवाणा प्रकार, नेमकं घडलं काय?

नाशिक: नाशिकमध्ये माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली. १३ मार्च रोजी दहावीचा पेपर सुरू असताना एका

सहावीत शिकणाऱ्या मुलीवर ॲसिड हल्ला करणाऱ्या आरोपीचे रेखाचित्र जारी; पोलिसांनी केलं आवाहन

संगमनेर: अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील ॲसिड हल्ला प्रकरणामुळे राज्यभरात खळबळ उडाली आहे. एका सहा

ठाणे पूर्व येथील श्री जय अंबे माता नवरात्रोत्सव मंडळाच्या देवीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न; उपमुख्यमंत्री शिंदेंनी केली सहकुटुंब देवीची पूजा

ठाणे: चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे

‘गाळमुक्त धरण-गाळयुक्त शिवार'मुळे भागली ११ हजार गावांची तहान

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची संकल्पना; ७७ लाख टँकर क्षमतेचा पाणीसाठा पुनर्संचयित, ७.७३ कोटी घनमीटर गाळ