चेंबूरमध्ये एसटी बस थांब्यामुळे प्रवास होणार सुखकर

  30

मुंबई : चेंबूरमधील खारदेव नगर, घाटला परिसरातील स्थानिकांचा लांब पल्याचा प्रवास आता सुखकर होणार आहे. वैभव नगर येथे राज्य परिवहन सेवेचा (एसटी) बसथांबा उभारण्यात यावा, ही स्थानिकांची मागणी अखेर प्रत्यक्षात उतरली असून माजी खासदार राहुल शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेल्या पाठपुराव्यानंतर उभारण्यात आलेल्या नव्या एसटी थांब्याचे लोकार्पण नुकतेच करण्यात आले.


यावेळी शिवसेना विभागप्रमुख अविनाश राणे, सांगली जिल्हा विकास संघाचे अध्यक्ष संभाजी लोखंडे, महिला विभागप्रमुख सुनिता वैती, सहसंपर्क प्रमुख दीपक महेश्वरी, विधानसभा प्रमुख संजय राठोड, मुंबई व्यापारी सेल अध्यक्ष लक्ष्मण कोठारी, विधानसभा संघटक भास्कर चव्हाण, उपविभागप्रमुख योगेश पाटील, शाखा संघटिका किशोरी कडू, शाखासमन्वयक चेतन ढमाले अन्य पदाधिकारी, शिवसैनिक आणि स्थानिक रहिवासी उपस्थित होते.


चेंबूरच्या घाटला परिसरात असलेल्या मध्यमवर्गीय वस्तीत मोठ्या संख्येने सांगली, सातारा, पुणे, कोल्हापूर या पश्चिम महाराष्ट्रातील नागरिक अनेक पिढ्यांपासून वास्तव्य करत आहेत. या नागरिकांना त्यांच्या गावी जाण्यासाठी सायन- पनवेल महामार्गावरील मैत्री पार्क येथील एसटी थांब्यावर जावे लागत होते. मात्र, इतक्या मोठ्या लोकसंख्येच्या ठिकाणी नागरिकांच्या सुविधेसाठी एसटी बस थांबा उभारावा, अशी स्थानिकांची मागणी होती. ही मागणी संभाजी लोखंडे यांनी माजी खासदार राहुल शेवाळे यांच्याकडे मांडली होती. शेवाळे यांनी परिवहन विभागाकडे पत्रव्यवहार करून ही मागणी प्रत्यक्षात आणली.

Comments
Add Comment

उद्धव ठाकरे आणि आव्हाडांच्या भूमिकेवर भाजपचा सवाल

हिंदूंना बदनाम करण्याच्या आव्हाडांच्या आरोपांशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का? भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये

लोकलमध्येही महिला सुरक्षित नाहीत ! पोलिसानेच केले महिलेसोबत घाणेरडे कृत्य

मुंबई : मुंबई लोकलमधील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित झाला आहे . सुरक्षेसाठी नेमलेले

मोठी बातमी : आता ‘पॅन २.०’ येणार! जुन्या 'पॅन कार्ड' चे काय होणार?

नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांत पॅन २.० सातत्याने चर्चेत आहे. आयकर विभागाने PAN २.०च्या आधुनिकीकरणासाठी मोठं पाऊल

Housing Jihad: धक्कादायक! हिंदूंची घरं मुस्लिमांना देऊन बिल्डरांकडून मुंबईत हाऊसिंग जिहाद

हिंदू दहशतवाद म्हणणाऱ्या काँग्रेसवाल्यांसोबत डिनर करणाऱ्या उबाठावर संजय निरुपम यांचा घणाघात मुंबई: पश्चिम

गणेशभक्तांच्या सोयीसाठी गणेशोत्सवात रात्री उशिरापर्यंत लोकल आणि मेट्रो सुरु ठेवावी: मंत्री मंगलप्रभात लोढा

जनतेच्या मागणीसाठी रेल्वे आणि मेट्रो प्रशासनासोबत पाठपुरावा करणार मुंबई: महाराष्ट्र आणि मुंबई एमएमआर परिसरात

मुंबईत ५१ कबुतरखाने बंद... पक्ष्यांना खायला घालण्यास पूर्णपणे बंदी! आतापर्यंत १०० जणांहून अधिक लोकांना ठोठावला दंड

मुंबई: कबुतरांना खायला देण्यावरील बंदी लागू झाल्यापासून, बीएमसीने दादर कबुतरखान्यात १०० हून अधिक लोकांना दंड