कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभाग सज्ज

  33

५ हजार नागरिकांची तपासणी; ५० खाटा राखीव


विरार : कोरोना व्हायरस भारतात पुन्हा परतला आहे. देशामध्ये कोरोना रुग्णांची संख्या १ हजार २०० पर्यंत पोहोचली असून काही राज्यात मृत्यूचे प्रमाणसुद्धा वाढत आहे. तसेच राज्यात मुंबई, ठाणे व इतर काही परिसरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झालेल्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर वसई-विरार शहर पालिकेच्या वैद्यकीय आरोग्य विभागामार्फत शहरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये व कोरोनाची लागण झालेल्या लोकांना इतरांपासून दूर ठेवता यावे यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत.



कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी महानगरपालिका वैद्यकीय आरोग्य विभागामार्फत पालिकेची रुग्णालये, नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, आपला दवाखाना, आयुष्यमान आरोग्य केंद्र, सार्वजनिक गर्दीची ठिकाणे व वस्त्या इत्यादी ठिकाणी नागरिकांची वैद्यकीय तपासणी मोहीम सुरु करण्यात आली आहे. आतापर्यंत ५५११ नागरिकांची तपासणी करण्यात आली असून ९६ जणांची रॅपीड टेस्ट करण्यात आली आहे. या तपासणीत एक कोरोना बाधित रुग्ण आढळला असून त्याला उपचारानंतर घरी पाठविण्यात आले आहे. कोरोना विषाणूचा फैलाव होऊ नये या दृष्टीने शासकीय तसेच खासगी रुग्णालयांत दाखल होणाऱ्या रुग्णांची माहिती, कोरोनाची लक्षणे असलेले रुग्ण माहिती महानगरपालिका वैद्यकीय आरोग्य विभागामार्फत घेण्यात येत आहे.

महानगरपालिकेमार्फत कोरोनाबाधित रुग्णांसाठी स्वतंत्र खाटांची व विलगीकरणाची व्यवस्था करण्यात आली आहे. जीवदानी रुग्णालय चंदनसार येथे २५ व फादरवाडी रुग्णालय, वसई पूर्व येथे २५ स्वतंत्र खाटांची व्यवस्था करण्यात आली आहे. रुग्णांना ऑक्सिजनचा पुरवठा पुरेशा प्रमाणात व्हावा यासाठी उपाययोजना करण्यात आली आहे. आपत्कालीन वेळेला पालिकेने उभारलेल्या ५ ऑक्सिजन प्रकल्पांमधूनही ऑक्सिजनची तातडीने व्यवस्था करण्यात येणार आहे. आयुक्ता अनिल कुमार पवार ,अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे ,मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. भक्ती चौधरी यांनी यासंदर्भात बैठक घेऊन आवश्यक सूचना केल्या आहेत.
Comments
Add Comment

मुंबई - अहमदाबाद महामार्गावरील खड्डे बुजविण्यासाठी एनएचआयला पत्र

व्हाईट टेपिंगच्या निकृष्ट कामामुळे अपघात तलासरी : मुंबई-अहमदाबादबाद महामार्गांवर अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत,

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प अडचणीत?

सफाळे: पालघर जिल्ह्यातील मांडे ग्रामपंचायत हद्दीत मुंबई-अहमदाबाद अतिजलद (बुलेट ट्रेन) प्रकल्पाचे काम वेगाने

सुविधा, लाभकरांसाठी ‘मुहूर्त’ सापडेना !

नागरिकांमध्ये मात्र संभ्रम कायम विरार : वसई-विरार शहर पालिकेचे उत्पन्न वाढविण्यासाठी पालिका क्षेत्रात

पुढील दोन आठवडे सरासरीपेक्षा जास्त पावसाचा अंदाज

भात रोपांची पेरणी लवकर पूर्ण करून घेण्याचा सल्ला पालघर : पालघर जिल्ह्यात १६ जून रोजी नैऋत्य मोसमी पावसाने जोरदार

चला... विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनाला!

पालघर: आषाढी एकादशीनिमित्त विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी पंढरपूरला जाण्याकरिता एसटी प्रशासनाकडून राज्यात

आदिवासी विद्यार्थ्यांना २४ कोटींची शिष्यवृत्ती

४२ हजार विद्यार्थ्यांना मिळाला लाभ पालघर: पालघर जिल्ह्यातील इयत्ता १ ली ते १० वी पर्यंतच्या ४२ हजार ४३६ आदिवासी