शहापूरची लेक इस्रोत शास्त्रज्ञ

शहापूर : शहापूर तालुक्यातील शिरगांव गावातील सुजाता रामचंद्र मडके हिची इंडियन रिसर्च सेंटर (इस्रो) मध्ये शास्त्रज्ञ म्हणून निवड झाली आहे. सुजाताच्या संशोधनातून शहापूर तालुक्याचा झेंडा आता इस्रोमध्येही झळकणार आहे. प्रादेशिक परिवहन कार्यालय ठाणे येथील सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक पदाचा राजीनामा देऊन भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) बेंगलुर (कर्नाटक) येथे शास्रज्ञ (राजपत्रित अधिकारी) या पदावर सुजाता रुजू झाली आहे.
इयत्ता पहिली ते सातवीपर्यंतचे प्राथमिक शिक्षण शिरगांव जिल्हा परिषद शाळेत झालेल्या सुजाताचा प्रवास प्रेरणादायी आहे.


सुजाताने शहापूर येथील ग. वि. खाडे विद्यालयात माध्यमिक शिक्षण पूर्ण करुन नंतर तिने (आयआयटी) खरगपूर येथे मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशनच्या कार्यक्रमांतर्गत व्हच्र्युअल लॅब प्रोजेक्ट ३ मध्ये रिसर्च इंजिनिअर म्हणून काम केले आहे. त्यापुर्वी सुजाताची सहाय्यक अभियंता म्हणून महाजेन्को मध्ये निवड झालेली होती. संरक्षण संशोधन आणि विकास संघटना (डीआरडीओ) मध्ये सायंटिस्ट बी पदाच्या मुलाखतीपर्यंत आणि भाभा अणु संशोधन केंद्र (बीएआरसी), ट्रॉम्बेच्या टेक्निकल ऑफिसर पदाच्या मुलाखतीपर्यंत तिने धडक मारलेली आहे. तसेच महाराष्ट्र लोक सेवा आयोगाच्या (एमपीएससी) परिक्षेत यश संपादन करुन प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) ठाणे येथे सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक या पदावर कार्यरत होती.


दरम्यान नुकतेच ती भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो), बेंगळुरूमध्ये सायंटिफिक ऑफिसर (एसओएससी) या पदावर रुजू झाली आहे.



इस्रोच्यावतीने सुजाताला मिळालेल्या संधीचा वडील म्हणून सार्थ अभिमान आहे. ग्रामीण भागात राहून केवळ प्रचंड मेहनत ,जिद्द व ध्येय बाळगल्यास निश्चित यशापर्यंत पोहोचता येते, असे सुजाताचे वडील रामचंद्र मडके यांनी म्हटले आले. निश्चितच शहापूरसाठी देखील ही अभिमानाची गोष्ट आहे.


मला इथंपर्यंत पोहोचता आले याचा मला आनंद आहे. शाळा, महाविद्यालयातील शिक्षकांनी वेळोवेळी केलेले मार्गदर्शन अतिशय महत्त्वाचे होते. आईवडिल माझ्यामागे ठामपणे उभे राहिले. त्यांनी केलेले संस्कार व मार्गदर्शन यामुळेच मला इस्रोपर्यंत पोहचता आले. - सुजाता रामचंद्र मडके

Comments
Add Comment

भारत - पाकिस्तान सामन्यावरुन मविआत बेबनाव

नाशिक : आशिया चषक टी २० क्रिकेट स्पर्धेच्या साखळी सामन्यात आज भारत आणि पाकिस्तान दुबईत आमनेसामने असतील. हा सामना

बीएसएनएलची टॉवर उभारण्याची योजना का मंदावली? २,७५१ ऐवजी केवळ ९३० गावांमध्येच टॉवर उभारणार!

बीएसएनएल '४जी' साठी ९३० गावांमध्ये जमीन देण्यास महाराष्ट्र सरकारची मंजुरी मुंबई: ग्रामीण आणि दुर्गम भागांमध्ये

Satara Gazette: जरांगे पाटलांची ती मागणी सुद्धा होणार मान्य, मराठा समाजाला दिलासा!

सातारा गॅझेट लागू करण्यासंदर्भात सरकारी हालचालींना सुरुवात  मुंबई: मराठा समाजाला आणखीन एक दिलासा देणारी बातमी

'आदिवासींच्या जीवनात ३ वर्षांत आमुलाग्र परिवर्तन घडेल'

यवतमाळ : आदिवासी समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी केंद्र शासनाने महत्वाच्या योजना हाती घेतल्या

साई मंदिरातील प्रसाद, दर्शन, सुरक्षा आता एआयच्या नियंत्रणात

स्मार्ट सुरक्षा प्रणालीमुळे अपप्रवृत्तीला बसणार आळा शिर्डी : श्री साईबाबा संस्थानात भाविकांच्या सुरक्षेसह

परतीचा पाऊस येत आहे रे.. सावधान!

महाराष्ट्रातील १७ जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा मुंबई: गणपती विसर्जनानंतर अनेक दिवस दडी मारून बसलेला