कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभाग सज्ज

५ हजार नागरिकांची तपासणी; ५० खाटा राखीव


विरार : कोरोना व्हायरस भारतात पुन्हा परतला आहे. देशामध्ये कोरोना रुग्णांची संख्या १ हजार २०० पर्यंत पोहोचली असून काही राज्यात मृत्यूचे प्रमाणसुद्धा वाढत आहे. तसेच राज्यात मुंबई, ठाणे व इतर काही परिसरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झालेल्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर वसई-विरार शहर पालिकेच्या वैद्यकीय आरोग्य विभागामार्फत शहरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये व कोरोनाची लागण झालेल्या लोकांना इतरांपासून दूर ठेवता यावे यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत.



कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी महानगरपालिका वैद्यकीय आरोग्य विभागामार्फत पालिकेची रुग्णालये, नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, आपला दवाखाना, आयुष्यमान आरोग्य केंद्र, सार्वजनिक गर्दीची ठिकाणे व वस्त्या इत्यादी ठिकाणी नागरिकांची वैद्यकीय तपासणी मोहीम सुरु करण्यात आली आहे. आतापर्यंत ५५११ नागरिकांची तपासणी करण्यात आली असून ९६ जणांची रॅपीड टेस्ट करण्यात आली आहे. या तपासणीत एक कोरोना बाधित रुग्ण आढळला असून त्याला उपचारानंतर घरी पाठविण्यात आले आहे. कोरोना विषाणूचा फैलाव होऊ नये या दृष्टीने शासकीय तसेच खासगी रुग्णालयांत दाखल होणाऱ्या रुग्णांची माहिती, कोरोनाची लक्षणे असलेले रुग्ण माहिती महानगरपालिका वैद्यकीय आरोग्य विभागामार्फत घेण्यात येत आहे.

महानगरपालिकेमार्फत कोरोनाबाधित रुग्णांसाठी स्वतंत्र खाटांची व विलगीकरणाची व्यवस्था करण्यात आली आहे. जीवदानी रुग्णालय चंदनसार येथे २५ व फादरवाडी रुग्णालय, वसई पूर्व येथे २५ स्वतंत्र खाटांची व्यवस्था करण्यात आली आहे. रुग्णांना ऑक्सिजनचा पुरवठा पुरेशा प्रमाणात व्हावा यासाठी उपाययोजना करण्यात आली आहे. आपत्कालीन वेळेला पालिकेने उभारलेल्या ५ ऑक्सिजन प्रकल्पांमधूनही ऑक्सिजनची तातडीने व्यवस्था करण्यात येणार आहे. आयुक्ता अनिल कुमार पवार ,अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे ,मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. भक्ती चौधरी यांनी यासंदर्भात बैठक घेऊन आवश्यक सूचना केल्या आहेत.
Comments
Add Comment

माजी आयुक्तांच्या अटकेचे पुरावे दाखवा

कारागृहातील मुक्काम वाढला बांधकाम प्रकरणात न्यायालयीन कोठडीत असलेले पालिकेचे माजी आयुक्त अनिलकुमार पवार,

'चिकन लॉलीपॉप'ने घेतला सात वर्षांच्या मुलाचा जीव, पालघरमध्ये खळबळ

पालघर: मुंबईला लागून असलेल्या महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यात एक खळबळजनक घटना समोर आली आहे. येथे चिकन लॉलीपॉप

रस्त्यांवरील खड्ड्यांसाठी एकमेकांकडे बोट

पालिका, बांधकाम विभागाने जबाबदारी झटकली विरार : रस्त्यावरच्या खड्ड्यांमुळे नुकतेच विरारमध्ये एका व्यक्तीचा

वसईत गरबा खेळताना हृदयविकाराने महिलेचा मृत्यू

नवरात्रोत्सवातील जल्लोषात हृदयद्रावक घटना वसई : वसईत नवरात्रोत्सवाच्या उत्साहात एक हृदय हेलावून टाकणारी घटना

खाजगीकरणा विरोधात वीज कर्मचाऱ्यांची निदर्शने; ९ ऑक्टोबरला संपाचा इशारा

पालघर : वीज कंपन्यांमधील खाजगीकरण आणि इतर प्रलंबित मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य विद्युत कर्मचारी, अभियंते आणि

Vasai Factory Fire: वसईत कारखान्याला भीषण आग

वसई: वसईत तुंगारेश्वर फाटा येथील पुठ्ठा कारखान्यात भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीत कारखान्यातील अनेक