महाराष्ट्र एटीएसची साकीब नाचणच्या घरावर धाड, पडघ्यात शोध मोहीम

  67

ठाणे : महाराष्ट्र एटीएसने ठाणे जिल्ह्यातील पडघा येथे धाड टाकली आहे. निवडक घरांमध्ये सर्च ऑपरेशन सुरू आहे. तसेच महाराष्ट्र एटीएसने अतिरेकी साकीब नाचणच्या घरावरही धाड टाकली आहे. साकीब हा बंदी असलेल्या स्टुडंट इस्लामिक मुव्हमेंट ऑफ इंडिया अर्थात सिमी या संघटनेचा पदाधिकारी आहे. साकीबला आधीच दोन प्रकरणांमध्ये दोषी ठरवण्यात आले आहे.

एटीएसने धाड टाकण्याचे कारण अद्याप समजलेले नाही. पण शोध मोहीम सुरू असल्याचे तसेच काही साहित्य जप्त करण्यात आल्याचे वृत्त आहे. या वृत्ताला अद्याप दुजोरा मिळालेला नाही.

मुंबईत २००२-२००३ मध्ये मुंबई सेंट्रल रेल्वे स्टेशन, विलेपार्ले आणि मुलुंडमध्ये बॉम्बस्फोट झाले होते. या प्रकरणात साकीबला दोषी ठरवण्यात आले आहे. साकीब २०१७ मध्ये तुरुंगातून बाहेर आला. यानंतर तो पुन्हा अतिरेकी कारवायांमध्ये सहभागी झाल्याचा आरोप होत आहे. साकीब नाचणने तुरुंगातून बाहेर येताच पडघा येथे अज्ञात ठिकाणी AK47 रायफलसह अनेक संहारक शस्त्रे हाताळण्याचे प्रशिक्षण घेतले. सिमीशी संबंधित एका व्यक्तीनेच ही माहिती दिली. ही माहिती मिळाल्यानंतर एटीएसने कारवाई केली आहे.
Comments
Add Comment

आनंदाची बातमी शिळफाटा-कल्याण ते रांजनोली वाहतूककोंडी सुटणार

ठाणे : शिळफाटा-कल्याण ते रांजनोली या पट्ट्यात वाहतूक कोंडी ही रोजची समस्या झाली आहे. यावर उपाय करण्यासाठी

कल्याणमध्ये भीषण अपघात: ट्रकने दुचाकीस्वार महिलेला चिरडले, जागीच मृत्यू

ठाणे: कल्याण पश्चिम येथील निक्कीनगर परिसरात एका दुचाकीस्वार महिलेचा भीषण अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. आपल्या

ठाणे महानगरपालिकेची प्रभाग रचना जाहीर, नगरसेवक संख्येत वाढ नाहीच, यंदाही 131 नगसेवक

मुंबई, नवी मुंबई, कल्याण डोंबिवली, ठाणे महापालिकेच्या निवडणुकीची धामधूम सुरू झाली असून आज ठाणे महानगरपालिकेची

Bhiwandi Accident : भिवंडीत खड्ड्यांनी घेतला डॉक्टरचा बळी; आतापर्यंत जीवघेण्या खड्ड्यामुळे तिघांचे प्राण गेले, जबाबदार कोण?

भिवंडी : भिवंडी शहरातील रस्त्यांची दयनीय अवस्था पुन्हा एकदा जीवघेणी ठरली आहे. वंजारपट्टी नाका परिसरात उघडखाबड

ठाण्यात मुसळधार पावसामुळे गणपती कारखान्यात शिरलं पाणी

ठाण्यात सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं असताना पावसाचा फटका गणपती मूर्तीला देखील बसला

पावसामुळे ठाण्यात ४ महिन्यांत २० जणांचा बळी!

ठाणे: गेल्या चार महिन्यांत ठाणे जिल्ह्यात पावसामुळे संबंधित घटनांमध्ये किमान २० लोकांचा मृत्यू झाला आहे, तर या