औद्योगिक क्षेत्रातील समस्यांवर आमदारांनी वेधले लक्ष

विजेच्या अडचणींसह जमिनीचा लीज प्रश्न सोडवा


वसई  : वसई-विरार औद्योगिक क्षेत्रातील छोटे मोठे उद्योजक विविध समस्यांचा सामना करीत आहेत. या संदर्भात अनेकदा बैठका घेऊन झाल्या आहेत. मात्र योग्य उपाययोजना झाल्या नाहीत. त्यामुळे आमदार स्नेहा दुबे-पंडित यांनी वसई-विरार महानगरपालिका क्षेत्रातील सुमारे २५ हजार लघू व मध्यम उद्योगांसमोरील अडचणी विधान भवनातील सभागृहात मांडल्या.


उद्योगांना दिलेल्या जागेची लीजची मुदत संपली असून आताच्या बाजार भावाप्रमाणे लीजची रक्कम परवडणारी नसल्याने सध्याच्याच दरात लीज वाढवण्याचे धोरण राबवावे, अशी प्रमुख मागणी त्यांनी केली. तसेच औद्योगिक क्षेत्रात पक्के रस्ते, सांडपाणी - कचरा व्यवस्थापन आणि अखंडित वीज पुरवठा यांसाठी स्वतंत्र डीपीआर तयार करून विशेष निधी देण्याची मागणीही त्यांनी केली.


त्याचप्रमाणे राज्य सरकारने सन २०२४-२५ मध्ये १ लाख ६४ हजार कोटींची परकीय गुंतवणूक आणि ९१ हजार कोटींची थेट परकीय गुंतवणूक आकर्षित केल्याबद्दल तसेच ३० लाख कोटी रुपयांचे सामंजस्य करार केल्याबद्दल आमदार दुबे पंडित यांनी शासनाचे अभिनंदन केले. उद्योग, गुंतवणूक आणि रोजगारनिर्मितीच्या दिशेने राज्याची वाटचाल सकारात्मक असल्याचे त्यांनी नमूद केले.


त्यानंतर त्यांनी वसई औद्योगिक क्षेत्रातील विविध समस्यांवर शासनाचे लक्ष वेधले. पोमण, मालजीपाडा व नायगाव परिसरातील स्टुडिओ क्षेत्राला सक्षम पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी विशेष निधी द्यावा, अशी विनंती त्यांनी शासनाकडे केली. तसेच महाराष्ट्र उद्योग, गुंतवणूक व सेवा धोरण २०२५ अंतर्गत वसईत एमआयडीसी स्थापन करावी महिला व मुलींसाठी स्वतंत्र आयटीआय सुरू करावी, अशी मागणी त्यांनी पुन्हा एकदा अधोरेखित केली.


त्याचप्रमाणे पालघर जिल्ह्यात ५० हजारांहून अधिक वनपट्टे वितरित झाले असून बांबू उद्योग धोरण २०२५ अंतर्गत वनपट्टाधारकांना रोजगार हमी किंवा सीएसआर निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी त्यांनी केली. दरम्यान शबरी आदिवासी घर कुल योजना पालघर, नाशिक व ठाणे जिल्ह्यांनाही लागू करावी, अशीही मागणी आमदार स्नेहा दुबे-पंडित यांनी केली.

Comments
Add Comment

Jayant Patil : जयंत पाटील यांनी घेतली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट

आमदार जितेंद्र आव्हाडही सोबत; 'नंदनवन'वर एक तास खलबते मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे

Ro-ko Unstoppable : रोहित आणि विराटने रचला इतिहास; गांगुली-द्रविडला मागं टाकतं ही कामगिरी करणारी ठरली तिसरी जोडी

Mumbai : भारत आणि इंग्लंड यांच्यात दुसरा एकदिवसीय सामना कार्डिफ येथे सुरु आहे. इंग्लंडनं टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी

India's energy storage : भारताची ऊर्जा साठवणूक क्षमता २०३५-३६ पर्यंत दहा पटींनी वाढणार

नवी दिल्ली : भारताच्या विकासाच्या प्रवासात ऊर्जा क्षेत्राचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. देशाची वाढती वीज गरज आणि

Indian Fishermen : शिक्षा पूर्ण होऊनही १७८ भारतीय मच्छीमार पाकिस्तानच्या तुरुंगात

कॉन्स्युलर कराराचे उल्लंघन; डहाणू-तलासरीतील १८ कुटुंबांचा न्यायासाठी आक्रोश डहाणू : भारत-पाकिस्तानदरम्यान

CUTS International : बाईक टॅक्सींसाठी देशव्यापी सुसंगत धोरणाची गरज, 'कट्स इंटरनॅशनल'चा अहवाल

नवी दिल्ली : देशातील बाईक टॅक्सी सेवांसाठी सध्या असलेल्या विसंगत राज्यनिहाय नियमांऐवजी, एक सुसंगत आणि

Jagannath Rath Yatra Stampede : जगन्नाथ रथयात्रेदरम्यान प्रचंड गर्दीमुळे चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती; एकाचा मृत्यू, अनेक जखमी

भुवनेशवर : ओडिसातील पुरी येथे गुरुवारी जगप्रसिद्ध जगन्नाथ रथयात्रेदरम्यान चेंगराचेंगरीसदृश परिस्थिती