सिंधुदुर्गात १५ जूनला पावसाचा रेड अलर्ट

कणकवली तालुक्यात एकाचा वाहून गेल्याने मृत्यू


सिंधुदुर्ग: जिल्ह्यात गुरुवार पासून पावसाला पुन्हा सुरुवात झाली आहे. जिल्ह्याला आज आणि रविवारी १५ जूनला रेड अलर्ट तर उद्या ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. गेल्या २४ तासात जिल्ह्यात ७१ मिमी पावसाची नोंद झाली. त्यात देवगड तालुक्यात सर्वाधिक १६६ मिलीमीटर पावसाची नोंद झाली.


मुसळधार पावसामुळे ओढे, नद्या दुथडी भरून वाहू लागल्या आहेत. कणकवली तालुक्यात तालुक्‍यातील कळसुली लिंगेश्‍वर गवसेवाडी येथील महेश दिनकर देसाई (५२) हे ओढ्यात वाहून गेले. ही घटना काल १२ जून रोजी सायंकाळी सातच्या सुमारास घडली. रात्री शोधाशोध मोहीम राबविण्यात आली.


यात मध्यरात्री एक वाजता त्‍यांचा मृतदेह आढळून आला. गुरुवारी दिवसभर मुसळधार पाऊस झाला होता. यात ओढ्याला मोठ्या प्रमाणात पाणी होते. हा ओढा पार करून घरी जात असताना ते वाहून गेल्‍याची शक्‍यता स्थानिकांनी व्यक्‍त केली आहे. वेंगुर्ले तालुक्यात परुळे येथे एका घरावर झाड पडून मोठं नुकसान झालं आहे.

Comments
Add Comment

Nanded Railway : महाराष्ट्रातून उत्तर भारतीयांसाठी रेल्वेगाड्या उपलब्ध, पण नांदेड एक्स्प्रेसचा मुहूर्त कधी लागणार ?

मुंबई : मुंबईतून उत्तर प्रदेश आणि बिहारला जाणाऱ्या प्रवाशांसाठी नवनवीन गाड्या उपलब्ध होत आहेत. मात्र,

Pune Crime : पुण्यात धक्कादायक प्रकार; कामशेतमध्ये दुकानाच्या चेंजिंग रूममध्ये.....

पुणे : पुणे जिल्ह्यातील कामशेत परिसरात दुकानांमध्ये महिलांच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित करणारी

Intelligence Bureau : पालघरमध्ये 'इंटेलिजन्स ब्युरो'साठी हक्काची जागा

- महसूल विभागाचा मोठा निर्णय; वसईत कार्यालय आणि निवासस्थानांचा मार्ग मोकळा मुंबई : पालघर जिल्ह्याच्या

Cyclone Shelter Center in Dapoli : दापोली तालुक्यातील चक्रीवादळ निवारा केंद्रासाठी महसूलकडून विनामूल्य जागा

मुंबई : कोकण किनारपट्टीवरील आपत्ती व्यवस्थापन अधिक सक्षम करण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला

Onion processing industry: कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी कांदा प्रक्रिया उद्योगास चालना देणार - मंत्री जयकुमार रावल

मुंबई : राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कांदा दरातील चढ-उतारांपासून संरक्षण मिळून स्पर्धात्मक दर मिळावा,

Industries Minister Dr. Uday Samant : पांढरकवडा येथे 86 हेक्टरवर नवीन औद्योगिक क्षेत्र स्थापनेला गती - उद्योग मंत्री डॉ.उदय सामंत

मुंबई : यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा तालुक्यात औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी केळापूर तालुक्यातील मौजे