पुण्यात भिडे पूल दीड महिना बंद

  20

पुणे : सदाशिवपेठेतून डेक्कन मेट्रो स्थानकात जाण्यासाठी महामेट्रोकडून भिडे पुलावरून लोखंडी पादचारी पूल उभारण्यात येत आहे. या पुलासाठी भिडे पूल आणखी दीड महिना बंद ठेवला जाणार आहे. महामेट्रोने मार्च महिन्यात या पुलाचे काम सुरू केले होते, तर दि. ६ जूनपर्यंत ते पूर्ण करून भिडेपूल वाहतुकीसाठी खुला केला जाणार होता.

मात्र, प्रत्यक्षात या पादचारी पुलाचे काम केवळ २० टक्केच पूर्ण झाल्याने महामेट्रोने १५ ऑगस्टपर्यंत पूल बंद ठेवण्याची मागणी वाहतूक पोलीस तसेच महापालिकेकडे केली आहे.

शहराच्या पश्चिम उपनगरांमधील बहुतांश दुचाकी वाहतूक नदीपात्रातील रस्त्यावरून भिडे पुलावरून शहराच्या मध्यवर्ती पेठांमध्ये येते. दररोज सुमारे अडीच ते तीन लाख दुचाकींची या रस्त्यावर वर्दळ असते. पावसाळ्यात केवळ मुठा नदीला पाणी सोडण्यात आल्यानंतरच हा रस्ता बंद केला जातो. मात्र, आता मेट्रोच्या पादचारी पुलासाठी भिडेपूल बंद करण्यात आला आहे.

या रस्त्यावरून येणारी दुचाकी वाहनांची वाहतूक डेक्कनवरून लकडी पुलामार्गे शहरात वळवण्यात आली आहे. तर, नदीपात्रात जाण्यासाठी अनेक वाहनचालक झेड ब्रीजचा वापरहोत आहे. मात्र, हे रस्ते मोठ्या प्रमाणात येणाऱ्या दुचाकींसाठी कमी पडत असल्याने, या भागात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे.
Comments
Add Comment

अशोक नगरमधील पालिकेच्या मैदानाला तलावाचे स्वरूप

नागरिकांनी वारंवार तक्रार करूनही पालिकेचे दुर्लक्ष कांदिवली : कांदिवली पूर्वेला अशोक नगरमधील एकमेव असलेल्या

महिला सक्षमीकरणात शिक्षणाची भूमिका मोलाची

आरबीएलतर्फे विद्यार्थिनींना सायकलसह शालेय साहित्याचे वितरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे

ज्ञानेश्‍वर माउलींचा पालखी प्रस्थान सोहळा यंदाच्या वर्षी रात्री ८ वाजता

पुणे : आषाढी वारीतील संत ज्ञानेश्‍वर माउलींचा पालखी प्रस्थान सोहळा यंदाच्या वर्षी रात्री आठ वाजता होणार आहे.

कोकण रेल्वे मुंबई-मडगाव मार्गावर १४ जून रोजी एकतर्फी विशेष गाडी

रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावर १४ जून रोजी एकतर्फी विशेष गाडी मुंबई मडगाव मार्गावर धावणार आहे. या गाडीचे आरक्षण

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन टप्प्यात होणार!

येत्या सप्टेंबर -ऑक्टोबर महिन्यात मतदान निवडणूक खर्चात वाढ करण्याबाबतही विचार राज्य निवडणूक आयुक्तांनी दिली

महाराष्ट्रातील पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

नदीजोड प्रकल्पासह गावपातळीवरील जलसंधारणाच्या कामातून महाराष्ट्रातील पाणी प्रश्नावर यशस्वी मात करु -