आगामी स्थािनक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या दृष्टीने कामाला लागा

आमदार निलेश राणे यांचे आवाहन


चिपळूण : कोकणात शिवसेना आणि धनुष्यबाण यांच वेगळं नातं आहे, ते कधीच तुटू शकत नाही. गावातील लोकांना धनुष्यबाण माहित आहे. शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे विचार माहीत आहेत. यामुळे लोकं स्वतःहून शिवसेनेत येत आहेत.


शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे यांना रत्नागिरी जिल्हा परिषदेवर भगवा फडकवून भेट द्यायची आहे, तेव्हा लोकांची कामे झाली पाहिजेत, या दृष्टीने काम करतानाच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या दृष्टीने कामाला लागा, असे आवाहन कुडाळ-मालवणविधानसभा मतदारसंघाचे आमदार निलेश राणे यांनी शिवसैनिक व पदाधिकाऱ्यांना केले.


यावेळीच त्यांनी, तुम्ही कधीही मला हाक मारा, मी तुमच्यासोबत सदैव उभा राहिन, अशी ग्वाही देखील यावेळी दिली. कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघाचे आमदार निलेश राणे रविवारी चिपळूण दौऱ्यावर आले होते. यावेळी शिवसेना शहरप्रमुख उमेश सकपाळ यांच्या कार्यालयाला त्यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी तालुकाप्रमुख संदेश आयरे, शहर प्रमुख उमेश सकपाळ यांच्यासह शिवसैनिक व पदाधिकाऱ्यांनी आमदार निलेश राणे यांचे स्वागत करीत सत्कार केला. यानंतर आ. निलेश राणे म्हणाले की, आपण कडवट शिवसैनिक, पदाधिकारी आहात. मी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा असेन, अशी ग्वाही आमदार राणे यांनी यावेळी दिली. ते पुढे म्हणाले की, शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्यामुळे आपण इथपर्यंत पोहोचलो.


यामुळे शिवसेना पक्षाचे उपकार आयुष्यात कधीच विसरणार नाही, असे सांगताना चिपळूणमुळे आपल्याला ओळख मिळाली. यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख संदेश आयरे, शहरप्रमुख उमेश सकपाळ, युवासेना तालुकप्रमुख निहार कोवळे, युवासेना शहरप्रमुख विनोद पिल्ले, शिवसेना महिला आघाडी जिल्हाध्यक्षा रश्मी गोखले आदी उपस्थित होते.

Comments
Add Comment

मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणामुळे चिपळूणमध्ये पुराचा धोका

चिपळूण (वार्ताहर) : चिपळूण शहराला असलेल्या पुराच्या धोक्याबाबत उपाययोजना सूचविण्यासाठी राज्य सरकारने जलसंपदा

वैभव खेडेकरांचा भाजप प्रवेश पुन्हा हुकला

मनसेचं 'वैभव' भाजपला केव्हा फळणार? मुंबई : नकटीच्या लग्नाला सतराशे विघ्न अशी मराठीत म्हण आहे. वैभव खेडेकर यांच्या

रत्नागिरीसह सिंधुदुर्ग जिल्ह्यात तीन नव्या जेटींना मंजुरी

राजापुरातील देवाचेगोठणे, दापोलीतील उटंबर आणि मालवणातील पेंडूर येथे उभ्या राहणार नव्या जेटी मत्स्य व्यवसाय व

गावची जमीन गावातच, मोरवणे ग्रामसभेच्या ठरावाची सर्वत्र चर्चा

रत्नागिरी : कोकणातल्या रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळुण तालुक्यातील मोरवणे गावाच्या ग्रामसभेने एक ठराव केला आहे.

कोकणाच्या विकासासाठी भाजपचा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’; जयगड बंदर बनणार अर्थव्यवस्थेचं केंद्र

रत्नागिरी: मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री आणि भाजप नेते नितेश राणे

समृद्ध पंचायतराज अभियानातून राज्यात सर्वाधिक बक्षिसे मतदार संघाने मिळवावीत: ग्रामविकास राज्यमंत्री योगेश कदम

समृद्ध पंचायतराज अभियानासाठी विशेष प्रयत्न करा दापोली: ग्रामविकास व पंचायतीराज विभागामार्फत राबविण्यात