उस्मानाबादचे झाले नामकरण, आजपासून धाराशिव रेल्वे स्थानक

मुंबई| उस्मानाबाद रेल्वे स्थानकाचे धाराशिव करण्याच्या  महाराष्ट्र सरकारच्या निर्णयानुसार, भारतीय रेल्वेने या रेल्वे स्थानकाचे नाव धारशिव रेल्वे स्टेशन असे अधिकृतरित्या  बदलले आहे. या स्थानकाचे नामकरण करण्यासाठी मुंबई प्रवासी आरक्षण प्रणाली (पीआरएस) ३१ मे रोजी रात्री ११.४५ वाजल्यापासून मध्यरात्री १.३० पर्यंत बंद ठेवण्यात आले. त्यामुळे सोलापूर विभागातील प्रसिद्ध असलेल्या उस्मानाबाद स्थानकाला आता धारशिव रेल्वे स्थानक असे संबोधले जाणार आहे.


 परिणामी, नवीन स्थानकाचे नाव आणि कोड भारतीय रेल्वे कॉन्फरन्स असोसिएशनद्वारे मंजूर करण्यात आले आहे.



कोड इनिशियल्समध्ये देखील बदल


पूर्वी स्टेशन कोड UMD असलेले उस्मानाबाद म्हणून ओळखले जाणारे स्थानक आता अधिकृतपणे धाराशिव असे नवीन स्थानक कोड DRSV सह बदलण्यात आले आहे. धाराशिव’ हे नवीन नाव मराठी, हिंदी आणि इंग्रजी या तीन भाषांमध्ये दर्शवले जाणार आहे. त्यानुसार, स्थानकाचे नवीन नाव पुढील पद्धतीने वाचले आणि लिहिले जाईल.

देवनागरी लिपीत (मराठी) : धाराशिव

देवनागरी लिपीत (हिंदी) : धाराशिव

रोमन लिपीत (इंग्रजी) : DHARASHIV

नवीन नाव प्रतिबिंबित करण्यासाठी सर्व रेल्वे रेकॉर्ड, चिन्हे, घोषणा आणि प्रवासी माहिती प्रणाली अद्यतनित केल्या जातील. प्रवाशांना आणि सामान्य जनतेला या बदलाची नोंद घेण्याची विनंती आहे.

Comments
Add Comment

Nitesh Rane: आम्ही विरोधकांना दुर्बीण घेऊन शोधत...; नितेश राणेंचा विरोधकांवर हल्लाबोल

सिंधुदुर्ग: राज्यात जिल्हा परिषद आणि पंचायत सिमितीच्या निवडणुका तोंडावर येऊन ठेपल्या आहेत. याच निवडणुकीच्या

मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर आणखी एक अपघात, वाहतुकीची कोंडीच कोंडी

पुणे : मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर खंडाळा घाटातील आडोशी बोगद्याजवळ पुण्याकडून मुंबईच्या दिशेने प्रोपिलीन वायू

आपत्कालीन परिस्थितीतील वाहतूक आराखडा तत्काळ तयार करा - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

मुंबई पुणे द्रुतगती महामार्ग वाहतूक कोंडीची उपमुख्यमंत्र्यांकडून गंभीर दखल मिसिंग लिंकचे कामही लवकरात लवकर

अमरावती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयासाठी १२ हेक्टर जागा मंजूर

देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेवरून महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा निर्णय १०० विद्यार्थी प्रवेश ⁠४३०

पुणे एक्सप्रेस वे अपघात प्रकरणी महाराष्ट्र राज्य परिवहन सेवेच्या १३९ फेऱ्या रद्द

मुंबई : पुणे–मुंबई एक्सप्रेस वेवर झालेल्या टँकर अपघातामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली असून या

एक्सप्रेवेवर प्रचंड मोठी वाहतूक कोंडी अन् २५ किलोमीटर पर्यंत रांगा; नेमकं पुण्यात घडलं काय ?

लोणावळा : मुंबई–पुणे द्रुतगती महामार्गावर मंगळवारी सायंकाळी घडलेल्या एका अपघातामुळे संपूर्ण मार्गावर