घोडबंदर रस्त्यावर सर्वंकष स्वच्छता मोहीम

  42

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेनुसार ठाणे महापािलकेची मोहीम


ठाणे :ठाणे महानगरपालिकेने संपूर्ण घोडबंदर रस्त्यावर सर्वंकष स्वच्छता मोहीम हाती घेतली असून मुख्य रस्ता, सेवा रस्ता, दुभाजक, चौक अशा सर्व ठिकाणी ही मोहीम राबवण्यात येत आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेनुसार ही सर्वंकष स्वच्छता मोहिम राबविली जात आहे.


त्यानुसार, ठाणे महापालिकेने घोडबंदर मार्गावर दुर्तफा सर्वंकष स्वच्छता मोहिम सुरु केली. कापूरबावडी ते पातलीपाडा, पातलीपाडा ते हायपर सिटी, हायपर सिटी ते नागला बंदर, नागला बंदर ते गायमुख अशा चार टप्प्याने विभाग करण्यात आले असून त्या प्रत्येक विभागासाठी समन्वयक अधिकारी नियुक्त करण्यात आला आहे. प्रत्येक विभागासाठी समन्वयक अधिकाऱ्यासोबत साहाय्यक आयुक्त, आरोग्य अधिकारी, कार्यकारी अभियंता, उप अभियंता, उपमुख्य स्वच्छता निरीक्षक, स्वच्छता निरीक्षक, कनिष्ठ अभियंता आणि स्वच्छता कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या मोहिमेत मुख्य रस्ता, सेवा रस्ता, दुभाजक या ठिकाणावरील कचरा काढणे, राडारोडा उचलणे, दुभाजक स्वच्छ करणे, नाले आणि गटारातील गाळ उचलणे, झाडांच्या कापलेल्या फांद्या उचलणे अशी कामे करण्यात येत आहेत.


महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागासोबत, उद्यान विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, प्रभाग समिती, एमएमआरडीए, एमएसआरडीसी, मेट्रो विभागाच्या कर्मचाऱ्यांनीही मोहीमेत सहभाग घेतला. सुमारे ५०० सफाई कामगार, १५ डम्पर, सफाईची यंत्र यांच्या मदतीने ही मोहीम हाती घेण्यात आली आहे. उपायुक्त मनीष जोशी आणि दिनेश तायडे, उपनगर अभियंता विकास ढोले आणि सुधीर गायकवाड यांच्यावर समन्वयाची जबाबदारी असून आरोग्य अधिकारी डॉ. राणी शिंदे, माजिवडा-मानपाडा प्रभाग समितीच्या साहाय्यक आयुक्त सोनल काळे यांच्यासह अधिकारी आणि कर्मचारी त्यांना नेमून दिलेल्या विभागातील सर्वंकष स्वच्छता अभियानात सहभागी झाले.

Comments
Add Comment

आनंदाची बातमी शिळफाटा-कल्याण ते रांजनोली वाहतूककोंडी सुटणार

ठाणे : शिळफाटा-कल्याण ते रांजनोली या पट्ट्यात वाहतूक कोंडी ही रोजची समस्या झाली आहे. यावर उपाय करण्यासाठी

कल्याणमध्ये भीषण अपघात: ट्रकने दुचाकीस्वार महिलेला चिरडले, जागीच मृत्यू

ठाणे: कल्याण पश्चिम येथील निक्कीनगर परिसरात एका दुचाकीस्वार महिलेचा भीषण अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. आपल्या

ठाणे महानगरपालिकेची प्रभाग रचना जाहीर, नगरसेवक संख्येत वाढ नाहीच, यंदाही 131 नगसेवक

मुंबई, नवी मुंबई, कल्याण डोंबिवली, ठाणे महापालिकेच्या निवडणुकीची धामधूम सुरू झाली असून आज ठाणे महानगरपालिकेची

Bhiwandi Accident : भिवंडीत खड्ड्यांनी घेतला डॉक्टरचा बळी; आतापर्यंत जीवघेण्या खड्ड्यामुळे तिघांचे प्राण गेले, जबाबदार कोण?

भिवंडी : भिवंडी शहरातील रस्त्यांची दयनीय अवस्था पुन्हा एकदा जीवघेणी ठरली आहे. वंजारपट्टी नाका परिसरात उघडखाबड

ठाण्यात मुसळधार पावसामुळे गणपती कारखान्यात शिरलं पाणी

ठाण्यात सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं असताना पावसाचा फटका गणपती मूर्तीला देखील बसला

पावसामुळे ठाण्यात ४ महिन्यांत २० जणांचा बळी!

ठाणे: गेल्या चार महिन्यांत ठाणे जिल्ह्यात पावसामुळे संबंधित घटनांमध्ये किमान २० लोकांचा मृत्यू झाला आहे, तर या