सिंधुदुर्गात १५ जूनला पावसाचा रेड अलर्ट

  53

कणकवली तालुक्यात एकाचा वाहून गेल्याने मृत्यू


सिंधुदुर्ग: जिल्ह्यात गुरुवार पासून पावसाला पुन्हा सुरुवात झाली आहे. जिल्ह्याला आज आणि रविवारी १५ जूनला रेड अलर्ट तर उद्या ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. गेल्या २४ तासात जिल्ह्यात ७१ मिमी पावसाची नोंद झाली. त्यात देवगड तालुक्यात सर्वाधिक १६६ मिलीमीटर पावसाची नोंद झाली.


मुसळधार पावसामुळे ओढे, नद्या दुथडी भरून वाहू लागल्या आहेत. कणकवली तालुक्यात तालुक्‍यातील कळसुली लिंगेश्‍वर गवसेवाडी येथील महेश दिनकर देसाई (५२) हे ओढ्यात वाहून गेले. ही घटना काल १२ जून रोजी सायंकाळी सातच्या सुमारास घडली. रात्री शोधाशोध मोहीम राबविण्यात आली.


यात मध्यरात्री एक वाजता त्‍यांचा मृतदेह आढळून आला. गुरुवारी दिवसभर मुसळधार पाऊस झाला होता. यात ओढ्याला मोठ्या प्रमाणात पाणी होते. हा ओढा पार करून घरी जात असताना ते वाहून गेल्‍याची शक्‍यता स्थानिकांनी व्यक्‍त केली आहे. वेंगुर्ले तालुक्यात परुळे येथे एका घरावर झाड पडून मोठं नुकसान झालं आहे.

Comments
Add Comment

MSBTE च्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! निकाल रोखून ठेवलेल्या, अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षा देण्याची संधी - लोढा

मुंबई: महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाच्या जुलै २०२५ या सत्रातील एक वर्ष कालावधी अभ्यासक्रमाच्या निकाल

श्री तुळजाभवानी मंदिरातील तलवार चोरीच्या बातम्या खोट्या, अफवांवर विश्वास ठेवू नका!

धाराशिव : श्री तुळजाभवानी मंदिरात सध्या जतन,संवर्धन व विविध विकासकामे मोठ्या प्रमाणावर सुरू असून,या अनुषंगाने

Daund Yawat Tension: ५०० जणांविरुद्ध गुन्हा दाखल, १७ जणांना अटक, कलम १६३ लागू...

पुण्यातील जातीय हिंसाचारावर कारवाई पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यामधील यवत गावात शुक्रवारी एका सोशल मीडिया

महाराष्ट्रात ४.१७ कोटींची बेनामी मालमत्ता उघड!

मुंबई : महाराष्ट्र लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) यावर्षी भ्रष्ट लोकसेवक आणि खाजगी व्यक्तींविरुद्ध चार

पतीची न्यायालयीन कोठडीत रवानगी, रोहिणी खडसेंनी घेतली शरद पवारांची भेट

पुणे : पुण्यातील खराडी परिसरातल्या रेव्ह पार्टीवर पोलिसांनी धाड टाकली. घटनास्थळावरुन अमली पदार्थ जप्त केले. या

‘महादेवी हत्तिणी’च्या ‘नांदणी’वापसीचा मार्ग मोकळा, पण कायद्याचा अडसर

कोल्हापूर : संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या महादेवी हत्तिणीला जनभावनांचा आदर करत ‘वनतारा’