आषाढ वारीत डीजे, साउंड सिस्टिम टाळा

काटेवाडी : संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या आषाढ पालखी सोहळ्यामध्ये टाळ, मृदंग, वीणा आणि अखंड चालणारा नामघोष यांचा भक्तिमय नाद हा वारीचा आत्मा आहे. ही पारंपरिक वाद्ये वारकऱ्यांच्या भक्तीला सूर देतात आणि पालखी मार्गावर आध्यात्मिक वातावरण निर्मिती करतात. मात्र, काही ठिकाणी पालखीच्या स्वागतासाठी लावण्यात येणाऱ्या डीजे आणि मोठ्या साउंड सिस्टीममुळे हा मंगलमय नाद दबला जात आहे. यामुळे वारकऱ्यांमध्ये नाराजी आहे. पालखीचे स्वागत साध्या पद्धतीने, लेझीम, टाळ, मृदंग आणि वीणेच्या भक्तिमय नादात करावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.



टाळ, मृदंग आणि वीणा ही वाद्ये आषाढ वारीच्या परंपरेचा अविभाज्य भाग आहेत. ही वाद्ये केवळ संगीतमय नाहीत, तर ती वारकऱ्यांच्या श्रद्धेचे प्रतीक आहेत, जी पिढ्यानपिढ्या चालत आली आहेत. या वाद्यांच्या नादातून संतांच्या भक्तीचा आणि त्यागाचा संदेश पालखी मार्गावर पसरतो. दोन वर्षांपूर्वी पालखी मार्गावर डीजे आणि साउंड सिस्टीमचा प्रचंड दणदणाट ऐकू येत असे. यामुळे वारकऱ्यांना भजन, अभंग, काकडा, मंगलचरण आणि हरिपाठ गायन थांबवावे लागत होते. प्रशासनाने यावर काही प्रमाणात नियंत्रण आणले असले, तरी पूर्णपणे बंदी आलेली नाही. यामुळे पालखी सोहळ्याच्या पावित्र्याला आणि शांतीला बाधा येत आहे. त्यामुळे वारकऱ्यांनी प्रशासनाकडे डीजे आणि साउंड सिस्टीमवर पूर्णपणे बंदी घालण्याची मागणी केली आहे.

Comments
Add Comment

नागपूर AIMS मधील विद्यार्थ्यांच्या जेवणात आढळल्या चक्क अळ्या..... सोशल मीडियावर चर्चेला उधाण

नागपूर : अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी आपल्या घरापासून दूर असतात. अशावेळी जेवणाची सोय होते ती खाणावळीतून किंवा

Pune ZP News : पुणे : राजकीय हालचालींना वेग; अध्यक्षपदाची खुर्ची कोणाची? निवडीची तारीख ठरली

पुणे : राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांचा धुराळा शांत झाल्यानंतर आता खऱ्या

DA Hike: राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ

मुंबई: राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वीच मोठी आनंदवार्ता जाहीर करण्यात आली आहे.

राज्यात रस्ता अपघाती मृत्यूंमध्ये ८ टक्क्यांची घट; परिवहन विभागाकडून आकडेवारी जाहीर

- २०३० पर्यंत अपघात निम्म्यावर आणण्याचे परिवहन विभागाचे उद्दिष्ट मुंबई : राज्यात रस्ता सुरक्षेसाठी परिवहन

भिगवण प्रकरणात मोठा ट्विस्ट; पाच दिवसात तरुणीने बदलला निर्णय

पुणे : महाष्ट्राभर चर्चा असलेल्या भिगवण प्रकरणात अनेक दावे , प्रतिदावे समोर येत होते, पण आता स्वतः मुलीनेच

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाकडून ४२ मौलिक ग्रंथांचे प्रकाशन

मुंबई : मराठी भाषा गौरव दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळातर्फे यंदा ४२ मौलिक ग्रंथांचे