Pandharpur : पंढरपुरात दुर्घटना! चंद्रभागा नदीत बुडून एका तरुणाचा मृत्यू...

पंढरपूर : पंढरपुरात पुराची परिस्थिती निर्माण होत असताना शुक्रवारी (दि.२०) चंद्रभागा नदीत एक दुर्घटना घडली. पुंडलिक मंदिराजवळ चंद्रभागा नदीत बुडून बेळगाव येथील एका तरुणाचा मृत्यू झाला आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, शुभम पावले (२७) या अस नदीत बुडून मृत्यू झालेल्या तरुणाचे नावं आहे.  शुभम आपल्या मित्रांसोबत विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी पंढरपुरात आला होता. शुक्रवारी (दि. २०) सकाळी तो मित्रांसह चंद्रभागा नदीत पवित्र स्नानासाठी गेला होता. मात्र, पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तो बुडाला. घटनेची माहिती मिळताच तातडीने शोधकार्य सुरू करण्यात आले. तब्बल ४ तासांच्या अथक प्रयत्नांनंतर शुभमचा मृतदेह शोधण्यात यश आले. या घटनेमुळे पंढरपूर आणि बेळगाव परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.



आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर चंद्रभागा नदीमध्ये पवित्र स्नानासाठी भाविकांची गर्दी वाढू लागली आहे. त्यातच गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे आषाढी यात्रेवर महापुराचे सावट निर्माण आहे. उजनीतून भीमा नदीत सोडण्यात येत असलेल्या पाण्यामुळे प्रशासनाने भाविकांना सतर्कतेचा इशारा गुरूवारी (दि. १९) दिला होता.आषाढीसारख्या पवित्र सोहळ्याच्या तोंडावर अशा घटना टाळण्यासाठी प्रशासनाने अधिक सतर्क राहण्याची गरज असल्याचे मत व्यक्त होत आहे.

Comments
Add Comment

वैमानिकाच्या सतर्कतेमुळे मोठे संकट टळले! नागपूरहून उड्डाण केलेल्या विमानाला धडकला पक्षी...

नागपूर: नागपूरहून दिल्लीला निघालेल्या एअर इंडियाच्या विमानावरील मोठे संकट टळले. विमानाने उड्डाण करताच

राज्यातील बांगलादेशी घुसखोरांना दणका! राज्य सरकारचे मोठे पाऊल, रेशनकार्ड पडताळणीचे आदेश

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात बांगलादेशी नागरिकांची घुसखोरी वाढत चालली आहे. याकरता राज्यभरात

‘एमयुएचएस’ च्‍या कुलगुरूपदी डॉ. अजय चंदनवाले

नाशिक : राज्‍य शासनाने वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाचे संचालक डॉ. अजय चंदनवाले यांची नियुक्‍ती ‘महाराष्‍ट्र

“मोदी मिशन हे पुस्तक पुढच्या पिढीला प्रेरणा देणारं”, 'मोदीज् मिशन' मधील काही भाग पाठ्यपुस्तकात समाविष्ट करावा; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सूचना

मुंबई :“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित ‘मोदीज् मिशन’ हे पुस्तक प्रत्येकाने वाचावे आणि संग्रहित

मुंबईनजिक बांधणार देशातील सर्वाधिक लांबीची भिंत! पण यामागचे कारण काय?

मुंबई : पालघर जिल्ह्यात बांधले जाणारे वाढवण बंदर हा केंद्र सरकारचा एक खूप महत्त्वाचा प्रकल्प आहे. या बंदरात

कार्तिकी वारीनिमित्त पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! मध्य रेल्वेकडून विशेष गाड्यांचे आयोजन

सोलापूर: येत्या काही दिवसांत पंढरपूर येथे कार्तिकी वारीचा सोहळा रंगणार आहे. यासाठी विविध राज्यातून वारकऱ्यांचा