चेंबूरमध्ये एसटी बस थांब्यामुळे प्रवास होणार सुखकर

मुंबई : चेंबूरमधील खारदेव नगर, घाटला परिसरातील स्थानिकांचा लांब पल्याचा प्रवास आता सुखकर होणार आहे. वैभव नगर येथे राज्य परिवहन सेवेचा (एसटी) बसथांबा उभारण्यात यावा, ही स्थानिकांची मागणी अखेर प्रत्यक्षात उतरली असून माजी खासदार राहुल शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेल्या पाठपुराव्यानंतर उभारण्यात आलेल्या नव्या एसटी थांब्याचे लोकार्पण नुकतेच करण्यात आले.


यावेळी शिवसेना विभागप्रमुख अविनाश राणे, सांगली जिल्हा विकास संघाचे अध्यक्ष संभाजी लोखंडे, महिला विभागप्रमुख सुनिता वैती, सहसंपर्क प्रमुख दीपक महेश्वरी, विधानसभा प्रमुख संजय राठोड, मुंबई व्यापारी सेल अध्यक्ष लक्ष्मण कोठारी, विधानसभा संघटक भास्कर चव्हाण, उपविभागप्रमुख योगेश पाटील, शाखा संघटिका किशोरी कडू, शाखासमन्वयक चेतन ढमाले अन्य पदाधिकारी, शिवसैनिक आणि स्थानिक रहिवासी उपस्थित होते.


चेंबूरच्या घाटला परिसरात असलेल्या मध्यमवर्गीय वस्तीत मोठ्या संख्येने सांगली, सातारा, पुणे, कोल्हापूर या पश्चिम महाराष्ट्रातील नागरिक अनेक पिढ्यांपासून वास्तव्य करत आहेत. या नागरिकांना त्यांच्या गावी जाण्यासाठी सायन- पनवेल महामार्गावरील मैत्री पार्क येथील एसटी थांब्यावर जावे लागत होते. मात्र, इतक्या मोठ्या लोकसंख्येच्या ठिकाणी नागरिकांच्या सुविधेसाठी एसटी बस थांबा उभारावा, अशी स्थानिकांची मागणी होती. ही मागणी संभाजी लोखंडे यांनी माजी खासदार राहुल शेवाळे यांच्याकडे मांडली होती. शेवाळे यांनी परिवहन विभागाकडे पत्रव्यवहार करून ही मागणी प्रत्यक्षात आणली.

Comments
Add Comment

शाई पुसून पुन्हा मतदान करणे शक्य नाही!

राज्य निवडणूक आयुक्तांचे स्पष्टीकरण; मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न मुंबई : महापालिका

Ashish Shelar : मेंदूत केमिकल लोचा अन् हातावर...'रडके' म्हणत आशिष शेलारांनी ठाकरे बंधूना काढला चिमटा

मुंबई : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज उत्साहात मतदान पार पडत असतानाच, शाईच्या

मतदानानंतर बोटावर शाई का लावली जाते? हात किंवा बोट नसल्यास काय असते नियम?

मुंबई : राज्यातील अनेक महापालिकांमध्ये आज मतदान प्रक्रिया सुरू असून नागरिक उत्साहाने आपला मतदानाचा हक्क बजावत

'मशिदीवर पुन्हा भोंगे लावण्याचे उबाठाचे वचन'

मुंबई :मशिदीवरील भोंगे पुन्हा लावण्याचे वचन देत उद्धव ठाकरेंनी निवडणूक प्रचार केला, असा गंभीर आरोप मुख्यमंत्री

मुंबईत दुपारी दीड वाजेपर्यंत २९.९६ टक्के मतदान

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईसह राज्यातील २९ महापालिकांसाठी मतदान सुरू आहे.

मुंबईच्या इस्लामीकरणाचे षडयंत्र ‘टीस’च्या अहवालातून उघड

मुंबई  : २०५१ पर्यंत मुंबईतील हिंदू लोकसंख्या केवळ ५४ टक्के उरेल, अशी धक्कादायक माहिती देशातील अग्रगण्य टाटा