Microsoft Job Lay off: जगभरात नोकऱ्या जाण्याचा धडाका सुरूच मायक्रोसॉफ्ट,डिजनीकडून शेकडोंची कर्मचारी कपात

भारतातील पुण्यात व हैद्राबाद शहरात आयटीतील कर्मचारी भरतीत मात्र वाढ

मुंबई: आंतरराष्ट्रीय बाजारातील मंदीचा फटका आता टेक कंपन्यांनाही जाणवू लागला आहे. ज्याला मायक्रोसॉफ्ट व डिजनी सारख्या बड्या कंपन्यांही अपवाद नाहीत. ' ब्लुमबर्ग ' दिलेल्या वृत्तानुसार ३०० अतिरिक्त कर्मचाऱ्यांना नारळ दिला आहे. गेल्या महिन्यात मायक्रोसॉफ्टकडून ६००० कर्मचाऱ्यांना नारळ दिला गेला होता. त्याचीच पुनरावृत्ती आता झाली आहे. त्याच परिस्थिती डिजनी कंपनी सामोरी जात आहे. वृत्तानुसार डिजनी कंपनीने देखील शेकडो कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढले आहे.

डिजनीकडून मार्केटिंग, पब्लिसिटी, कास्टिंग, फायनान्स अशा विविध विभागातून ही कार्यवाही केली आहे. मायक्रोसॉफ्टकडूनही कंपनीच्या विविध विभागांवर ही कार्यवाही केली. कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्या नाडेला विराजमान यांनी देखील याची पुष्टी केली. त्यांनी सांगितलेल्या माहितीनुसार, कंपनीच्या बदलत्या कर्मचारी धोरणात्मक निर्णयानुसार कर्मचारी कपात ठरवण्यात आली आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स विभागाची पुनर्रचना करण्यात येणार असल्याने कंपनीने हा निर्णय घेतला असल्याचे म्हटले आहे.

कंपनीकडून वेतनासाठी करण्यात येणाऱ्या खर्चाची कपात म्हणून हे पाऊल उचलले गेले असल्याचे सांगण्यात येत आहे. मायक्रोसॉफ्ट कंपनीचे २२४००० हून अधिक कर्मचारी आहेत. डिजनी कंपनीचे देखील २२३००० हून अधिक कर्मचारी अमेरिका व इतर ठिकाणी कार्यरत आहेत.

याचा सर्वात मोठा फटका कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी व आयटी क्षेत्रातील कंपन्यांवर पडल्याचे पहायला मिळत आहे. नुकत्याच मिळालेल्या नोकरी जॉबस्पिक वरील अहवालानुसार, वर्षानुवर्षे बेसिसवर (Year on Year Basis) आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशिन लर्निंग क्षेत्रातील नोकरीच्या संधीत २५ टक्क्यांनी घट झाली आहे. या अहवालातील माहितीनुसार, या क्षेत्रात मे २०२४ मधील नोकरीच्या संधीत मे २०२५ पर्यंत ५ टक्क्यांनी कपात झाली आहे.

रिटेल, टेलिकॉम, बँकिंग, फायनान्स, ब्रोकिंग क्षेत्रातील कामगिरीत घट दिसून आली. या क्षेत्रातील संधीत ८ ते ९ टक्क्यांनी घट झाली आहे.भारतातील पुण्यात मात्र ४ टक्क्यांनी व हैद्राबाद कोची क्षेत्रात मात्र नोकरीच्या भरतीत वाढ झाल्याचे अहवालात सांगण्यात येत आहे. मात्र जागतिक बड्या कंपन्यांच्या कपातीचे वादळ जगभरात घोंघावत असताना होतकरू तरुणांच्या दृष्टीने ही आनंदाची बातमी नाही.
Comments
Add Comment

श्रीलंका टी-२० मालिकेसाठी भारतीय महिला संघ जाहीर

मुंबई : वर्ल्ड चॅम्पियन भारतीय संघ अखेरीस मोठ्या विश्रांतीनंतर मैदानावर उतरणार आहे. महिला एकदिवसीय विश्वचषक

महाराष्ट्राला थंडीच्या लाटेचा इशारा

मुंबई : राज्यासह देशातील वातावरणात सातत्याने बदला होताना दिसत आहे. डिसेंबर महिन्याचा पहिला आठवडा गेला असूनही

भारताचे द. आफ्रिकेसमोर १७६धावांचे लक्ष्य, हार्दिक पांड्याचे धमाकेदार अर्धशतक

कटक (वृत्तसंस्था) : कटकच्या मैदानात सध्या हार्दिक पांड्याच्या बॅटने आफ्रिकेच्या गोलंदाजांची धुलाई सुरू केली.

विठुनामाच्या जयघोषाने मुंबापुरी दुमदुमणार

मुंबई : वारकरी संप्रदायाच्या वैचारिक ऐश्वर्याचे दर्शन मुंबईकरांना घडावे यासाठी गेली २६ वर्ष सुरू असणारा

थ्री इडियट्सचा सिक्वेल २०२६ मध्ये येणार, सिनेप्रेमींची वाढली उत्सुकता

मुंबई : तब्बल १५ वर्षांनंतर बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय आणि आयकॉनिक चित्रपटांपैकी एक असलेल्या ‘थ्री

IPL 2026 Auction: टॉप 5 गटात 34 खेळाडूंवर लागणार बोली

IPL 2026 मिनी लिलावासाठी एकूण 350 खेळाडूंची नावं निश्चित करण्यात आलेली आहे . टॉप खेळाडूंसाठी पाच गट करण्यात आले आहेत.