निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीतील वारकऱ्यांची गैरसोय होऊ देऊ नका

आ. खताळ यांच्या अधिकाऱ्यांना सक्त सूचना


संगमनेर : संत निवृतीनाथ महाराजांच्या पालखी मार्गाच्या कामाची तसेच प्रशासनाच्या वतीने करण्यात येणाऱ्या उपाययोजनांची पाहाणी आमदार अमोल खताळ यांनी केली. या पालखीतील वारकरी बंधू आणि भगिनींची कोणतीही अडचण होणार नाही याची सर्व विभागाच्या अधिकार्यानी काळजी घ्यावी आणि त्याबाबतचे सुयोग्य नियोजन करावे अशा सक्त सूचना आ. अमोल खताळ यांनी दिल्या.


आषाढी वारीच्या निमिताने दरवर्षी संत निवृतीनाथ महाराज देवस्थानची पालखी पंढरपूरला जाताना तालुक्यातील पारेगाव बु।। येथे मुक्कामाला थांबते. गेली अनेक वर्षाची ही परंपरा असून तालुक्यातील भाविकांच्या वतीने या पालखीचे मनोभावे स्वागत करण्यात येत असते. मागील वर्षी पावसाने वारकऱ्यांची मोठ्या प्रमाणात गैरसोय झाली होती. त्यामुळे पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखी मार्ग कामाबाबत जिल्हाधिकारी तसेच अन्य विभागांच्या अधिकार्यांना गांभिर्याने नियोजन करून पालखी येण्यापुर्वीच सर्व व्यवस्था निर्माण करण्या बाबतच्या सूचना दिल्या होत्या.आ.अमोल खताळ यांनी पारेगाव बु।। येथे येवून ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामस्थ अधिकारी यांची एकत्रित बैठक घेवून तयारीचा आढावा घेतला. विशेष म्हणजे यंदा प्रथमच वारकर्यांसाठी तीन वाॅटरफ्रूफ मंडपाची उभारणी करण्यात येणार असून यासाठी पालकमंत्री विखे पाटील यांच्या प्रयत्नामुळे महायुती सरकारने मंडपासाठी पाच लाख रूपये, २लाख ग्रामपंचायती करीता अनुदान तसेच २५० शौचालय आणि स्नानगृहा करीता २०० युनिट उभारणीसाठी निधीची उपलब्धता करून देण्यात आली असल्याचे आ.खताळ यांनी सांगितले.


आरोग्य सेवेबाबत तात्पुरत्या स्वरुपातील दवाखाने सर्व यंत्रणांनी सज्ज ठेवावेत. पिण्याचे पाणी,तसेच वीज पुवरठा सुरळीत राहील याची दक्षता घेण्याबाबत आ.खताळ यांनी सांगितले.मंडप उभार ण्यात येणार्या जागांची तसेच पालखी मार्गावर झालेल्या कामाची माहीती आ.खताळ यांनी सार्वजनीक बांधकाम विभागाचे अभियंता शाम मिसाळ यांच्या कडून जाणून घेतली.या रस्त्याच्या कामाकरीता मंत्री विखे पाटील यांनी निधी उपलब्ध करून दिल्यामुळे मार्गाचे काम होवू शकले.


उरलेल्या दिवसात साईडपट्ट्यांची काम पूर्ण करण्याच्या सूचना आ.खताळ यांनी सार्वजनीक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या.यावेळी आ.अमोल खताळ यांच्या समवेत तहसीलदार धीरज मांजरे, अतिरीक्त गटविकास अधिकारी राजेंद्र ठाकूर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपकार्यकारी अभियंता शाम मिसाळ, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश घोलप, तालुक्याचे पोलिस निरीक्षक देविदास ढुमणे, निमोणचे सरपंच संदीप देशमुख, ॲड. त्र्यंबक गडाख, गणेश गडाख, रावसाहेव गडाख, लक्ष्मण गडाख, सुरेश दळवी, सुखदेव गडाख, भीमराज गडाख, नवनाथ गडाख, निलेश गडाख, कैलास गोर्डे, सुनील वाकचौरे, तळेगावचे प्रभारी सरपंच मयूर दिघे, भाजप युवा नेते अमोल दिघे, भाजप महिला आघाडी तालुका अध्यक्ष कविता पाटील l, संपत फड, अर्जुन शिरसाठ, डॉ. स्वाती डांगे, ग्रामसेवक गौरव कदम यांच्यासह पारेगाव ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


संगमनेर तालुक्यात संत निवृतीनाथ महाराज देवस्थानची पालखी संगमनेर तालुक्यात येणे हा अहील्यानगर जिल्ह्या साठी मोठा अभिमान आहे. त्यामुळे या पालखीचे स्वागत चांगल्या पध्दतीने व्हावे म्हणून यंदा ग्रामस्थ आणि प्रशासनाच्या समन्वयातून चांगले नियोजन झाले आहे. पालखीच्या स्वागतासाठी पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी उपस्थित राहावे अशी विनंती केली असून जिल्ह्यातील सर्व वरीष्ठ अधिकारी वारकरी सांप्रदायातील कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आ. अमोल खताळ यांनी केले आहे.

Comments
Add Comment

Four years Degree Course : आता पदवी अभ्यासक्रम चार वर्षांचा - नव शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी; पदवीस्तरावरच मिळणार संशोधनाची संधी

मुंबई : राज्यातील उच्च शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र बदल घडवून आणणाऱ्या राष्ट्रीय शिक्षण धोरणाची (२०२०) अंमलबजावणी

CM Devendra Fadnavis : “माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव” राज्यव्यापी अभियानाचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

- उपमुख्यमंत्री, आरोग्य मंत्र्यासह मंत्रिमंडळाची उपस्थिती मुंबई : जागतिक आरोग्य दिनाच्या

Transfers Of IAS Officers : राज्यातील ११ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुंबई : राज्य शासनाने मंगळवारी प्रशासकीय स्तरावर मोठे फेरबदल करत ११ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे (Transfers Of IAS Officers)

Export of fruits and vegetables : उपलब्ध निर्यात सुविधा केंद्रांचा प्रभावी वापर करून फळे व भाजीपाल्याची निर्यात वाढवावी - मंत्री जयकुमार रावल

मुंबई : राज्यात निर्यातक्षम फळे व भाजीपाला मोठ्या प्रमाणावर उत्पादित होतो. या पार्श्वभूमीवर उपलब्ध निर्यात

अवकाळीने झालेल्या नुकसानीपोटी शेतकऱ्यांना १२८ कोटी ६५ लाखांची मदत

जानेवारीपासून झालेल्या नुकसानीच्या पंचनाम्याची कार्यवाही सुरू मुंबई : राज्यात ऑक्टोंबर ते डिसेंबर २०२५

Chipi-Mumbai Flights चिपी–मुंबई विमानसेवा जलदगतीने सुरू करा - सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांचे निर्देश

सकाळी व संध्याकाळी अशी दोनदा विमानसेवा देण्याबाबत विचार करण्याच्या ही दिल्या सूचना मुंबई : सिंधुदुर्ग जिल्हा