Microsoft Job Lay off: जगभरात नोकऱ्या जाण्याचा धडाका सुरूच मायक्रोसॉफ्ट,डिजनीकडून शेकडोंची कर्मचारी कपात

  59

भारतातील पुण्यात व हैद्राबाद शहरात आयटीतील कर्मचारी भरतीत मात्र वाढ मुंबई: आंतरराष्ट्रीय बाजारातील मंदीचा फटका आता टेक कंपन्यांनाही जाणवू लागला आहे. ज्याला मायक्रोसॉफ्ट व डिजनी सारख्या बड्या कंपन्यांही अपवाद नाहीत. ' ब्लुमबर्ग ' दिलेल्या वृत्तानुसार ३०० अतिरिक्त कर्मचाऱ्यांना नारळ दिला आहे. गेल्या महिन्यात मायक्रोसॉफ्टकडून ६००० कर्मचाऱ्यांना नारळ दिला गेला होता. त्याचीच पुनरावृत्ती आता झाली आहे. त्याच परिस्थिती डिजनी कंपनी सामोरी जात आहे. वृत्तानुसार डिजनी कंपनीने देखील शेकडो कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढले आहे. डिजनीकडून मार्केटिंग, पब्लिसिटी, कास्टिंग, फायनान्स अशा विविध विभागातून ही कार्यवाही केली आहे. मायक्रोसॉफ्टकडूनही कंपनीच्या विविध विभागांवर ही कार्यवाही केली. कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्या नाडेला विराजमान यांनी देखील याची पुष्टी केली. त्यांनी सांगितलेल्या माहितीनुसार, कंपनीच्या बदलत्या कर्मचारी धोरणात्मक निर्णयानुसार कर्मचारी कपात ठरवण्यात आली आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स विभागाची पुनर्रचना करण्यात येणार असल्याने कंपनीने हा निर्णय घेतला असल्याचे म्हटले आहे. कंपनीकडून वेतनासाठी करण्यात येणाऱ्या खर्चाची कपात म्हणून हे पाऊल उचलले गेले असल्याचे सांगण्यात येत आहे. मायक्रोसॉफ्ट कंपनीचे २२४००० हून अधिक कर्मचारी आहेत. डिजनी कंपनीचे देखील २२३००० हून अधिक कर्मचारी अमेरिका व इतर ठिकाणी कार्यरत आहेत. याचा सर्वात मोठा फटका कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी व आयटी क्षेत्रातील कंपन्यांवर पडल्याचे पहायला मिळत आहे. नुकत्याच मिळालेल्या नोकरी जॉबस्पिक वरील अहवालानुसार, वर्षानुवर्षे बेसिसवर (Year on Year Basis) आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशिन लर्निंग क्षेत्रातील नोकरीच्या संधीत २५ टक्क्यांनी घट झाली आहे. या अहवालातील माहितीनुसार, या क्षेत्रात मे २०२४ मधील नोकरीच्या संधीत मे २०२५ पर्यंत ५ टक्क्यांनी कपात झाली आहे. रिटेल, टेलिकॉम, बँकिंग, फायनान्स, ब्रोकिंग क्षेत्रातील कामगिरीत घट दिसून आली. या क्षेत्रातील संधीत ८ ते ९ टक्क्यांनी घट झाली आहे.भारतातील पुण्यात मात्र ४ टक्क्यांनी व हैद्राबाद कोची क्षेत्रात मात्र नोकरीच्या भरतीत वाढ झाल्याचे अहवालात सांगण्यात येत आहे. मात्र जागतिक बड्या कंपन्यांच्या कपातीचे वादळ जगभरात घोंघावत असताना होतकरू तरुणांच्या दृष्टीने ही आनंदाची बातमी नाही.
Comments
Add Comment

नागालँडचे राज्यपाल ला. गणेशन यांचे निधन

चेन्नई: नागालँडचे राज्यपाल ला. गणेशन (L.A. Ganesan) यांचे शुक्रवारी (१५ ऑगस्ट, २०२५) रात्री चेन्नई येथील रुग्णालयात निधन

Health: हे वाचल्यानंतर तुम्ही दररोज पोळीला तूप लावून खाल

मुंबई: भारतीय जेवणात पोळीला तूप लावून खाणे ही जुनी परंपरा आहे. अनेक वर्षांपासून ही पद्धत चालत आलेली आहे, पण केवळ

प्रत्येक वेळेस थोडीच रिटायरमेंट घेणार?' रोहित शर्माने निवृत्तीवर दिले मजेशीर उत्तर, पंतने शेअर केला व्हिडिओ

मुंबई: भारताच्या ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त, भारतीय संघाचा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतने

Accident news: स्वातंत्र्यदिनी मोठा बस अपघात! १० जणांचा जागीच मृत्यू, ३५ प्रवासी जखमी

बर्दवान: देशात स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा होत असताना पश्चिम बंगालच्या पूर्व बर्दवान जिल्ह्यातून

Independence Day 2025: विकासाच्या वाटचालीत मोदी सरकारला साथ द्या: मंत्री मंगलप्रभात लोढा

गोंदिया:  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देशाने मागील ११ वर्षांत जलद गतीने प्रगती साधली असून भारत

दिल्ली : हुमायूं मकबऱ्यात भिंत कोसळून ५ जणांचा मृत्यू

नवी दिल्ली : दिल्लीतील निजामुद्दीन भागात असलेल्या हुमायूं मकबऱ्यामध्ये भिंत कोसळल्याची