आगामी स्थािनक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या दृष्टीने कामाला लागा

  44

आमदार निलेश राणे यांचे आवाहन


चिपळूण : कोकणात शिवसेना आणि धनुष्यबाण यांच वेगळं नातं आहे, ते कधीच तुटू शकत नाही. गावातील लोकांना धनुष्यबाण माहित आहे. शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे विचार माहीत आहेत. यामुळे लोकं स्वतःहून शिवसेनेत येत आहेत.


शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे यांना रत्नागिरी जिल्हा परिषदेवर भगवा फडकवून भेट द्यायची आहे, तेव्हा लोकांची कामे झाली पाहिजेत, या दृष्टीने काम करतानाच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या दृष्टीने कामाला लागा, असे आवाहन कुडाळ-मालवणविधानसभा मतदारसंघाचे आमदार निलेश राणे यांनी शिवसैनिक व पदाधिकाऱ्यांना केले.


यावेळीच त्यांनी, तुम्ही कधीही मला हाक मारा, मी तुमच्यासोबत सदैव उभा राहिन, अशी ग्वाही देखील यावेळी दिली. कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघाचे आमदार निलेश राणे रविवारी चिपळूण दौऱ्यावर आले होते. यावेळी शिवसेना शहरप्रमुख उमेश सकपाळ यांच्या कार्यालयाला त्यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी तालुकाप्रमुख संदेश आयरे, शहर प्रमुख उमेश सकपाळ यांच्यासह शिवसैनिक व पदाधिकाऱ्यांनी आमदार निलेश राणे यांचे स्वागत करीत सत्कार केला. यानंतर आ. निलेश राणे म्हणाले की, आपण कडवट शिवसैनिक, पदाधिकारी आहात. मी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा असेन, अशी ग्वाही आमदार राणे यांनी यावेळी दिली. ते पुढे म्हणाले की, शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्यामुळे आपण इथपर्यंत पोहोचलो.


यामुळे शिवसेना पक्षाचे उपकार आयुष्यात कधीच विसरणार नाही, असे सांगताना चिपळूणमुळे आपल्याला ओळख मिळाली. यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख संदेश आयरे, शहरप्रमुख उमेश सकपाळ, युवासेना तालुकप्रमुख निहार कोवळे, युवासेना शहरप्रमुख विनोद पिल्ले, शिवसेना महिला आघाडी जिल्हाध्यक्षा रश्मी गोखले आदी उपस्थित होते.

Comments
Add Comment

कोकणात मुसळधार, राजापूर-चिपळूणमध्ये हाहाकार!

मंदिर - घरांमध्ये पाणी शिरले तर रस्ते व पुलांची दुर्दशा रत्नागिरी : जिल्हयात सक्रिय झालेल्या मान्सूनने चांगलाच

रत्नागिरी : तब्बल ३७ वर्षांनी आडिवऱ्याच्या महाकाली मंदिरात पुराचे पाणी!

रत्नागिरी : राजापुर तालुक्यात काल रात्रीपासून पावसाचा कहर झाला आहे. श्रीक्षेत्र आडिवरे येथील श्री महाकाली

शॉक लागल्यामुळे १३ वर्षांच्या मुलीचा तडफडून मृत्यू

रत्नागिरी : राजापूर तालुक्यातील धाऊलवल्ली येथे शॉक लागून १३ वर्षांच्या स्वरांगी गिजमचा तडफडून मृत्यू झाला.

मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक १७ तासांनंतर सुरू

रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गावरील (Mumbai-Goa highway) निवळी घाटात सीएनजी टँकर आणि खासगी मिनी बस यांच्यात झालेल्या भीषण

Vande Bharat Express: मुंबई-मडगाव वंदे भारत एक्स्प्रेस १६ जूनपासून आठवड्यातून तीनच दिवस

रत्नागिरी: भारतीय रेल्वेने मुंबई-मडगाव वंदे भारत एक्स्प्रेसच्या (22229/22230) २०२५ च्या मान्सून कालावधीसाठी

रत्नागिरीत एलपीजी टँकर आणि मिनी बसचा अपघात

रत्नागिरी : चिपळूणहून रत्नागिरीकडे जाणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्स मिनी बसला सीएनजी गॅस घेऊन जात असलेल्या टँकरने धडक