आषाढ वारीत डीजे, साउंड सिस्टिम टाळा

काटेवाडी : संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या आषाढ पालखी सोहळ्यामध्ये टाळ, मृदंग, वीणा आणि अखंड चालणारा नामघोष यांचा भक्तिमय नाद हा वारीचा आत्मा आहे. ही पारंपरिक वाद्ये वारकऱ्यांच्या भक्तीला सूर देतात आणि पालखी मार्गावर आध्यात्मिक वातावरण निर्मिती करतात. मात्र, काही ठिकाणी पालखीच्या स्वागतासाठी लावण्यात येणाऱ्या डीजे आणि मोठ्या साउंड सिस्टीममुळे हा मंगलमय नाद दबला जात आहे. यामुळे वारकऱ्यांमध्ये नाराजी आहे. पालखीचे स्वागत साध्या पद्धतीने, लेझीम, टाळ, मृदंग आणि वीणेच्या भक्तिमय नादात करावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.



टाळ, मृदंग आणि वीणा ही वाद्ये आषाढ वारीच्या परंपरेचा अविभाज्य भाग आहेत. ही वाद्ये केवळ संगीतमय नाहीत, तर ती वारकऱ्यांच्या श्रद्धेचे प्रतीक आहेत, जी पिढ्यानपिढ्या चालत आली आहेत. या वाद्यांच्या नादातून संतांच्या भक्तीचा आणि त्यागाचा संदेश पालखी मार्गावर पसरतो. दोन वर्षांपूर्वी पालखी मार्गावर डीजे आणि साउंड सिस्टीमचा प्रचंड दणदणाट ऐकू येत असे. यामुळे वारकऱ्यांना भजन, अभंग, काकडा, मंगलचरण आणि हरिपाठ गायन थांबवावे लागत होते. प्रशासनाने यावर काही प्रमाणात नियंत्रण आणले असले, तरी पूर्णपणे बंदी आलेली नाही. यामुळे पालखी सोहळ्याच्या पावित्र्याला आणि शांतीला बाधा येत आहे. त्यामुळे वारकऱ्यांनी प्रशासनाकडे डीजे आणि साउंड सिस्टीमवर पूर्णपणे बंदी घालण्याची मागणी केली आहे.

Comments
Add Comment

जालन्यात मतदानासाठी बाहेर पडलेल्या मतदारांवर पिसाळलेल्या कुत्र्याचा हल्ला

जालना : जालना शहरात मतदानासाठी बाहेर पडलेल्या मतदारांवर एका पिसाळलेल्या कुत्र्याने हल्ला केल्याची धक्कादायक

मतदानानंतर सुबोध भावेंची स्पष्ट भूमिका अन् पुण्यात रंगली 'ती' एकच चर्चा

पुणे: पुणे महापालिका निवडणुकीसाठी शहरात मतदानाचा उत्साह पाहायला मिळत असताना, मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेता

Latur : महिन्याभरापूर्वी निवडणूक जिंकली आणि उपचारांअभावी गेली

लातूर : लातूर जिल्ह्यात मन हेलावणारी घटना घडली आहे. अहमदपूर शहरातून ही घटना समोर आली आहे. नुकत्याच झालेल्या

Kolhapur Crime : आईच्या आजारपणाचा गैरफायदा घेत मुख्याद्यापकानेच विद्यार्थिनीला फ्लॅटवर नेत...

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील एका आश्रमशाळेशी संबंधित प्रकरणामुळे खळबळ उडाली आहे.

दौंडमध्ये राजकीय कार्यकर्त्यावर भररस्त्यात हल्ला; पोलीस ठाण्याजवळच घडले 'हे' धक्कादायक दृश्य

पुणे : पुणे जिल्ह्यातील दौंड शहरात घडलेल्या एका घटनेमुळे स्थानिक कायदा-सुव्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह

पैशांच्या वादातून मित्रानेच केली मित्राची हत्या ...आरोपीला ट्रेनमध्ये पकडलं..!

पुणे/रायगड : रायगड जिल्ह्यातील ताम्हिणी घाट परिसरात पैशाच्या वादातून घडलेली मित्रामधील हत्येची घटना समाजात