महाराष्ट्र एटीएसची साकीब नाचणच्या घरावर धाड, पडघ्यात शोध मोहीम

ठाणे : महाराष्ट्र एटीएसने ठाणे जिल्ह्यातील पडघा येथे धाड टाकली आहे. निवडक घरांमध्ये सर्च ऑपरेशन सुरू आहे. तसेच महाराष्ट्र एटीएसने अतिरेकी साकीब नाचणच्या घरावरही धाड टाकली आहे. साकीब हा बंदी असलेल्या स्टुडंट इस्लामिक मुव्हमेंट ऑफ इंडिया अर्थात सिमी या संघटनेचा पदाधिकारी आहे. साकीबला आधीच दोन प्रकरणांमध्ये दोषी ठरवण्यात आले आहे.

एटीएसने धाड टाकण्याचे कारण अद्याप समजलेले नाही. पण शोध मोहीम सुरू असल्याचे तसेच काही साहित्य जप्त करण्यात आल्याचे वृत्त आहे. या वृत्ताला अद्याप दुजोरा मिळालेला नाही.

मुंबईत २००२-२००३ मध्ये मुंबई सेंट्रल रेल्वे स्टेशन, विलेपार्ले आणि मुलुंडमध्ये बॉम्बस्फोट झाले होते. या प्रकरणात साकीबला दोषी ठरवण्यात आले आहे. साकीब २०१७ मध्ये तुरुंगातून बाहेर आला. यानंतर तो पुन्हा अतिरेकी कारवायांमध्ये सहभागी झाल्याचा आरोप होत आहे. साकीब नाचणने तुरुंगातून बाहेर येताच पडघा येथे अज्ञात ठिकाणी AK47 रायफलसह अनेक संहारक शस्त्रे हाताळण्याचे प्रशिक्षण घेतले. सिमीशी संबंधित एका व्यक्तीनेच ही माहिती दिली. ही माहिती मिळाल्यानंतर एटीएसने कारवाई केली आहे.
Comments
Add Comment

कोकण रेल्वे मार्गावरील कोलमडलेल्या वेळापत्रकाची चौकशी करून ठोस उपाययोजना करा

एसएमएस प्रणाली अद्ययावत करून प्रवाशांना सुखकर प्रवासाची योग्य सेवा, सुविधा द्या खासदार नरेश म्हस्के यांचे

ठाण्यातील २३ जण दुबईत अडकले

ठाणे : इराण आणि इस्रायल यांच्यात सुरू असलेल्या युद्धपरिस्थितीचा आंतरराष्ट्रीय विमानसेवेवर परिणाम झाला असून

Udddhav Thackeray : उद्धव ठाकरेंना डोंबिवलीत मोठा धक्का! विभाग प्रमुखांसह शेकडो कार्यकर्त्यांच्या हाती 'धनुष्यबाण'

मुंबई : राज्यात नुकत्याच पार पडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे निकाल पाहता, भारतीय जनता

ठाणे आणि विरार बुलेट ट्रेन स्थानक होणार स्मार्ट; एमएमआरडीएचा मास्टर प्लॅन

प्रवाशांना अत्याधुनिक सोयी-सुविधा उपलब्ध ठाणे : मुंबई – अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पातील महाराष्ट्रातील ठाणे

पाणीटंचाई विरोधात पीएनटी कॉलनीतील नागरिकांचा कडोंमपा मुख्यालयावर मोर्चा

२५ दिवसांपासून पाणीपुरवठा बंद कल्याण : कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील डोंबिवली पूर्वेतील नांदिवली

मीरा-भाईंदरमधील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी महापौर सक्रिय

भाईंदर : शहरात दिवसेंदिवस वाढत चाललेली वाहतूक कोंडीची समस्या, त्यामुळे सामान्य नागरिकांना होणारा त्रास तसेच