पुणे : शनिवारी संध्याकाळी सदाशिव पेठेतील भावे हायस्कूल परिसर रक्तबंबाळ झाला. एका मद्यधुंद कारचालकाने चहा पित असलेल्या १२ एमपीएससी विद्यार्थ्यांना भरधाव कारने उडवले. अरुंद रस्त्यांमध्ये अचानक घडलेल्या या थरारक घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
या धडकेत तिघांची प्रकृती गंभीर असून उर्वरित नऊ जणांना किरकोळ जखमा झाल्या आहेत. सगळ्यांवर सध्या संचेती आणि मोडक रुग्णालयात उपचार सुरू आहेत. विशेष म्हणजे, या विद्यार्थ्यांपैकी काही रविवारी होणा-या एमपीएससी परीक्षेला बसणार होते. पण आता त्यांचं भविष्य हॉस्पिटलच्या बेडवर थांबले आहे.
या घटनेचा व्हिडीओ सीसीटीव्हीत कैद झाला आहे. फुटेजनुसार, मद्यधुंद अवस्थेत असलेला चालक रस्त्यावरील नियंत्रण हरपून थेट विद्यार्थ्यांच्या गर्दीत बेदरकारपणे घुसला. या विद्यार्थ्यांमध्ये तीन मुलींचाही समावेश आहे.
नवी दिल्ली : देशात सध्या एकूण ३,३९५ अॅक्टिव्ह कोविड रुग्णांची नोंद असून, गेल्या २४ तासांत चार मृत्यू झाल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने शनिवारी ...
अपघात होताच परिसरात एकच गोंधळ उडाला. रक्ताच्या थारोळ्यात मित्रांचे आवाज, मदतीचे आर्त साद आणि धावपळ सुरू झाली. पोलिसांनी तत्काळ कारचालकाला अटक केली असून त्याच्यावर दारूच्या नशेत गाडी चालवण्याचा गुन्हा दाखल केला आहे.
घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि आमदार हेमंत रासणे घटनास्थळी दाखल झाले. रासणे यांनी त्वरित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी संपर्क साधून संपूर्ण माहिती दिली. मुख्यमंत्र्यांनी सर्व जखमींवर तत्काळ आणि मोफत उपचार करण्याचे आदेश दिले आहेत.
या विद्यार्थ्यांच्या परीक्षेबाबत आता शासनाकडून विशेष निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः रुग्णालयात जाऊन विद्यार्थ्यांची भेट घेतली आणि “आवश्यक ती मदत सरकार देईल,” असे आश्वासन दिले.
दरम्यान, या दुर्घटनेने पुन्हा एकदा मद्यधुंद वाहनचालकांविरोधात कठोर कारवाईची गरज अधोरेखित केली आहे. चहा प्यायला जमलेले निरागस विद्यार्थी दारूच्या नशेत गाडी चालवणा-या एका बेजबाबदार व्यक्तीच्या चुकीचा बळी ठरले. आता पाहावे लागेल की या विद्यार्थ्यांचे नुकसान भरून काढण्यासाठी सरकार काय विशेष पाऊलं उचलते.