चेंबूरमध्ये एसटी बस थांब्यामुळे प्रवास होणार सुखकर

मुंबई : चेंबूरमधील खारदेव नगर, घाटला परिसरातील स्थानिकांचा लांब पल्याचा प्रवास आता सुखकर होणार आहे. वैभव नगर येथे राज्य परिवहन सेवेचा (एसटी) बसथांबा उभारण्यात यावा, ही स्थानिकांची मागणी अखेर प्रत्यक्षात उतरली असून माजी खासदार राहुल शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेल्या पाठपुराव्यानंतर उभारण्यात आलेल्या नव्या एसटी थांब्याचे लोकार्पण नुकतेच करण्यात आले.


यावेळी शिवसेना विभागप्रमुख अविनाश राणे, सांगली जिल्हा विकास संघाचे अध्यक्ष संभाजी लोखंडे, महिला विभागप्रमुख सुनिता वैती, सहसंपर्क प्रमुख दीपक महेश्वरी, विधानसभा प्रमुख संजय राठोड, मुंबई व्यापारी सेल अध्यक्ष लक्ष्मण कोठारी, विधानसभा संघटक भास्कर चव्हाण, उपविभागप्रमुख योगेश पाटील, शाखा संघटिका किशोरी कडू, शाखासमन्वयक चेतन ढमाले अन्य पदाधिकारी, शिवसैनिक आणि स्थानिक रहिवासी उपस्थित होते.


चेंबूरच्या घाटला परिसरात असलेल्या मध्यमवर्गीय वस्तीत मोठ्या संख्येने सांगली, सातारा, पुणे, कोल्हापूर या पश्चिम महाराष्ट्रातील नागरिक अनेक पिढ्यांपासून वास्तव्य करत आहेत. या नागरिकांना त्यांच्या गावी जाण्यासाठी सायन- पनवेल महामार्गावरील मैत्री पार्क येथील एसटी थांब्यावर जावे लागत होते. मात्र, इतक्या मोठ्या लोकसंख्येच्या ठिकाणी नागरिकांच्या सुविधेसाठी एसटी बस थांबा उभारावा, अशी स्थानिकांची मागणी होती. ही मागणी संभाजी लोखंडे यांनी माजी खासदार राहुल शेवाळे यांच्याकडे मांडली होती. शेवाळे यांनी परिवहन विभागाकडे पत्रव्यवहार करून ही मागणी प्रत्यक्षात आणली.

Comments
Add Comment

मिठी नदीच्या सफाईसाठी कुणी कंपनी पुढे येईना; स्थायी समितीत सविस्तर निवेदन करण्याचे अध्यक्षांचे प्रशासनाचे निर्देश

मुंबई: मुंबईतील मिठी नदीतील गाळ काढण्यासाठी नव्याने कंत्राटदार नियुक्त करण्यासाठी मागवलेल्या निविदेला

मृणालताई गोरे विस्तारित उड्डाणपूलाच्या वाढीव खर्चावरून शंका; स्थायी समितीचे सदस्य करणार प्रत्यक्ष जागेची पाहणी

मुंबई: मृणालताई गोरे रेल्वे उड्डाणपुलाला जोडणाऱ्या राम मंदिर रोड ते गोरेगाव पश्चिम पर्यंतच्या रिलीफ रोड

सहली आडून कंत्राटदारांचे खिसे भरण्याचा घाट भाजपने उधळला

मुंबई: मुंबई महापालिकेच्या शाळांमधील मुलांची राणीबाग आणि बोरीवली नॅशनल पार्कमध्ये सहल आयोजित करण्याचा

अखेर महापौर चषक स्पर्धा होणार; सन २०२६-२७ मध्ये होणाऱ्या महापौर चषक क्रीडा स्पर्धांसाठी पाच कोटी रुपये निधीची तरतूद

मुंबई: डिजिटल युगात मुले भ्रमणध्वनीभोवती गुरफटली आहेत. मुले मैदानी खेळ विसरली आहेत. मुलांचा ‘स्क्रीन टाईम’ कमी

मुंबई अखंडपणे धावण्यामागे महिलांचे योगदान मोठे; 'सावित्रीबाई फुले गौरव पुरस्कार’ सोहळ्याप्रसंगी महापौरांचे वक्तव्य

मुंबई: क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी समाजातील अन्यायाविरोधात उभे राहत मुलींसाठी शिक्षणाचा मार्ग खुला

'उबाठा' गटाला पुन्हा खिंडार? निम्म्याहून अधिक खासदार शिवसेनेच्या वाटेवर

- कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होताच 'धमाका' होणार; एकनाथ शिंदेंच्या दिल्ली दौऱ्यांनातर घडामोडींना वेग मुंबई :