रत्नागिरी जिल्ह्यावर मळभ व पावसाचे सावट; आंबा-काजू उत्पादन धोक्यात

रत्नागिरी  : कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यावर पुन्हा एकदा अवकाळी पावसाचे सावट घोंगावत आहे. जिल्ह्यात पावसाचे वातावरण तयार झाले असले तरी पाऊस पडल्याची नोंद नाही. मात्र, मळभ वातावरण तयार झाल्याने याचा थेट फटका जिल्ह्यातील आंबा व काजू बागायतदारांना बसण्याची चिन्हे आहेत. जिल्ह्यातील आंबा व काजू उत्पादन सध्या निर्णायक टप्प्यात असताना, बदलत्या हवामानामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आंबा फळपीक ६८ हजार ५५० हेक्टर क्षेत्रामध्ये लागवड होते. यातून मागील वर्षी १८ लाख ४ हजार ६०२ इतके उत्पादन घेण्यात आले होते. आंबा उत्पादकता ३ टन एवढी झाली आहे. तसेच जिल्ह्यात ११ लाख २ हजार ५५७ क्षेत्रामध्ये १ लाख ४२ हजार ०२० इतके उत्पादन घेण्यात आले. काजुची उत्पादकता १.५ टन झाली आहे. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा उत्पादन वाढीची आशा निर्माण झाली होती. यंदाच्या हिवाळ्यात थंडीचे प्रमाण वाढल्याने आंबा व काजू झाडांना चांगला मोहर आला होता. मात्र हा मोहर टिकवून ठेवण्यासाठी बागायतदारांनी लाखो रुपयांची औषध फवारणी केली आहे.  मागील दोन वर्षांत उशिरापर्यंत कोसळलेल्या पावसामुळे आंबा व काजू बागांचे नुकसान झाले होते. त्यामुळे आधीच आर्थिक अडचणीत सापडलेल्या बागायतदारांसमोर यंदाही तसाच धोका उभा ठाकला आहे. वाढता कामगार खर्च, औषध फवारणीचा खर्च आणि त्यामानाने अपेक्षित उत्पादन न मिळाल्यास आलेल्या उत्पन्नातून खर्च भागवणे अवघड होत असल्याची प्रतिक्रिया बागायतदारांकडून व्यक्त केली जात आहे.

Comments
Add Comment

Pakistan in WTC : षटकारांच्या संथ गतीचा फटका, ICC च्या कारवाईमुळे पाकिस्तान WTC मध्ये आठव्या स्थानी

मुंबई  : आयसीसीने पाकिस्तान क्रिकेट संघावर कडक कारवाई करत मोठा दंड ठोठावला आहे. याचा संघाला वर्ल्ड टेस्ट

Union Minister Son Arrested : केंद्रीय मंत्र्याच्या मुलाविरोधात गंभीर आरोप; दारू पाजून शोषण केल्याचा दावा

नवी दिल्ली : केंद्रीय मंत्री बंडी संजय कुमार (Bandi Sanjay Kumar) यांचे पुत्र बंडी भगीरथ (Bandi Bhagirath) यांना शनिवारी (१६ मे) तेलंगणा

KKR : कोलकाताने रोखला गुजरातचा विजयरथ!

कोलकाता : आयपीएल २०२६ स्पर्धेतील ६० व्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने बाजी मारली. या सामन्यात गुजरात

Devendra Fadnavis : कला, संस्कृती अन् खाद्यसंस्कृतीची ओळख पटवून देणारा 'माटी ९ पूर्वांचल महोत्सव' : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : भारतीय संस्कृती महान असून ही संस्कृती समृद्ध करण्यासाठी महाराष्ट्राने anj पूर्वांचलने महत्त्वपूर्ण

Belgium national football team : बेल्जियमचा वर्ल्ड कप संघ जाहीर, केविन डी. ब्रुयनला कर्णधारपद, ओपेंडा संघातून बाहेर

आगामी फिफा वर्ल्डकप २०२६ साठी (FIFA WORLD CUP 2026) बेल्जियम फुटबॉल फेडरेशनने २६ खेळाडूंच्या संघाची घोषणा केली आहे. यावेळी

Ranbir Kapoor : रणबीर कपूर झाला अयोध्यावासी! ‘रामायण’ रिलीजआधी राम मंदिराजवळ ३.३१ कोटींची प्रॉपर्टी खरेदी

अयोध्या : रणबीर कपूर (Ranbir Kapoor) सध्या त्याच्या बहुचर्चित रामायण (Ramayana) चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात तो प्रभू