चेंबूरमध्ये एसटी बस थांब्यामुळे प्रवास होणार सुखकर

मुंबई : चेंबूरमधील खारदेव नगर, घाटला परिसरातील स्थानिकांचा लांब पल्याचा प्रवास आता सुखकर होणार आहे. वैभव नगर येथे राज्य परिवहन सेवेचा (एसटी) बसथांबा उभारण्यात यावा, ही स्थानिकांची मागणी अखेर प्रत्यक्षात उतरली असून माजी खासदार राहुल शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेल्या पाठपुराव्यानंतर उभारण्यात आलेल्या नव्या एसटी थांब्याचे लोकार्पण नुकतेच करण्यात आले.


यावेळी शिवसेना विभागप्रमुख अविनाश राणे, सांगली जिल्हा विकास संघाचे अध्यक्ष संभाजी लोखंडे, महिला विभागप्रमुख सुनिता वैती, सहसंपर्क प्रमुख दीपक महेश्वरी, विधानसभा प्रमुख संजय राठोड, मुंबई व्यापारी सेल अध्यक्ष लक्ष्मण कोठारी, विधानसभा संघटक भास्कर चव्हाण, उपविभागप्रमुख योगेश पाटील, शाखा संघटिका किशोरी कडू, शाखासमन्वयक चेतन ढमाले अन्य पदाधिकारी, शिवसैनिक आणि स्थानिक रहिवासी उपस्थित होते.


चेंबूरच्या घाटला परिसरात असलेल्या मध्यमवर्गीय वस्तीत मोठ्या संख्येने सांगली, सातारा, पुणे, कोल्हापूर या पश्चिम महाराष्ट्रातील नागरिक अनेक पिढ्यांपासून वास्तव्य करत आहेत. या नागरिकांना त्यांच्या गावी जाण्यासाठी सायन- पनवेल महामार्गावरील मैत्री पार्क येथील एसटी थांब्यावर जावे लागत होते. मात्र, इतक्या मोठ्या लोकसंख्येच्या ठिकाणी नागरिकांच्या सुविधेसाठी एसटी बस थांबा उभारावा, अशी स्थानिकांची मागणी होती. ही मागणी संभाजी लोखंडे यांनी माजी खासदार राहुल शेवाळे यांच्याकडे मांडली होती. शेवाळे यांनी परिवहन विभागाकडे पत्रव्यवहार करून ही मागणी प्रत्यक्षात आणली.

Comments
Add Comment

ठाकरे बंधूंची युती, पण उबाठा आणि मनसैनिकांची दिलजमाई कुठे?

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : महापालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उबाठा आणि मनसेच्या युतीची जाहीर घोषण

एनबीसीसी आणि मुंबई बंदर प्राधिकरणामध्ये मुंबईतील विकासासाठी सामंजस्य करार

मुंबई : एनबीसीसी (इंडिया) लिमिटेड आणि मुंबई बंदर प्राधिकरण (एमबीपीए) यांनी मुंबई पोर्टच्या जमिनीवर विविध विकास

वायुप्रदूषण नियम उल्लंघनावरून उच्च न्यायालय आक्रमक

पालिका आयुक्त आणि एमपीसीबी सचिवांना प्रत्यक्ष हजर राहण्याचे आदेश मुंबई : फोर्ट, वरळी, बीकेसी, अंधेरी, चकाला आदी

मनसेतून उबाठात गेलेल्यांची उमेदवारी अडचणीत?

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भूमिका निर्णायक ठरणार मुंबई : उबाठा गट आणि मनसेची युती झाल्याने दोन्ही पक्षातील

प्रभादेवीतील प्रभाग १९४ मनसेला सोडण्यास उबाठा गटाचा विरोध

मनसेला सोडल्यास उबाठात बंडखोरी होण्याची शक्यता मुंबई : दोन्ही ठाकरे बंधूंनी युतीची घोषणा केल्यांनतर आता जागा

विरार-अलिबाग प्रकल्पाला येणार गती

हुडकोकडून २२ हजार ५०० कोटींचे कर्ज उपलब्ध मुंबई : विरार-अलिबाग बहुउद्देशीय मार्गिकेच्या प्रकल्पाला आता गती