उद्धव यांच्या टीकेला मुख्यमंत्र्यांनी असे दिले उत्तर

जळगाव : मराठी माणसांची युती होऊ नये म्हणून प्रयत्न सुरू असल्याची टीका उद्धव ठाकरेंनी गुरुवारी घेतलेल्या सभेतून केली. या टीकेबाबत प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारला. या प्रश्नाला मुख्यमंत्र्यांनी मार्मिक शब्दात उत्तर दिले. बोल बच्चनना मी उत्तरे देत नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

मुख्यमंत्री जळगाव येथे सार्वजनिक कार्यक्रमांसाठी म्हणून आले होते. या प्रसंगी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी मुख्यमंत्र्यांना उद्धव यांच्या भाषणाचा संदर्भ देत प्रश्न विचारले. मुख्यमंत्र्यांनी या प्रश्नांना मार्मिक उत्तर दिले. यानंतर मुख्यमंत्री इतर विषयांवर विस्तर बोलले.

नेमके काय म्हणाले उद्धव ठाकरे ?

मुंबईत गुरुवार १९ जून रोजी घेतलेल्या सभेत उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली. मराठी माणसाची शक्ती एकत्र येऊ नये म्हणून यांच्या मालकाचे नोकर इकडे तिकडे गाठीभेटी घेत आहेत, असे उद्धव ठाकरे म्हणाले.



काय म्हणाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ?

उद्धव ठाकरेंच्या वक्तव्याबाबत प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रतिक्रिया विचारली. यावेळी बोलताना, बोल बच्चनना मी उत्तरे देत नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. आमदार एकनाथ खडसे कार्यक्रमाला येणार का, या प्रश्नावर माहिती नाही, असे मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिले.
Comments
Add Comment

'उबाठा' पुन्हा फुटली; सहा खासदार शिंदेंच्या गळाला

संजय राऊत यांचाही दुजोरा; एकनाथ शिंदे तातडीने दिल्लीत दाखल मुंबई : शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या तोंडावर

Commissioner Dr. Ashwini Joshi : अतिरिक्त आयुक्त डॉ. अश्विनी जोशी यांची बदली

प्राजक्ता लवंगारे-वर्मा यांची नियुक्ती मुंबई  : मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त डॉ. अश्विनी जोशी यांची

Madhuri Vantara : 'वनतारा'च्या उपचारांनी 'माधुरी' हत्तीण झाली ठणठणीत, लवकरच कोल्हापूरला परतणार

जामनगर: गंभीर आजारपण आणि दोन्ही पायांच्या हाडांच्या दुखापतीमुळे मृत्यूच्या छायेत असलेल्या 'माधुरी' नावाच्या

Water Shortage : पाणीटंचाईचे सावट गडद

जलतरण तलाव व बांधकामांच्या जलजोडण्या खंडित ; उद्योगांना २० टक्के कपात मुंबई : नैऋत्य मोसमी पावसाचे आगमन

Sanchita Suicide Case : संचिता उगले आत्महत्या प्रकरणात आता नव्हे वळण ; मैत्रिणीने सांगितलं एक नवीन सत्य

मुंबई : टीव्हीविश्वात निवडक भूमिका केलेल्या २२ वर्षांच्या संचिता उगलेने आत्महत्या केल्यामुळे संपूर्ण

Alternative Transport Hub : बोरिवली स्थानकावरील गर्दी कमी होणार; कांदिवलीचा 'पर्यायी वाहतूक केंद्र' म्हणून विकास

मुंबई: पश्चिम रेल्वेवरील सर्वात वर्दळीचे स्थानक असलेल्या बोरिवली स्थानकावरील प्रवाशांचा ताण कमी करण्यासाठी