जागतिक मत्स्य उत्पादन क्षेत्रात भारताचा जगात दुसरा क्रमांक !

  114

देशाच्या वाढीव मत्स्य उत्पादन क्षेत्रात महाराष्ट्राचे महत्वाचे योगदान


मुंबई : भारतातील अन्न उत्पादनातील एक महत्वाचे क्षेत्र म्हणून मत्स्य उत्पादन क्षेत्राकडे पहिले जाते. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात गेल्या दहा वर्षांत देशातील मत्स्य उत्पादन क्षेत्रात भरीव वाढ झाली आहे. जागतिक मत्स्य उत्पादनात भारताचा वाटा सुमारे ८ टक्के असून, भारत हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा मासे उत्पादक देश बनला आहे. देशाच्या मत्स्य उत्पादन क्षेत्रात महाराष्ट्राचे महत्वाचे योगदान असून राज्याचे मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांच्या नेतृत्वात राज्यातील मत्स्यव्यवसायाला अधिक चालना मिळत आहे.


देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारच्या गेल्या ११ वर्षांच्या काळात देशातील मत्स्यव्यवसाय क्षेत्राचा कायापालट झाला आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेत मत्स्य उत्पादन क्षेत्राचे महत्वाचे योगदान आहे. मत्स्यव्यवसाय क्षेत्राला बळकटी मिळाल्याने जागतिक मत्स्यपालनात भारताचे स्थान अधिक मजबूत झाले आहे. सन २०२३-२४ या आर्थिक वर्षात भारताने तब्बल ६०,५२३.८९ कोटी रुपयांचे १७,८१,६०२ मेट्रिक टन (MT) सीफूड निर्यात केले आहेत. यामुळे भारताच्या निर्यात क्षेत्रात लक्षणीय वाढ झाली आहे.




मत्स्य उत्पादनात महाराष्ट्राचे भरीव योगदान


देशाच्या मत्स्य उत्पादन क्षेत्रात महाराष्ट्राचे महत्वाचे योगदान आहे. राज्याचे मत्स्य व्यवसाय मंत्री श्री नितेश राणे यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रातील मत्स्यव्यवसाय क्षेत्राला अधिक गती मिळत असून राज्यातील मत्स्योत्पादनामध्ये भरीव वाढ झाली आहे. सन २०२३-२४ मध्ये महाराष्ट्र राज्याचे सागरी मत्स्योत्पादन ४३४५७४ मे. टन इतके होते. सन २०२४-२५ मध्ये मंत्री नितेश राणे यांच्या कार्यकाळात राज्याच्या सागरी मत्स्योत्पादनामध्ये २९१८४ मे.टन ने वाढ झाली असून राज्याचे एकूण मत्स्योत्पादन ४६३७५८ मे. टन इतके झालेले आहे.


महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम, १९८१ (सुधारणा-२०२१) अंतर्गत होत असलेली प्रभावी अंमलबजावणी तसेच ड्रोनद्वारे होणारी देखरेख यामुळे राज्यातील अनधिकृत मासेमारीवर नियंत्रण ठेवण्यात येत आहे. याप्रमाणे महाराष्ट्र राज्यात सागरी मासेमारी संबंधी सर्वच उपाययोजनांचा सकारात्मक परिणाम दिसून येत असून भविष्यात राज्यातील मत्स्यव्यवसाय क्षेत्र अधिक बळकट होणार आहे.

Comments
Add Comment

कल्याणमध्ये भीषण अपघात: ट्रकने दुचाकीस्वार महिलेला चिरडले, जागीच मृत्यू

ठाणे: कल्याण पश्चिम येथील निक्कीनगर परिसरात एका दुचाकीस्वार महिलेचा भीषण अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. आपल्या

बैलपोळाच्या दिवशी नदीमध्ये वाहून गेलेल्या युवकाचा मृतदेह गवसला

अकोला: मूर्तिजापूर तालुक्यातील एक युवक बैलपोळा सणाच्या दिवशी बैलांना धुण्यासाठी पेढी नदीवर गेला असता, अचानक पाय

छत्रपती संभाजीनगरला २४x७ शाश्वत पाणीपुरवठ्याचा मार्ग मोकळा; २६ द.ल.ली. जलशुद्धीकरण केंद्राचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर शहर पाणीपुरवठा योजनेच्या माध्यमातून पुढील २५-३० वर्षे शहराच्या अपेक्षित

मराठा आरक्षणासाठी समितीचे नवीन अध्यक्ष!

मुंबई: भाजपच्या नेतृत्वाखालील 'महायुती' सरकारने जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची मराठा समाजाच्या

दहावीच्या विद्यार्थिनीवर स्कूल बसचालकाकडून लैंगिक अत्याचार

जळगाव : दहावीतील विद्यार्थिनीवर स्कूल बसचालकानेच शेतात नेऊन लैंगिक अत्याचार केल्याची घडली. जळगावच्या पाचोरा

निफाडमध्ये चक्क कुत्र्यानेच बिबट्याला नेले फरपटत

निफाड : संपूर्ण तालुक्यात बिबट्याची दहशत असल्याचे नागरिकांना पशुधन सांभाळण्यासाठी जागता पहारा द्यावा लागत आहे.