Buldhana News: आईला कॉल करत संपवलं आयुष्य; नेमकं घडलं काय?

बुलढाणा: आईला शेवटचा कॉल करुन तरुणाने आपली जीवनयात्रा संपवल्याची बातमी समोर येत आहे. ही काळीज पिळवटून टाकणारी घटना बुलढाण्यामध्ये घडली आहे. आई हा अखेरचा संवाद असे म्हणत मुलाने आपल्या जन्मदातीला कॉल केला अन् गळफास घेत आयुष्य संपवले. ज्ञानेश्वर एकनाथ सपकाळ असं आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. या घटनेने संपूर्ण जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे.



आई हा शेवटचा कॉल..


याबाबत सविस्तर माहिती अशी की, बुलढाण्याच्या करडीमध्ये एका तरुणाने आईला कॉल करुन त्यांच्या डोळ्यादेखत आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. मृत एकनाथ सपकाळ वय वर्ष ३९ यांचे धाड येथील भाग १, गट क्र. ५७ मध्ये शेत आहे. २ मार्च रोजी सायंकाळी ७.३० वाजेच्या सुमारास ज्ञानेश्वर यांनी आपल्या आईला फोन केला आणि हा आपला शेवटचा संवाद असल्याचे सांगितले. आई, हा माझा तुला शेवटचा फोन आहे...' असं ते आईला कॉलवर बोलले.


मुलाचे हे शब्द ऐकताच आईच्या पोटात गोळा आला. आपला लेक काहीतरी विपरित पाऊल उचलतोय हे त्यांच्या लक्षात आले अन त्यांनी दुसऱ्या मुलासह शेताकडे धाव घेतली. ते शेतात पोहोचले तेव्हा ज्ञानेश्वर यांचा फोन सुरूच होता. समोरून आई आणि भाऊ येताना दिसताच, ज्ञानेश्वर यांनी आंब्याच्या झाडाला बांधलेल्या नायलॉन दोरीच्या साहाय्याने गळफास घेऊन उडी घेतली. काही क्षणांतच त्यांची प्राणज्योत मालवली. आई आणि भावाच्या डोळ्यादेखत हा काळीज पिळवटून टाकणारा प्रकार घडला.



आई आणि भावाच्या डोळ्यादेखत आत्महत्या


या घटनेची माहिती मिळताच धाड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळ पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी धाड येथील ग्रामीण रुग्णालयात रवाना केला. ज्ञानेश्वर यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगा आणि भाऊ असा मोठा आप्त परिवार आहे. या प्रकरणी रघुनाथ पांडुरंग सपकाळ यांनी धाड पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी मर्ग दाखल केला आहे. त्यांनी आत्महत्या का केली, याचे कारण समजू शकले नाही. गुन्ह्याचा पुढील तपास ठाणेदार प्रताप भोस यांच्या मार्गदर्शनात पोलिस अंमलदार श्रीकृष्ण चव्हाण हे करत आहेत.

Comments
Add Comment

Latur : शिवराज मोटेगावकरांना जिल्हाधिकाऱ्यांची नोटीस; अनधिकृत बांधकाम प्रकरण तापले

लातूर : लातूर ग्रामीणमधील खोपेगाव ग्रामपंचायत हद्दीतील गट क्रमांक ११४ मधील बांधकाम प्रकरणी विकासक Shivraj Motegaonkar यांना

Latur : लातूरच्या ‘ट्युशन एरिया’वर प्रशासनाचा मोठा घाव; अनधिकृत व्यवसाय बंद करण्याचे आदेश

लातूर : लातूरच्या शिक्षण व्यवसायावर आता प्रशासनाने थेट कारवाईचा बडगा उगारला आहे. नीट पेपरफुटी प्रकरणानंतर

Gadchiroli : गडचिरोलीत माओवाद्यांचा शस्त्रनिर्मिती कारखाना उद्ध्वस्त

गडचिरोली : गडचिरोली जिल्हा माओवादमुक्त करण्याच्या दिशेने पोलिसांनी आणखी एक मोठे यश संपादन केले आहे. ‘ऑपरेशन

Maharashtra HSC Marksheet Date : बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी अपडेट! ‘या’ तारखेपासून मिळणार मूळ गुणपत्रिका

मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (MSBSHSE) बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची

CM Fadnavis's Journey by Vande Bharat Train : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला वन्दे भारतने प्रवास, प्रवासादरम्यान केले फाईल्सचे कामही पूर्ण

मुंबई : पंतप्रधानांच्या आवाहनानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे काही दिवसांपूर्वी बाईकवरून विधान भवनात

Mango Juice Caused Poisoned : "आंब्याचा रस पिल्याने एकाच कुटुंबातील 7 जणांना झाली विषबाधा !"

अहिल्यानगर : मुंबईत गेल्या महिन्यात एकाच कुटुंबात चार जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली होती.