अपघातात जखमींना मिळणार कॅशलेस उपचार

प्राण वाचवणाऱ्या मदतनीसालाही २५ हजार रुपये रोख बक्षीस

रत्नागिरी : रस्ते अपघातानंतर जखमींच्या जीवितासाठी अत्यंत निर्णायक ठरणाऱ्या महत्वाच्या वेळेमध्ये उपचारांचा खर्च अडसर ठरू नये, यासाठी केंद्र सरकारने महत्वाचा निर्णय घेतला आहे. नव्या कॅशलेस वैद्यकीय उपचार योजनेंतर्गत रस्ते अपघातातील जखमींना सात दिवसांसाठी दीड लाख रुपयापर्यंत मोफत उपचार मिळणार आहेत. इतकेच नव्हे तर अपघातग्रस्ताला तातडीने रुग्णालयात पोहोचवून प्राण वाचवणाऱ्या मदतनीसाला राहवीर म्हणून २५ हजार रुपयांचे बक्षीस देण्यात येणार आहे. नवी कॅशलेस योजना, राहवीर योजना लवकरच राष्ट्रीय स्तरावर लागू केली जाणार असल्याची घोषणा केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केली आहे. या निर्णयामुळे अपघातग्रस्तांसाठी दिलासादायक चित्र निर्माण होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. दरम्यान, रस्ते सुरक्षा अधिक सक्षम करण्यासाठी मोटार वाहन कायद्यात एकूण 61 दुरुस्त्या करण्यात आल्या आहेत. कॅशलेस वैद्यकीय उपचार योजनेच्या माध्यमातून रस्ते अपघातांची संख्या तसेच अपघातांमुळे होणारे मृत्यू कमी करण्याच्या सरकारचा ठोस प्रयत्न आहे. तातडीने उपचार, नागरिकांना मदतीसाठी प्रोत्साहन आणि पीडित कुटुंबाना आर्थिक आधार या त्रिसूत्रीमुळे रस्ते सुरक्षेला नवी दिशा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. ही योजना प्रायोगिक तत्त्वावर राबविण्यात आली होती आणि तिला मोठ्या प्रमाणात सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. अपघातग्रस्तांना वेळेत उपचार मिळाल्याने अनेकांचे प्राण वाचले आहेत. त्यामुळे ही योजना यशस्वी ठरल्याचे स्पष्ट झाले आहे. या पार्श्वभूमीवर आता ही योजना राष्ट्रीय स्तरावर राबवण्यात येणार आहे.

Comments
Add Comment

Ratnagiri : रत्नागिरीत वादळाने विद्युतपुरवठा विस्कळित

रत्नागिरी : रत्नागिरीत आज संध्याकाळी अचानक झालेल्या मुसळधार पावसामुळे सर्वांची दाणादाण उडाली. यावर्षी

Pramod Jathar : कोकणात भाजपा अधिक मजबूत करण्यासाठी कार्यकर्त्यांनी झोकून देऊन काम करावे

रत्नागिरी : भविष्यात संपूर्ण कोकणात भारतीय जनता पक्षाचे संघटन अधिक बळकट व भक्कम करण्याचा निर्धार पक्षाने केला

HSC Rajapur Result 2026 : राजापूरची झळाळती कामगिरी! ‘धवल यश’ परंपरा कायम”

राजापूर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE) तर्फे घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा

Kokan Railway trains : कोकण रेल्वेच्या पाच गाड्यांना संगमेश्वर येथे थांबा मिळण्याची शक्यता!

रत्नागिरी : कोकण रेल्वेसंदर्भात पार पडलेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत संगमेश्वर रेल्वे स्थानकासाठी दिलासादायक

Ratnagiri : चार वाहनांना धडक देऊन ट्रक कोसळला विहिरीत

रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गावर आज पहाटे हातखंबा येथे चार वाहनांचा भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत एक जण गंभीर

Ratnagiri : संकष्टी चतुर्थीनिमित्त गणपतीपुळे मंदिरात आकर्षक फुलांची सजावट; भाविकांची मोठी गर्दी

रत्नागिरी: रत्नागिरी जिल्ह्यातील प्रसिद्ध गणपतीपुळे मंदिरात संकष्टी चतुर्थी निमित्त अत्यंत देखणी आणि मनमोहक