घोडबंदर रस्त्यावर सर्वंकष स्वच्छता मोहीम

  39

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेनुसार ठाणे महापािलकेची मोहीम


ठाणे :ठाणे महानगरपालिकेने संपूर्ण घोडबंदर रस्त्यावर सर्वंकष स्वच्छता मोहीम हाती घेतली असून मुख्य रस्ता, सेवा रस्ता, दुभाजक, चौक अशा सर्व ठिकाणी ही मोहीम राबवण्यात येत आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेनुसार ही सर्वंकष स्वच्छता मोहिम राबविली जात आहे.


त्यानुसार, ठाणे महापालिकेने घोडबंदर मार्गावर दुर्तफा सर्वंकष स्वच्छता मोहिम सुरु केली. कापूरबावडी ते पातलीपाडा, पातलीपाडा ते हायपर सिटी, हायपर सिटी ते नागला बंदर, नागला बंदर ते गायमुख अशा चार टप्प्याने विभाग करण्यात आले असून त्या प्रत्येक विभागासाठी समन्वयक अधिकारी नियुक्त करण्यात आला आहे. प्रत्येक विभागासाठी समन्वयक अधिकाऱ्यासोबत साहाय्यक आयुक्त, आरोग्य अधिकारी, कार्यकारी अभियंता, उप अभियंता, उपमुख्य स्वच्छता निरीक्षक, स्वच्छता निरीक्षक, कनिष्ठ अभियंता आणि स्वच्छता कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या मोहिमेत मुख्य रस्ता, सेवा रस्ता, दुभाजक या ठिकाणावरील कचरा काढणे, राडारोडा उचलणे, दुभाजक स्वच्छ करणे, नाले आणि गटारातील गाळ उचलणे, झाडांच्या कापलेल्या फांद्या उचलणे अशी कामे करण्यात येत आहेत.


महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागासोबत, उद्यान विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, प्रभाग समिती, एमएमआरडीए, एमएसआरडीसी, मेट्रो विभागाच्या कर्मचाऱ्यांनीही मोहीमेत सहभाग घेतला. सुमारे ५०० सफाई कामगार, १५ डम्पर, सफाईची यंत्र यांच्या मदतीने ही मोहीम हाती घेण्यात आली आहे. उपायुक्त मनीष जोशी आणि दिनेश तायडे, उपनगर अभियंता विकास ढोले आणि सुधीर गायकवाड यांच्यावर समन्वयाची जबाबदारी असून आरोग्य अधिकारी डॉ. राणी शिंदे, माजिवडा-मानपाडा प्रभाग समितीच्या साहाय्यक आयुक्त सोनल काळे यांच्यासह अधिकारी आणि कर्मचारी त्यांना नेमून दिलेल्या विभागातील सर्वंकष स्वच्छता अभियानात सहभागी झाले.

Comments
Add Comment

उबाठा गटाचे माजी नगरसेवक रामदास कांबळे यांचा शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश

रामदास कांबळे यांची युवासेना कार्यकारिणी सदस्यपदी नियुक्ती जाहीर ठाणे: मुंबई महानगरपालिकेतील सायन कोळीवाडा

भारत महासत्ता न होण्यासाठी तरुणाईला अंमली पदार्थांच्या आहारी लोटण्याचा परकीय शक्तींचा डाव

आयआरएस समीर वानखेडे यांचे वक्तव्य कल्याण  : ''आपला भारत देश हा महासत्ता होण्याच्या दिशेने अतिशय विश्वासाने आणि

पोलीस अधिकारी संभाजी देशमुख यांना दुसऱ्यांदा राष्ट्रपती पोलीस पदक

कल्याण : पोलीस दलात केलेल्या उल्लेखनीय कामगीरीमुळे राज्य गुप्त वार्ता विभागातील पोलीस अधिकारी संभाजी देशमुख

ठाणेकरांनो, पाण्याचा जपून वापरा करा

मंगळवारी ८ तास पाणीपुरवठा बंद डोंबिवली  : केडीएमसीच्या कल्याण (पूर्व) परिसरातील पाणीपुरवठा वितरण व्यवस्थेतील

श्रीकृष्णनाथ पांचाळ ठाण्याचे जिल्हाधिकारी

मुंबई : जालन्याचे जिल्हाधिकारी श्रीकृष्णनाथ पांचाळ यांची महाराष्ट्र सरकारने बदली केली असून ठाण्याचे

मध्य रेल्वेची ऐन सकाळी ठप्प झालेली वाहतूक सुरळीत, रेल्वे रुळाला तडे गेल्याने नोकरदारांचे झाले हाल

कर्जत: मध्य रेल्वेची लोकल वाहतूक आज सकाळी काही तासांसाठी विस्कळीत झालेली पाहायला मिळाली. पण रेल्वे प्रशासनाच्या