सीटीईटी परीक्षार्थी शिक्षकांची इलेक्शन ड्युटी रद्द करण्याची मागणी

खेड : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती शाखा खेड यांच्यावतीने ७ व ८ फेब्रुवारी २०२६ रोजी सीटीईटी परीक्षा देणाऱ्या शिक्षकांना निवडणूक कर्तव्यातून मुक्त करण्याची मागणी करण्यात आली आहे. या संदर्भात अध्यक्ष संतोष चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार यांना लेखी निवेदन देण्यात आले.


मूळतः जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक ५ फेब्रुवारी २०२६ रोजी होणार होती. मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे ही निवडणूक पुढे ढकलून ७ फेब्रुवारी २०२६ रोजी घेण्यात येणार आहे. या अचानक झालेल्या तारखेतील बदलामुळे खेड तालुक्यातील अनेक प्राथमिक व माध्यमिक शिक्षक अडचणीत सापडले आहेत. ७ व ८ फेब्रुवारी २०२६ रोजी केंद्र शिक्षक पात्रता परीक्षा (सीटीईटी) नियोजित असून या परीक्षेसाठी अनेक शिक्षक परीक्षार्थी आहेत. मात्र त्याच कालावधीत त्यांना निवडणूक कर्तव्य देण्यात आल्याने या शिक्षकांना अत्यंत महत्त्वाच्या सीटीईटी परीक्षेला मुकावे लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यावेळी बोलताना अध्यक्ष संतोष चव्हाण यांनी सांगितले की, सीटीईटी ही शिक्षकांच्या भविष्यासाठी अत्यंत महत्त्वाची परीक्षा असून निवडणूक प्रक्रियेमुळे कोणत्याही शिक्षकाचे शैक्षणिक नुकसान होऊ नये. त्यामुळे तहसीलदार यांनी या विशेष परिस्थितीचा सहानुभूतीपूर्वक विचार करून ७ व ८ फेब्रुवारी रोजी ज्यांची सीटीईटी परीक्षा आहे, अशा शिक्षकांना निवडणूक कर्तव्यातून मुक्त करावे, अशी मागणी त्यांनी केली. निवेदन देते वेळी सचिव धर्मपाल तांबे, संघटना प्रवक्ता शैलेश पराडकर, सल्लागार परशुराम पेवेकर यांच्यासह शिक्षक समितीचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

Comments
Add Comment

Ratnagiri : रत्नागिरीत वादळाने विद्युतपुरवठा विस्कळित

रत्नागिरी : रत्नागिरीत आज संध्याकाळी अचानक झालेल्या मुसळधार पावसामुळे सर्वांची दाणादाण उडाली. यावर्षी

Pramod Jathar : कोकणात भाजपा अधिक मजबूत करण्यासाठी कार्यकर्त्यांनी झोकून देऊन काम करावे

रत्नागिरी : भविष्यात संपूर्ण कोकणात भारतीय जनता पक्षाचे संघटन अधिक बळकट व भक्कम करण्याचा निर्धार पक्षाने केला

HSC Rajapur Result 2026 : राजापूरची झळाळती कामगिरी! ‘धवल यश’ परंपरा कायम”

राजापूर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE) तर्फे घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा

Kokan Railway trains : कोकण रेल्वेच्या पाच गाड्यांना संगमेश्वर येथे थांबा मिळण्याची शक्यता!

रत्नागिरी : कोकण रेल्वेसंदर्भात पार पडलेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत संगमेश्वर रेल्वे स्थानकासाठी दिलासादायक

Ratnagiri : चार वाहनांना धडक देऊन ट्रक कोसळला विहिरीत

रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गावर आज पहाटे हातखंबा येथे चार वाहनांचा भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत एक जण गंभीर

Ratnagiri : संकष्टी चतुर्थीनिमित्त गणपतीपुळे मंदिरात आकर्षक फुलांची सजावट; भाविकांची मोठी गर्दी

रत्नागिरी: रत्नागिरी जिल्ह्यातील प्रसिद्ध गणपतीपुळे मंदिरात संकष्टी चतुर्थी निमित्त अत्यंत देखणी आणि मनमोहक