आयर्नमॅनची अल्ट्रा मॅरेथॉनमध्ये यशस्वी धाव

शहापूर : जगातील सर्वात कठीण ‘अल्ट्रा मॅराथॉन कॉमरेड्स मॅराथॉन’ अंतर ९० कि.मी. साऊथ आफ्रिका या देशातील डर्बन ते पीटर्समार्गबर्ग शहरांमध्ये घेण्यात येते. या वर्षी सदर कॉमरेड मॅराथॉन स्पर्धा दिनांक ८ जून रोजी पार पडली. ही स्पर्धा सलग दोन वर्षं यशस्वीरित्या पूर्ण करून ठाणे वनवृत्तातील शहापूर वनविभागात वनपरिक्षेत्र अधिकारी वाशाळा या पदावर कार्यरत असलेले विशाल विठ्ठल गोदडे यांनी नवा विक्रम नोंदविला आहे.


असा विक्रम करणारे ते भारतीय वनविभागातील पहिलेच अधिकारी ठरले आहेत. सदरची स्पर्धा त्यांनी ११ तास ३२ मिनिटे एवढया वेळात पूर्ण केली आहे. तसेच गेल्या वर्षी ९ जून २०२४ रोजी ही स्पर्धा त्यांनी ११ तास ३५ मिनिटे एवढया वेळात पूर्ण केली होती. त्यासाठी त्यांना विशेष पदक प्राप्त झाले आहे.


यापूर्वी मलेशिया या देशातील लंकावी या ठिकाणी दिनांक ५ नोव्हेंबर, २०२२ रोजी झालेल्या जगातील सर्वात कठीण एक दिवसीय ‘आयर्नमॅन’ या स्पर्धेत सहभागी होऊन सदर स्पर्धा १५ तास ४३ मिनिटांत पूर्ण करुन पहिल्याच प्रयत्नात ‘आयर्नमॅन’ हा जागतिक बहुमानाचा किताब देखील त्यांनी मिळविलेला आहे.


सदरचा किताब मिळवणारे भारतीय वन विभागातील ते पहिलेच अधिकारी आहेत. त्यानंतर १० सप्टेंबर, २०२३ रोजी जगातील समुद्रसपाटीपासुन सर्वात उंच ठिकाणी होणारी लडाख मॅराथॉन देखील त्यांनी यशस्वीरित्या पूर्ण केलेली आहे. हे यश प्राप्त करण्यासाठी त्यांची पत्नी पूजा गोदडे यांची त्याचप्रमाणे कोच अमित कुमार यांचे मार्गदर्शन मोलाचे ठरले आहे.

Comments
Add Comment

कोकण रेल्वे मार्गावरील कोलमडलेल्या वेळापत्रकाची चौकशी करून ठोस उपाययोजना करा

एसएमएस प्रणाली अद्ययावत करून प्रवाशांना सुखकर प्रवासाची योग्य सेवा, सुविधा द्या खासदार नरेश म्हस्के यांचे

ठाण्यातील २३ जण दुबईत अडकले

ठाणे : इराण आणि इस्रायल यांच्यात सुरू असलेल्या युद्धपरिस्थितीचा आंतरराष्ट्रीय विमानसेवेवर परिणाम झाला असून

Udddhav Thackeray : उद्धव ठाकरेंना डोंबिवलीत मोठा धक्का! विभाग प्रमुखांसह शेकडो कार्यकर्त्यांच्या हाती 'धनुष्यबाण'

मुंबई : राज्यात नुकत्याच पार पडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे निकाल पाहता, भारतीय जनता

ठाणे आणि विरार बुलेट ट्रेन स्थानक होणार स्मार्ट; एमएमआरडीएचा मास्टर प्लॅन

प्रवाशांना अत्याधुनिक सोयी-सुविधा उपलब्ध ठाणे : मुंबई – अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पातील महाराष्ट्रातील ठाणे

पाणीटंचाई विरोधात पीएनटी कॉलनीतील नागरिकांचा कडोंमपा मुख्यालयावर मोर्चा

२५ दिवसांपासून पाणीपुरवठा बंद कल्याण : कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील डोंबिवली पूर्वेतील नांदिवली

मीरा-भाईंदरमधील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी महापौर सक्रिय

भाईंदर : शहरात दिवसेंदिवस वाढत चाललेली वाहतूक कोंडीची समस्या, त्यामुळे सामान्य नागरिकांना होणारा त्रास तसेच