उस्मानाबादचे झाले नामकरण, आजपासून धाराशिव रेल्वे स्थानक

  38

मुंबई| उस्मानाबाद रेल्वे स्थानकाचे धाराशिव करण्याच्या  महाराष्ट्र सरकारच्या निर्णयानुसार, भारतीय रेल्वेने या रेल्वे स्थानकाचे नाव धारशिव रेल्वे स्टेशन असे अधिकृतरित्या  बदलले आहे. या स्थानकाचे नामकरण करण्यासाठी मुंबई प्रवासी आरक्षण प्रणाली (पीआरएस) ३१ मे रोजी रात्री ११.४५ वाजल्यापासून मध्यरात्री १.३० पर्यंत बंद ठेवण्यात आले. त्यामुळे सोलापूर विभागातील प्रसिद्ध असलेल्या उस्मानाबाद स्थानकाला आता धारशिव रेल्वे स्थानक असे संबोधले जाणार आहे.


 परिणामी, नवीन स्थानकाचे नाव आणि कोड भारतीय रेल्वे कॉन्फरन्स असोसिएशनद्वारे मंजूर करण्यात आले आहे.



कोड इनिशियल्समध्ये देखील बदल


पूर्वी स्टेशन कोड UMD असलेले उस्मानाबाद म्हणून ओळखले जाणारे स्थानक आता अधिकृतपणे धाराशिव असे नवीन स्थानक कोड DRSV सह बदलण्यात आले आहे. धाराशिव’ हे नवीन नाव मराठी, हिंदी आणि इंग्रजी या तीन भाषांमध्ये दर्शवले जाणार आहे. त्यानुसार, स्थानकाचे नवीन नाव पुढील पद्धतीने वाचले आणि लिहिले जाईल.

देवनागरी लिपीत (मराठी) : धाराशिव

देवनागरी लिपीत (हिंदी) : धाराशिव

रोमन लिपीत (इंग्रजी) : DHARASHIV

नवीन नाव प्रतिबिंबित करण्यासाठी सर्व रेल्वे रेकॉर्ड, चिन्हे, घोषणा आणि प्रवासी माहिती प्रणाली अद्यतनित केल्या जातील. प्रवाशांना आणि सामान्य जनतेला या बदलाची नोंद घेण्याची विनंती आहे.

Comments
Add Comment

वारीसंदर्भात केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर अबू आझमी यांनी मागितली माफी

मुंबई: वारी संदर्भात केलेल्या वादग्रस्त (Abu Azmi Wari Controversy) वक्तव्यानंतर, अबू आझमी यांना आपली चूक लक्षात आली आहे.  "माझ्या

संगमनेर खुर्द येथील जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा

१० जण ताब्यात, तर ५ लाखांचा मुद्देमाल जप्त संगमनेर : संगमनेर शहरालगत असलेल्या संगमनेर खुर्द येथे प्रवरा नदीच्या

रस्त्यावर बेशिस्तपणे, नो-पार्किंग झोनमध्ये लावलेली वाहने जप्त होणार : यशवंत डांगे

अहिल्यानगर : महानगरपालिकेच्या माध्यमातून शहरात पे अँड पार्क सुरू करण्यात आले आहे. त्यासाठी खासगी संस्थेची

जामखेडमध्ये काळ्या काचा कुणाच्या आश्रयाने ?

पीएसआयच्या धडाकेबाज कारवाईने राजकीय मंडळींच्या भुवया उंचवल्या जामखेड : जामखेड शहरात गेल्या काही

वारकऱ्यांसाठी रेनकोट वाटणाऱ्या उद्योजकाला मृत्यूने वळसा घालून दिले जीवनदान !

श्रीगोंदा : मानवतेचे ऋण फेडण्याच्या भावनेतून सदैव समाजासाठी कार्य करणाऱ्या राजापूर (मंगलवाडी) येथील युवा

डॉक्टरकडून सहकारी महिला डॉक्टरला गंडा

विवाहाचे आमिष; साडेसात लाखांची फसवणूक नाशिक : समाजमाध्यमाद्वारे महिलेशी ओळख करून तिला लग्न करण्याचे आमिष