पुण्यात भिडे पूल दीड महिना बंद

पुणे : सदाशिवपेठेतून डेक्कन मेट्रो स्थानकात जाण्यासाठी महामेट्रोकडून भिडे पुलावरून लोखंडी पादचारी पूल उभारण्यात येत आहे. या पुलासाठी भिडे पूल आणखी दीड महिना बंद ठेवला जाणार आहे. महामेट्रोने मार्च महिन्यात या पुलाचे काम सुरू केले होते, तर दि. ६ जूनपर्यंत ते पूर्ण करून भिडेपूल वाहतुकीसाठी खुला केला जाणार होता.

मात्र, प्रत्यक्षात या पादचारी पुलाचे काम केवळ २० टक्केच पूर्ण झाल्याने महामेट्रोने १५ ऑगस्टपर्यंत पूल बंद ठेवण्याची मागणी वाहतूक पोलीस तसेच महापालिकेकडे केली आहे.

शहराच्या पश्चिम उपनगरांमधील बहुतांश दुचाकी वाहतूक नदीपात्रातील रस्त्यावरून भिडे पुलावरून शहराच्या मध्यवर्ती पेठांमध्ये येते. दररोज सुमारे अडीच ते तीन लाख दुचाकींची या रस्त्यावर वर्दळ असते. पावसाळ्यात केवळ मुठा नदीला पाणी सोडण्यात आल्यानंतरच हा रस्ता बंद केला जातो. मात्र, आता मेट्रोच्या पादचारी पुलासाठी भिडेपूल बंद करण्यात आला आहे.

या रस्त्यावरून येणारी दुचाकी वाहनांची वाहतूक डेक्कनवरून लकडी पुलामार्गे शहरात वळवण्यात आली आहे. तर, नदीपात्रात जाण्यासाठी अनेक वाहनचालक झेड ब्रीजचा वापरहोत आहे. मात्र, हे रस्ते मोठ्या प्रमाणात येणाऱ्या दुचाकींसाठी कमी पडत असल्याने, या भागात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे.
Comments
Add Comment

मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर आणखी एक अपघात, वाहतुकीची कोंडीच कोंडी

पुणे : मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर खंडाळा घाटातील आडोशी बोगद्याजवळ पुण्याकडून मुंबईच्या दिशेने प्रोपिलीन वायू

आपत्कालीन परिस्थितीतील वाहतूक आराखडा तत्काळ तयार करा - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

मुंबई पुणे द्रुतगती महामार्ग वाहतूक कोंडीची उपमुख्यमंत्र्यांकडून गंभीर दखल मिसिंग लिंकचे कामही लवकरात लवकर

अमरावती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयासाठी १२ हेक्टर जागा मंजूर

देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेवरून महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा निर्णय १०० विद्यार्थी प्रवेश ⁠४३०

पुणे एक्सप्रेस वे अपघात प्रकरणी महाराष्ट्र राज्य परिवहन सेवेच्या १३९ फेऱ्या रद्द

मुंबई : पुणे–मुंबई एक्सप्रेस वेवर झालेल्या टँकर अपघातामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली असून या

एक्सप्रेवेवर प्रचंड मोठी वाहतूक कोंडी अन् २५ किलोमीटर पर्यंत रांगा; नेमकं पुण्यात घडलं काय ?

लोणावळा : मुंबई–पुणे द्रुतगती महामार्गावर मंगळवारी सायंकाळी घडलेल्या एका अपघातामुळे संपूर्ण मार्गावर

Congress: काँग्रेसमधला वाद चव्हाट्यावर, नगरसेवक थेट दिल्लीत पोहोचले, बैठकीत नेमकं घडलं काय?

दिल्ली: चंद्रपूर महापालिकेत सर्वाधिक जागा जिंकूनही काँग्रेसमध्ये गटातील राजकारणामुळे सत्ता गमावण्याची वेळ