जागतिक मत्स्य उत्पादन क्षेत्रात भारताचा जगात दुसरा क्रमांक !

  59

देशाच्या वाढीव मत्स्य उत्पादन क्षेत्रात महाराष्ट्राचे महत्वाचे योगदान


मुंबई : भारतातील अन्न उत्पादनातील एक महत्वाचे क्षेत्र म्हणून मत्स्य उत्पादन क्षेत्राकडे पहिले जाते. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात गेल्या दहा वर्षांत देशातील मत्स्य उत्पादन क्षेत्रात भरीव वाढ झाली आहे. जागतिक मत्स्य उत्पादनात भारताचा वाटा सुमारे ८ टक्के असून, भारत हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा मासे उत्पादक देश बनला आहे. देशाच्या मत्स्य उत्पादन क्षेत्रात महाराष्ट्राचे महत्वाचे योगदान असून राज्याचे मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांच्या नेतृत्वात राज्यातील मत्स्यव्यवसायाला अधिक चालना मिळत आहे.


देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारच्या गेल्या ११ वर्षांच्या काळात देशातील मत्स्यव्यवसाय क्षेत्राचा कायापालट झाला आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेत मत्स्य उत्पादन क्षेत्राचे महत्वाचे योगदान आहे. मत्स्यव्यवसाय क्षेत्राला बळकटी मिळाल्याने जागतिक मत्स्यपालनात भारताचे स्थान अधिक मजबूत झाले आहे. सन २०२३-२४ या आर्थिक वर्षात भारताने तब्बल ६०,५२३.८९ कोटी रुपयांचे १७,८१,६०२ मेट्रिक टन (MT) सीफूड निर्यात केले आहेत. यामुळे भारताच्या निर्यात क्षेत्रात लक्षणीय वाढ झाली आहे.




मत्स्य उत्पादनात महाराष्ट्राचे भरीव योगदान


देशाच्या मत्स्य उत्पादन क्षेत्रात महाराष्ट्राचे महत्वाचे योगदान आहे. राज्याचे मत्स्य व्यवसाय मंत्री श्री नितेश राणे यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रातील मत्स्यव्यवसाय क्षेत्राला अधिक गती मिळत असून राज्यातील मत्स्योत्पादनामध्ये भरीव वाढ झाली आहे. सन २०२३-२४ मध्ये महाराष्ट्र राज्याचे सागरी मत्स्योत्पादन ४३४५७४ मे. टन इतके होते. सन २०२४-२५ मध्ये मंत्री नितेश राणे यांच्या कार्यकाळात राज्याच्या सागरी मत्स्योत्पादनामध्ये २९१८४ मे.टन ने वाढ झाली असून राज्याचे एकूण मत्स्योत्पादन ४६३७५८ मे. टन इतके झालेले आहे.


महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम, १९८१ (सुधारणा-२०२१) अंतर्गत होत असलेली प्रभावी अंमलबजावणी तसेच ड्रोनद्वारे होणारी देखरेख यामुळे राज्यातील अनधिकृत मासेमारीवर नियंत्रण ठेवण्यात येत आहे. याप्रमाणे महाराष्ट्र राज्यात सागरी मासेमारी संबंधी सर्वच उपाययोजनांचा सकारात्मक परिणाम दिसून येत असून भविष्यात राज्यातील मत्स्यव्यवसाय क्षेत्र अधिक बळकट होणार आहे.

Comments
Add Comment

बनावट खतांचा साडेसात लाखाचा साठा जप्त ; कृषी विभागाची राहुरीत मोठी कारवाई

राहुरी - बनावट खत विक्री करत असलेल्या दुकानावर छापा मारत तब्बल साडेसात लाखाचा साठा कृषी विभागाने जप्त केला आहे.

Sassoon Hospital : पुण्यातील ससून रूग्णालयातील डॉक्टरचा मृत्यू

पुणे : पुण्यातील ससून रुग्णालयातील मनोविकारतज्ञ आणि विभागप्रमुख डॉ. नितीन अभिवंत यांचे हिमालयातील

Rainy Season Picnic : पर्यटनस्थळ परिसरात ३१ ऑगस्ट पर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू!

पुणे : पुणे जिल्ह्यातील लोणावळा परिसरातील तसेच मावळ तालुक्यातील ऐतिहासिक वास्तू, गड, किल्ले व स्मारके,

वृत्तपत्र विक्रेत्यांच्या मुळावर याल, तर खबरदार!

मनसेविरोधात संतप्त वृत्तपत्र विक्रेत्यांची ठाणे स्थानकाबाहेर निदर्शने ठाणे : मुंब्रा रेल्वे दुर्घटनेच्या

मान्सून पुन्हा सक्रीय होण्याची चिन्हे

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून राज्यात पावसाने दडी मारली आहे. खरीप हंगामाची तयारी केलेली असतानाच अचानक पावसाने

आषाढी यात्रेसाठी एसटीकडून ५,२०० विशेष बसचे नियोजन

पंढरपूर :आषाढी यात्रेच्या सोहळ्यानिमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी च्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात भाविक