Buldhana News: आईला कॉल करत संपवलं आयुष्य; नेमकं घडलं काय?

बुलढाणा: आईला शेवटचा कॉल करुन तरुणाने आपली जीवनयात्रा संपवल्याची बातमी समोर येत आहे. ही काळीज पिळवटून टाकणारी घटना बुलढाण्यामध्ये घडली आहे. आई हा अखेरचा संवाद असे म्हणत मुलाने आपल्या जन्मदातीला कॉल केला अन् गळफास घेत आयुष्य संपवले. ज्ञानेश्वर एकनाथ सपकाळ असं आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. या घटनेने संपूर्ण जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे.



आई हा शेवटचा कॉल..


याबाबत सविस्तर माहिती अशी की, बुलढाण्याच्या करडीमध्ये एका तरुणाने आईला कॉल करुन त्यांच्या डोळ्यादेखत आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. मृत एकनाथ सपकाळ वय वर्ष ३९ यांचे धाड येथील भाग १, गट क्र. ५७ मध्ये शेत आहे. २ मार्च रोजी सायंकाळी ७.३० वाजेच्या सुमारास ज्ञानेश्वर यांनी आपल्या आईला फोन केला आणि हा आपला शेवटचा संवाद असल्याचे सांगितले. आई, हा माझा तुला शेवटचा फोन आहे...' असं ते आईला कॉलवर बोलले.


मुलाचे हे शब्द ऐकताच आईच्या पोटात गोळा आला. आपला लेक काहीतरी विपरित पाऊल उचलतोय हे त्यांच्या लक्षात आले अन त्यांनी दुसऱ्या मुलासह शेताकडे धाव घेतली. ते शेतात पोहोचले तेव्हा ज्ञानेश्वर यांचा फोन सुरूच होता. समोरून आई आणि भाऊ येताना दिसताच, ज्ञानेश्वर यांनी आंब्याच्या झाडाला बांधलेल्या नायलॉन दोरीच्या साहाय्याने गळफास घेऊन उडी घेतली. काही क्षणांतच त्यांची प्राणज्योत मालवली. आई आणि भावाच्या डोळ्यादेखत हा काळीज पिळवटून टाकणारा प्रकार घडला.



आई आणि भावाच्या डोळ्यादेखत आत्महत्या


या घटनेची माहिती मिळताच धाड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळ पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी धाड येथील ग्रामीण रुग्णालयात रवाना केला. ज्ञानेश्वर यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगा आणि भाऊ असा मोठा आप्त परिवार आहे. या प्रकरणी रघुनाथ पांडुरंग सपकाळ यांनी धाड पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी मर्ग दाखल केला आहे. त्यांनी आत्महत्या का केली, याचे कारण समजू शकले नाही. गुन्ह्याचा पुढील तपास ठाणेदार प्रताप भोस यांच्या मार्गदर्शनात पोलिस अंमलदार श्रीकृष्ण चव्हाण हे करत आहेत.

Comments
Add Comment

Monsoon in Jalgaon : पावसाची ९२ टक्के तूट; पेरण्या खोळंबल्यामुळे शेतकरी चिंतेत

जळगाव : जळगाव जिल्ह्यात मान्सूनच्या आगमनाने मोठी ओढ दिल्याने गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. हवामान

Weather Station : प्रत्येक गावात वेदर स्टेशन बसवण्यासाठी केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठवणार : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

मुंबई : फळपीक विमा योजनेतील शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानीची अचूक भरपाई मिळवून देण्यासाठी राज्यातील प्रत्येक

Beed Murder Case: धक्कादायक! भांडण सोडवायला गेला आणि जीव गमावून बसला

बीडमध्ये हॉटेल चालकाची हत्या Beed Murder Case : बीड : बीड (Beed) जिल्ह्यातील केज तालुक्यात एका २५ वर्षीय हॉटेल चालकाची चाकूने

Devendra Fadnavis : ९७ हजार ७०६ कोटींच्या पुरवणी मागण्या सादर

 फडणवीस सरकारचा नवा विक्रम; शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी २० हजार ७५२ कोटींची तरतूद मुंबई : पावसाळी अधिवेशनाच्या

Ambenali Ghat: २०० फूट दरीत कोसळलेल्या तरुणाला मिळाली 'नवसंजीवनी'; स्थानिक ट्रेकर्सचे धाडसी ऑपरेशन!

महाबळेश्वर (सातारा) : निसर्गाच्या कुशीत वसलेल्या आणि घनदाट जंगलासाठी ओळखल्या जाणाऱ्या महाबळेश्वरच्या आंबेनळी

Devendra Fadnavis : महिला शेतकऱ्यांना कायदेशीर दर्जा देणार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; ५६ लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा फायदा होणार मुंबई : "राज्य विधिमंडळाचे सोमवारपासून