शालेय निधी व्यवहारात गैरप्रकार आढळ्यास कारवाई होणार, पालकमंत्री उदय सामंत यांचा आदेश...

रत्नागिरी : राज्यात अनेक ठिकाणी शालेय शिक्षण विभागाचा आढावा पालकमंत्री उदय सामंत यांनी घेतला. शिक्षण क्षेत्रातील काही अधिकाऱ्यांना उदय सामंतानी चांगलंच धारेवर धरलं. जिल्हातील 5 हजार 830 शिक्षकांपैकी किती शिक्षकांनी विद्यार्थ्यांसाठी नवीन उपक्रम राबवले आहेत ? पंतप्रधान अंतर्गत निधीतून काय काम केली ? विद्यार्थ्यांची संख्या वाढवण्यासाठी कोणते उपक्रम राबवले आहेत ? यांसारखे अनेक प्रश्न विचारुन उदय सामंत यांनी शिक्षकांची चांगली शाळा घेतली.

तसेच उदय सामंत यांनी पत्रकारांशी देखील संवाद साधला, रत्नागिरी येथील वाडा याठिकाणी शिक्षकांने विश्रांतीगृह सुरु केले आहे. कोणत्याही विद्यार्थ्याला झोप आली. तर वडिलांप्रमाणे विद्यार्थ्याला झोपवलं जातं विद्यार्थी झोपेतून जागा झाल्यानंतर पुन्हा शिकवलं जातं. सामाजिक कार्य म्हणून 365 दिवस विद्यार्थ्यांना  शिकवण्याचं काम शिक्षक करत असतात. तसेच काही शिक्षक विद्यार्थ्यांना बागेत खेळता यावं यासाठी बाग तयार करतात.काही शाळेतील विद्यार्थी इंग्रजी आणि मराठी एकाच वेळी लिहितात. अशा शिक्षकांचं मार्गदर्शन ठेवायला हव, अशी सुचना उदय सामंत यांनी केली...

तसेच उदय सामंत यांनी पंतप्रधान योजने अंतर्गत खर्च करण्यात आलेल्या शाळांना अहवाल देखील मागवला. यामध्ये काही गैरप्रकार आढळला तर त्यांच्यावरती फौजदारी कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती दिली.

शालेय पोषणा संदर्भात अँप तयार करण्यात यावे. विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढवण्यात यावी. ज्या शाळेत पटसंख्या वाढवलेली आहे. त्या शाळेची माहिती गावागावत जाऊन सांगावी. अशी माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली.
Comments
Add Comment

जालन्यात मतदानासाठी बाहेर पडलेल्या मतदारांवर पिसाळलेल्या कुत्र्याचा हल्ला

जालना : जालना शहरात मतदानासाठी बाहेर पडलेल्या मतदारांवर एका पिसाळलेल्या कुत्र्याने हल्ला केल्याची धक्कादायक

मतदानानंतर सुबोध भावेंची स्पष्ट भूमिका अन् पुण्यात रंगली 'ती' एकच चर्चा

पुणे: पुणे महापालिका निवडणुकीसाठी शहरात मतदानाचा उत्साह पाहायला मिळत असताना, मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेता

Latur : महिन्याभरापूर्वी निवडणूक जिंकली आणि उपचारांअभावी गेली

लातूर : लातूर जिल्ह्यात मन हेलावणारी घटना घडली आहे. अहमदपूर शहरातून ही घटना समोर आली आहे. नुकत्याच झालेल्या

Kolhapur Crime : आईच्या आजारपणाचा गैरफायदा घेत मुख्याद्यापकानेच विद्यार्थिनीला फ्लॅटवर नेत...

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील एका आश्रमशाळेशी संबंधित प्रकरणामुळे खळबळ उडाली आहे.

दौंडमध्ये राजकीय कार्यकर्त्यावर भररस्त्यात हल्ला; पोलीस ठाण्याजवळच घडले 'हे' धक्कादायक दृश्य

पुणे : पुणे जिल्ह्यातील दौंड शहरात घडलेल्या एका घटनेमुळे स्थानिक कायदा-सुव्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह

पैशांच्या वादातून मित्रानेच केली मित्राची हत्या ...आरोपीला ट्रेनमध्ये पकडलं..!

पुणे/रायगड : रायगड जिल्ह्यातील ताम्हिणी घाट परिसरात पैशाच्या वादातून घडलेली मित्रामधील हत्येची घटना समाजात