कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभाग सज्ज

  42

५ हजार नागरिकांची तपासणी; ५० खाटा राखीव


विरार : कोरोना व्हायरस भारतात पुन्हा परतला आहे. देशामध्ये कोरोना रुग्णांची संख्या १ हजार २०० पर्यंत पोहोचली असून काही राज्यात मृत्यूचे प्रमाणसुद्धा वाढत आहे. तसेच राज्यात मुंबई, ठाणे व इतर काही परिसरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झालेल्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर वसई-विरार शहर पालिकेच्या वैद्यकीय आरोग्य विभागामार्फत शहरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये व कोरोनाची लागण झालेल्या लोकांना इतरांपासून दूर ठेवता यावे यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत.



कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी महानगरपालिका वैद्यकीय आरोग्य विभागामार्फत पालिकेची रुग्णालये, नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, आपला दवाखाना, आयुष्यमान आरोग्य केंद्र, सार्वजनिक गर्दीची ठिकाणे व वस्त्या इत्यादी ठिकाणी नागरिकांची वैद्यकीय तपासणी मोहीम सुरु करण्यात आली आहे. आतापर्यंत ५५११ नागरिकांची तपासणी करण्यात आली असून ९६ जणांची रॅपीड टेस्ट करण्यात आली आहे. या तपासणीत एक कोरोना बाधित रुग्ण आढळला असून त्याला उपचारानंतर घरी पाठविण्यात आले आहे. कोरोना विषाणूचा फैलाव होऊ नये या दृष्टीने शासकीय तसेच खासगी रुग्णालयांत दाखल होणाऱ्या रुग्णांची माहिती, कोरोनाची लक्षणे असलेले रुग्ण माहिती महानगरपालिका वैद्यकीय आरोग्य विभागामार्फत घेण्यात येत आहे.

महानगरपालिकेमार्फत कोरोनाबाधित रुग्णांसाठी स्वतंत्र खाटांची व विलगीकरणाची व्यवस्था करण्यात आली आहे. जीवदानी रुग्णालय चंदनसार येथे २५ व फादरवाडी रुग्णालय, वसई पूर्व येथे २५ स्वतंत्र खाटांची व्यवस्था करण्यात आली आहे. रुग्णांना ऑक्सिजनचा पुरवठा पुरेशा प्रमाणात व्हावा यासाठी उपाययोजना करण्यात आली आहे. आपत्कालीन वेळेला पालिकेने उभारलेल्या ५ ऑक्सिजन प्रकल्पांमधूनही ऑक्सिजनची तातडीने व्यवस्था करण्यात येणार आहे. आयुक्ता अनिल कुमार पवार ,अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे ,मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. भक्ती चौधरी यांनी यासंदर्भात बैठक घेऊन आवश्यक सूचना केल्या आहेत.
Comments
Add Comment

जिल्ह्याची कृषिप्रधान ओळख मिटण्याची चिन्हे

वसंत भोईर वाडा : शासनाच्या शेतीकडे पाहण्याच्या उदासीन धोरणामुळे जिल्ह्यातील पारंपरिक शेतीव्यवसाय अडचणीत आला

अवैध बांधकामांना माजी आयुक्तच जबाबदार

‘ईडी’ कार्यालयाकडून भांडाफोड विरार : वसई-विरार पालिका क्षेत्रात करण्यात आलेल्या घोटाळ्यामध्ये अनिलकुमार पवार

वसईत 'भूतांचा' अनोखा आंदोलन: स्मशानभूमी वाचवण्यासाठी प्रयत्न!

मुंबई : मुंबईपासून अवघ्या ३० किलोमीटर अंतरावर असलेल्या वसईत, स्थानिकांनी एका अनोख्या आणि सर्जनशील पद्धतीने

घोडबंदर ते तलासरी महामार्ग धोकादायक स्थितीत

तातडीने लक्ष द्यावे अशी खासदारांची मागणी वाडा : पालघर लोकसभा मतदारसंघातून जाणारा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८

प्रियकरासोबत रंगेहाथ सापडल्याने पतीची हत्या करणाऱ्या पत्नीला अटक

घरातच गाडले, भावानेच घरातील फरशा बदलल्या नालासोपारा : नालासोपारा येथे प्रियकरासोबत रंगेहाथ पकडले गेल्यानंतर

रोज ५० लाख लिटर पाणी, तरी टँकरवर मदार

महापालिका करणार पाण्याचा हिशोब विरार : टँकरमाफीयांना फायदा व्हावा म्हणून महापालिकेकडून होत असलेला पाणीपुरवठा