कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभाग सज्ज

  50

५ हजार नागरिकांची तपासणी; ५० खाटा राखीव


विरार : कोरोना व्हायरस भारतात पुन्हा परतला आहे. देशामध्ये कोरोना रुग्णांची संख्या १ हजार २०० पर्यंत पोहोचली असून काही राज्यात मृत्यूचे प्रमाणसुद्धा वाढत आहे. तसेच राज्यात मुंबई, ठाणे व इतर काही परिसरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झालेल्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर वसई-विरार शहर पालिकेच्या वैद्यकीय आरोग्य विभागामार्फत शहरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये व कोरोनाची लागण झालेल्या लोकांना इतरांपासून दूर ठेवता यावे यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत.



कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी महानगरपालिका वैद्यकीय आरोग्य विभागामार्फत पालिकेची रुग्णालये, नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, आपला दवाखाना, आयुष्यमान आरोग्य केंद्र, सार्वजनिक गर्दीची ठिकाणे व वस्त्या इत्यादी ठिकाणी नागरिकांची वैद्यकीय तपासणी मोहीम सुरु करण्यात आली आहे. आतापर्यंत ५५११ नागरिकांची तपासणी करण्यात आली असून ९६ जणांची रॅपीड टेस्ट करण्यात आली आहे. या तपासणीत एक कोरोना बाधित रुग्ण आढळला असून त्याला उपचारानंतर घरी पाठविण्यात आले आहे. कोरोना विषाणूचा फैलाव होऊ नये या दृष्टीने शासकीय तसेच खासगी रुग्णालयांत दाखल होणाऱ्या रुग्णांची माहिती, कोरोनाची लक्षणे असलेले रुग्ण माहिती महानगरपालिका वैद्यकीय आरोग्य विभागामार्फत घेण्यात येत आहे.

महानगरपालिकेमार्फत कोरोनाबाधित रुग्णांसाठी स्वतंत्र खाटांची व विलगीकरणाची व्यवस्था करण्यात आली आहे. जीवदानी रुग्णालय चंदनसार येथे २५ व फादरवाडी रुग्णालय, वसई पूर्व येथे २५ स्वतंत्र खाटांची व्यवस्था करण्यात आली आहे. रुग्णांना ऑक्सिजनचा पुरवठा पुरेशा प्रमाणात व्हावा यासाठी उपाययोजना करण्यात आली आहे. आपत्कालीन वेळेला पालिकेने उभारलेल्या ५ ऑक्सिजन प्रकल्पांमधूनही ऑक्सिजनची तातडीने व्यवस्था करण्यात येणार आहे. आयुक्ता अनिल कुमार पवार ,अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे ,मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. भक्ती चौधरी यांनी यासंदर्भात बैठक घेऊन आवश्यक सूचना केल्या आहेत.
Comments
Add Comment

वसईत विद्यार्थ्याच्या अंगावर खांब कोसळला; सुदैवाने जीव वाचला, घटना सीसीटीव्हीत कैद

वसई शहरातील निष्काळजीपणाचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. वसईमध्ये एका शाळकरी विद्यार्थ्याच्या अंगावर जुना

माजी आयुक्तांसह चौघांना १४ दिवसाची न्यायालयीन कोठडी

विरार : वसई-विरार महापालिका क्षेत्रातील बेकायदेशीर बांधकाम प्रकरणात ६ दिवसाच्या 'ईडी' कोठडीत असलेले पालिकेचे

विरार, वसई, नालासोपारामधील अनेक भाग पाण्याखाली, पाऊस अजूनही कायम, रेड अलर्ट जारी

मुसळधार पावसाने वसई, विरार, नालासोपारा परिसराला झोडपून काढलं आहे. गेल्या तीन दिवसापासून मुसळधार पाऊस या भागात

मुंबईत मुसळधार पाऊस, मुंबईसह कोकणात रेड अलर्ट, पुढील 3 – 4 तास महत्वाचे, सखल भागात पाणी साचलं, रेल्वे वाहतुकीवर परिणाम

राज्यात मुसळधार पावसाने अनेक जिल्ह्यांना तडका दिला असून पुढील ३ ते ४ तासांत मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, रायगड,

लिपी आधी मरते, मग भाषा: दीपक पवार

वसई : "भाषा नंतर मरते, पण लिपी आधी मरते. तिच्या नियमित वापराची आणि संवर्धनाची जबाबदारी प्रत्येकाची आहे. माणसं, झाडं

वसई-विरारची जिल्हा कार्यकारिणी जाहीर

भाजपच्या ५ मंडळ अध्यक्षांना पदोन्नती विरार : भारतीय जनता पक्षाचा संघटनात्मक जिल्हा असलेल्या वसई-विरारची जिल्हा