‘शाळा बंद’ धोरणाविरुद्ध उच्च न्यायालयात आव्हान

हायकोर्टाने बजावली शिक्षण विभागास नोटीस


अमरावती : बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम, २००९ अन्वये महाराष्ट्र शासनास स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांतील कमी पटसंख्येचे कारण पुढे करून शिक्षक पदे कमी करणे अथवा शाळा बंद करणे असे धोरण राबविता येणार नाही. या संदर्भातील जनहित याचिकेवर मुंबई उच्च न्यायालय यांच्या कोल्हापूर येथील खंडपीठासमोर सुनावणी झाली. न्यायमूर्ती माधव जामदार व न्यायमूर्ती प्रवीण पाटील यांनी महाराष्ट्र शासनासह सर्व प्रतिवादींना नोटीस बजावून २ एप्रिलपूर्वी आपले म्हणणे सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

निवृत्त उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती तानाजी नलवडे तसेच महाराष्ट्र राज्याचे निवृत्त शिक्षण संचालक महावीर माने यांनी दाखल केलेल्या या जनहित याचिकेत, बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम, २००९ ची काटेकोर अंमलबजावणी करण्याची जबाबदारी शासनाची असल्याचे नमूद करण्यात आले आहे. प्रत्येक विद्यार्थ्यास दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी अधिक सोयी सुविधा उपलब्ध करून देणे अपेक्षित असताना, कमी पटसंख्येच्या शाळांमध्ये कंत्राटी धोरण राबवून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणात अडथळे निर्माण होत असल्याचे याचिकेत स्पष्ट करण्यात आले आहे.

जनहित याचिकेत शिक्षणाचा अधिकार कायद्यानुसार प्रत्येक वर्गासाठी किमान एक शिक्षक अनिवार्य असावा, सर्व शाळांना पुरेशा भौतिक सुविधा उपलब्ध कराव्यात, २५ टक्के प्रवेश आर्थिक मागास विद्यार्थ्यांसाठी राखीव असून, अशा विद्यार्थ्यांकडून विनाअनुदानित खाजगी शाळांनी कोणताही आगाऊ निधी किंवा शुल्क आकारू नये. बंद असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांच्या इमारतींचे कोणत्याही व्यक्ती किंवा संस्थेकडे हस्तांतरण करू नये. बाल हक्क संरक्षण आयोगाने आपली वैधानिक जबाबदारी काटेकोरपणे पार पाडावी, आदी विद्यार्थी हिताच्या मागण्या करण्यात आल्या आहेत. याचिकाकर्त्यांच्या वतीने ऍड. अहिल्या नलवडे, ऍड. उमाकांत वाघमारे, ऍड. सुमीत धनवडे, ऍड. मोहन चव्हाण, ऍड. विश्वजित नलवडे, ऍड. लक्ष्मण पाटील आणि ऍड. श्रेयस सामंत हे काम पाहत आहेत.

Comments
Add Comment

Mumbai-Pune Expressway : 'मिसिंग लिंक'जवळ भीषण साखळी अपघात; सुदैवाने जीवितहानी टळली

लोणी काळभोर/बोरघाट: मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील अत्यंत महत्त्वाच्या आणि नुकत्याच सुरू झालेल्या 'मिसिंग लिंक'

Ramdara Mandir : रामदरा शिवालयाचे गर्भगृह नूतनीकरण; १८ जुलैपर्यंत मंदिर भाविकांसाठी बंद

लोणी काळभोर (पुणे): पुणे जिल्ह्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र रामदरा शिवालय मंदिराच्या गर्भगृहाचे नूतनीकरण आणि

Pandharpur Crime : धक्कादायक! रेल्वे रुळांजवळ मृतदेह, तुटलेला पाय घराच्या दरवाज्यात टांगलेला अवस्थेत

पंढरपूर पोलिसांसमोर गूढ वाढले पंढरपूर : धावत्या रेल्वेची धडक बसून 24 वर्षीय रिक्षाचालकाचा मृत्यू  (Railway Accident Death)

Jalgaon : आरपीएफच्या सहाय्यक फौजदाराचा स्वतःवर गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न, अमळनेर रेल्वे स्थानकात खळबळ

Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील अमळनेर रेल्वे स्थानकावर (Amalner Railway Station) सोमवारी मध्यरात्री एक धक्कादायक घटना घडली. रेल्वे

Drinking Water Policy : ग्रामीण भागात शाश्वत पाणीपुरवठ्यासाठी नवे धोरण; दरमहा 150 ते 400 रुपये पाणीपट्टी आकारणार

मुंबई : ग्रामीण भागातील नागरिकांना स्वच्छ, निर्जंतुक आणि शाश्वत पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी राज्य

Maharashtra Monsoon Weather Alert : मान्सूनची वाटचाल ठप्प! महाराष्ट्रात आणखी काही दिवस उकाड्याचा तडाखा; मुंबईकरांना पावसासाठी करावी लागणार प्रतीक्षा

मुंबई : राज्यभरात पावसाची आतुरतेने वाट पाहणाऱ्या नागरिकांसाठी निराशाजनक बातमी आहे. नैऋत्य मोसमी पावसाची