हिंदवी पाटीलला अश्रू अनावर; सह्याद्री अमृततुल्यावर PMC ची कारवाई!

  46

पुणे : प्रसिद्ध लावणी नृत्यांगणा हिंदवी पाटील पुन्हा एकदा चर्चेत आली आहे, मात्र यावेळी कारण काहीसे दुःखद आहे. पुण्यातील तिच्या 'सह्याद्री अमृततुल्य' या दुकानावर पुणे महानगरपालिकेने (PMC) अनपेक्षितपणे कारवाई केली. यामुळे भावूक झालेल्या हिंदवी पाटीलला अश्रू अनावर झाले.


हिंदवीने माध्यमांशी बोलताना सांगितले की, कोणतीही पूर्वकल्पना किंवा नोटीस न देता थेट कारवाई करण्यात आली. दुकानातील साहित्य, बोर्ड्स हटवण्यात आले आणि व्यवसायावर अचानक परिणाम झाला.


https://x.com/PrahaarNewsline/status/1933894985906094366

"मी या दुकानावर मनापासून मेहनत घेतली होती, अनेक महिलांना काम दिलं होतं. एक नोटीस दिली असती तरी समजून घेतलं असतं… पण ही थेट कारवाई मनाला चटका लावणारी आहे," असं म्हणत हिंदवीने आपली भावना व्यक्त केली.


हिंदवी पाटील ही केवळ एक यशस्वी लावणी नृत्यांगणा नसून, गेल्या काही महिन्यांपासून ती उद्योजिका म्हणूनही कार्यरत आहे. ‘सह्याद्री अमृततुल्य’ हे तिचं चहा केंद्र पुण्यातील विविध ठिकाणी लोकप्रिय ठरत होतं.


या प्रकरणानंतर PMC कडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. मात्र सोशल मीडियावर याप्रकरणाची मोठी चर्चा सुरू आहे, आणि अनेक चाहत्यांनी हिंदवीला पाठिंबा दर्शवला आहे.

Comments
Add Comment

राज्यात तीन ते चार दिवस मुसळधार पावसाचा अंदाज; मुंबई, रायगडला रेड अलर्ट, पुण्यात ऑरेंज अलर्ट

मुंबई : संपूर्ण राज्यात पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. यानुसार काही भागात पावसाने

प्रवेश घ्या आणि कॉपी करून पास व्हा!

मुक्त विद्यापीठाच्या केंद्रावर कॉपी प्रकरण; चौकशीत ३२ विद्यार्थी निलंबित यवतमाळ : यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी

Palki Sohala : देहू-आळंदीत वारीच्या सोहळ्याची लगबग सुरु!

बुधवारी तुकोबा, गुरुवारी माऊलीच्या पालखीचं प्रस्थान पावसाळा सुरू झाला की महाराष्ट्रातील वारकऱ्यांना ओढ लागते

Ajit Pawar : पालखी सोहळ्यात वारकऱ्यांसाठी आवश्यक सुविधा तातडीने पूर्ण करा- अजित पवार

पुणे : आषाढी पालखी सोहळ्यादरम्यान वारकऱ्यांना कोणत्याही स्वरूपाचा त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी; पालखी

Pune News : सावधान! पुण्यात जलजन्य आजारांचा धोका

कडक उन्हापासून दिलासा देणारा पावसाळा ऋतू. मात्र यंदा मे महिन्याच्या मध्यापासूनच पाऊस धुमाकूळ घालतोय. पुण्यात या

पालखी सोहळ्यातील लाखो वारकऱ्यांवर २०० कॅमेरे ठेवणार नजर

मुंबई : संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यासाठी राज्यातून सुमारे सहा लाख वारकरी सहभागी होण्याची शक्यता