उपसा सिंचन योजनेसाठी मंत्री विखेंचा महत्त्वपूर्ण निर्णय : आ. अमोल खताळ

संगमनेर : तालुक्यातील खांबे येथील कामधेनू सहकारी उपसा सिंचन योजनेसाठी आ.अमोल खताळ यांनी केलेल्या प्रयत्नांना यश आले असून जॅकवेल घेण्यास जलसंपदा विभागाने मंजुरी दिल्याचे पत्र जलसंपदा मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्वतः येवून ग्रामस्थाकडे सुपूर्द केले.जलसंपदाच्या निर्णायमुळे खांबा गावाच्या पाणी प्रश्नातील मोठा अडथळा दूर झाला आहे.


खांबा गावाला वर्षानुवर्ष पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे.पाणी प्रश्न सुटावा म्हणून ग्रामस्थांनी आग्रही मागणी मंत्री विखे पाटील यांच्याकडे विधानसभा निवडणुकीपुर्वी केली होती.राज्यात महायुतीचे सरकार आल्यानंतर आ.अमोल खताळ यांनी या मागणीचा पाठपुरावा जलसंपदा मंत्री विखे पाटील यांच्याकडे केल्यानंतर जलसंपदा विभागाने सादर झालेल्या प्रस्तावला शर्थी आणि अटी टाकून म्हैसगाव तास या पुलापासून मुळा धरणाच्या बुडीत क्षेत्रात साधारणपणे ५० ते ७५ मीटर अंतरावर मुळा धरणाच्या भीतींपासून २२ कि.मी.अंतरावर तीन गुंठे जागा जॅकवेल अप्रोच ब्रीज व पंप हाऊसचे काम करण्यासाठी जलसंधारण विभागास ना हरकत पत्र दिल्याने गावासाठी स्वतंत्र जॅकवेल घेण्याची मोठी अडचण दूर झाली आहे.खांबा गावाचा पाणी प्रश्न सोडविणार आशी ग्वाही मंत्री विखे पाटील यांनी विधानसभा निवडणुकीपुर्वी गावात झालेल्या कार्यक्रमात दिली होती. आ.अमोल खताळ यांनी यासाठी केलेला पाठपुरावा निर्णायक ठरला आहे.


रविवारी मंत्री विखे पाटील आणि आ.अमोल खताळ कार्यकारी अभियंता सायली पाटील यांच्या उपस्थितीत खांबा गावचे सरपंच रविंद्र दातीर आणि ग्रामस्थांना हे पत्र सुपूर्द करण्यात आले.


संगमनेर तालुक्यातील पठार भागाला पाणी मिळवून देण्याचे आश्वासन दिले होते त्याची सुरूवात झाली आहे.अजून या प्रश्नावर खूप काम करायचे असून जलसंपदा मंत्री विखे पाटील यांच्या सहकार्याने दिलेल्या आश्वासनाची नक्की पूर्तता होईल आशी प्रतिक्रीया आ.अमोल खताळ यांनी व्यक्त केले.


सरपंच रविंद्र दातीर यांनी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि आ.अमोल खताळ यांच्या सहकार्याने खांबे गावाला मोठा दिलासा मिळाला असून लवकर जॅकवेल आणि पंप हाऊसचे काम करून गावासाठी पाणी आणण्याचे स्वप्न पूर्ण करणार असल्याची भावना व्यक्त केली.

Comments
Add Comment

Yavatmal Bus Fire : यवतमाळ-भारी विमानतळ मार्गावर मिनी ट्रॅव्हल्स जळून खाक; जळत्या ट्रॅव्हल्समधून...

यवतमाळ : वर्धा येथून नांदेडच्या दिशेने प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या एका मिनी ट्रॅव्हल्सला यवतमाळ शहराजवळील भारी

दीर्घ काळापासून प्रलंबित शिक्षक भरतीचा मार्ग अखेर मोकळा

-‘पवित्र’ पोर्टलद्वारेच होणार नियुक्त्या; खासगी संस्थांना ‘रोस्टर’चे बंधन, राज्यातील हजारो उमेदवारांना

पुण्यात ईदनिमित्त वाहतुकीत बदल; लष्कर परिसरातील काही रस्ते बंद

पुणे : रमजान ईदनिमित्त लष्कर भागातील इदगाह मैदानावर सामूहिक नमाज पठणाचे आयोजन करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर

ST Bus : उत्पन्नाच्या तुलनेत 'एसटी'ला दररोज २ कोटींचा तोटा

- महसूल वाढीसाठी इंधन विक्री क्षेत्रात उतरणार; परिवहन मंत्री सरनाईक यांनी आखली विशेष योजना मुंबई : राज्याची

अस्पृश्यता आणि विषमता हा मानवतेविरुद्धचा सर्वात मोठा अपराध

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; चवदार तळे सत्याग्रह शताब्दी वर्षानिमित्त विविध प्रकल्पांचे भूमिपूजन मुंबई :

डिझेल खरेदीतून वर्षाला २४१ कोटी रुपयांची बचत होणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी दिली माहिती

मुंबई: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची (एसटी) आर्थिक स्थिती सक्षम करण्यासाठी पर्यायी उत्पन्न स्रोत