उस्मानाबादचे झाले नामकरण, आजपासून धाराशिव रेल्वे स्थानक

मुंबई| उस्मानाबाद रेल्वे स्थानकाचे धाराशिव करण्याच्या  महाराष्ट्र सरकारच्या निर्णयानुसार, भारतीय रेल्वेने या रेल्वे स्थानकाचे नाव धारशिव रेल्वे स्टेशन असे अधिकृतरित्या  बदलले आहे. या स्थानकाचे नामकरण करण्यासाठी मुंबई प्रवासी आरक्षण प्रणाली (पीआरएस) ३१ मे रोजी रात्री ११.४५ वाजल्यापासून मध्यरात्री १.३० पर्यंत बंद ठेवण्यात आले. त्यामुळे सोलापूर विभागातील प्रसिद्ध असलेल्या उस्मानाबाद स्थानकाला आता धारशिव रेल्वे स्थानक असे संबोधले जाणार आहे.


 परिणामी, नवीन स्थानकाचे नाव आणि कोड भारतीय रेल्वे कॉन्फरन्स असोसिएशनद्वारे मंजूर करण्यात आले आहे.



कोड इनिशियल्समध्ये देखील बदल


पूर्वी स्टेशन कोड UMD असलेले उस्मानाबाद म्हणून ओळखले जाणारे स्थानक आता अधिकृतपणे धाराशिव असे नवीन स्थानक कोड DRSV सह बदलण्यात आले आहे. धाराशिव’ हे नवीन नाव मराठी, हिंदी आणि इंग्रजी या तीन भाषांमध्ये दर्शवले जाणार आहे. त्यानुसार, स्थानकाचे नवीन नाव पुढील पद्धतीने वाचले आणि लिहिले जाईल.

देवनागरी लिपीत (मराठी) : धाराशिव

देवनागरी लिपीत (हिंदी) : धाराशिव

रोमन लिपीत (इंग्रजी) : DHARASHIV

नवीन नाव प्रतिबिंबित करण्यासाठी सर्व रेल्वे रेकॉर्ड, चिन्हे, घोषणा आणि प्रवासी माहिती प्रणाली अद्यतनित केल्या जातील. प्रवाशांना आणि सामान्य जनतेला या बदलाची नोंद घेण्याची विनंती आहे.

Comments
Add Comment

DA Hike: राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ

मुंबई: राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वीच मोठी आनंदवार्ता जाहीर करण्यात आली आहे.

राज्यात रस्ता अपघाती मृत्यूंमध्ये ८ टक्क्यांची घट; परिवहन विभागाकडून आकडेवारी जाहीर

- २०३० पर्यंत अपघात निम्म्यावर आणण्याचे परिवहन विभागाचे उद्दिष्ट मुंबई : राज्यात रस्ता सुरक्षेसाठी परिवहन

भिगवण प्रकरणात मोठा ट्विस्ट; पाच दिवसात तरुणीने बदलला निर्णय

पुणे : महाष्ट्राभर चर्चा असलेल्या भिगवण प्रकरणात अनेक दावे , प्रतिदावे समोर येत होते, पण आता स्वतः मुलीनेच

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाकडून ४२ मौलिक ग्रंथांचे प्रकाशन

मुंबई : मराठी भाषा गौरव दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळातर्फे यंदा ४२ मौलिक ग्रंथांचे

मालेगाव महापालिकेत नमाजपठण कशाला? हे तर ‘जिहाद’चेच रूप - नितेश राणे

- राज्यातील सर्व मदरसे बंद करण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी करणार - नितेश राणे मुंबई : निवडणुकीच्या पूर्वी ‘जय

'हवाई वाहतूक ही अत्यंत महत्त्वाची आणि गांभीर्यची बाब'; खासदार सुप्रियाताई सुळेंचे वक्तव्य

नवी दिल्ली: मी विमान वाहतूक मंत्रालय यांचे आभार मानते. रोहित पवार यांनी हा विषय मुद्देसूद मांडला. आमच्या घरातील