औद्योगिक क्षेत्रातील समस्यांवर आमदारांनी वेधले लक्ष

विजेच्या अडचणींसह जमिनीचा लीज प्रश्न सोडवा


वसई  : वसई-विरार औद्योगिक क्षेत्रातील छोटे मोठे उद्योजक विविध समस्यांचा सामना करीत आहेत. या संदर्भात अनेकदा बैठका घेऊन झाल्या आहेत. मात्र योग्य उपाययोजना झाल्या नाहीत. त्यामुळे आमदार स्नेहा दुबे-पंडित यांनी वसई-विरार महानगरपालिका क्षेत्रातील सुमारे २५ हजार लघू व मध्यम उद्योगांसमोरील अडचणी विधान भवनातील सभागृहात मांडल्या.


उद्योगांना दिलेल्या जागेची लीजची मुदत संपली असून आताच्या बाजार भावाप्रमाणे लीजची रक्कम परवडणारी नसल्याने सध्याच्याच दरात लीज वाढवण्याचे धोरण राबवावे, अशी प्रमुख मागणी त्यांनी केली. तसेच औद्योगिक क्षेत्रात पक्के रस्ते, सांडपाणी - कचरा व्यवस्थापन आणि अखंडित वीज पुरवठा यांसाठी स्वतंत्र डीपीआर तयार करून विशेष निधी देण्याची मागणीही त्यांनी केली.


त्याचप्रमाणे राज्य सरकारने सन २०२४-२५ मध्ये १ लाख ६४ हजार कोटींची परकीय गुंतवणूक आणि ९१ हजार कोटींची थेट परकीय गुंतवणूक आकर्षित केल्याबद्दल तसेच ३० लाख कोटी रुपयांचे सामंजस्य करार केल्याबद्दल आमदार दुबे पंडित यांनी शासनाचे अभिनंदन केले. उद्योग, गुंतवणूक आणि रोजगारनिर्मितीच्या दिशेने राज्याची वाटचाल सकारात्मक असल्याचे त्यांनी नमूद केले.


त्यानंतर त्यांनी वसई औद्योगिक क्षेत्रातील विविध समस्यांवर शासनाचे लक्ष वेधले. पोमण, मालजीपाडा व नायगाव परिसरातील स्टुडिओ क्षेत्राला सक्षम पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी विशेष निधी द्यावा, अशी विनंती त्यांनी शासनाकडे केली. तसेच महाराष्ट्र उद्योग, गुंतवणूक व सेवा धोरण २०२५ अंतर्गत वसईत एमआयडीसी स्थापन करावी महिला व मुलींसाठी स्वतंत्र आयटीआय सुरू करावी, अशी मागणी त्यांनी पुन्हा एकदा अधोरेखित केली.


त्याचप्रमाणे पालघर जिल्ह्यात ५० हजारांहून अधिक वनपट्टे वितरित झाले असून बांबू उद्योग धोरण २०२५ अंतर्गत वनपट्टाधारकांना रोजगार हमी किंवा सीएसआर निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी त्यांनी केली. दरम्यान शबरी आदिवासी घर कुल योजना पालघर, नाशिक व ठाणे जिल्ह्यांनाही लागू करावी, अशीही मागणी आमदार स्नेहा दुबे-पंडित यांनी केली.

Comments
Add Comment

Gold-Silver Rate : आनंदवार्ता! चांदी १४ हजारांनी कोसळली तर सोन्याचा भाव १.६० लाखांच्या खाली

मुंबई : आंतरराष्ट्रीय घडामोडींमुळे मौल्यवान धातूंच्या बाजारात मोठी उलथापालथ पाहायला मिळत आहे. अमेरिका आणि इराण

Crime News : शिट्टी वाजवली, उसाच्या शेतातून 10 ते 12 जण बाहेर आले, अन.... स्वस्तात सोने मिळण्याचे आमिष महागात पडले

अहिल्यानगर : स्वस्तात सोने मिळणार असल्याचं आमिष दाखवत रायगडच्या जिल्हा परिषद सदस्यालाच सापळ्यात ओढून तब्बल 52

India Slam Pakistan at UN : 'खोट्या गोष्टी पसरवण्याची पाकिस्तानला सवय', संयुक्त राष्ट्रात काश्मीर प्रश्नावर भारताची स्पष्ट भूमिका

नवी दिल्ली : भारताने पाकिस्तानला संयुक्त राष्ट्रांमध्ये (UN) त्याची खरी जागा पुन्हा एकदा दाखवून दिली आहे. जम्मू आणि

Cockroach Janta Party : नावात 'कॉकरोच' पण दिल्लीच्या उन्हात निघाली हवा! 'VIP' नेते सौरव दास यांचा सरंजामशाही चेहरा उघडा

नवी दिल्ली : देशाच्या राजधानीत एकीकडे 'नीट २०२६' (NEET 2026) परीक्षेतील गैरव्यवहाराविरोधात विद्यार्थ्यांचा आक्रोश

Asia Cup U-18 Hockey Ind vs Pak : भारताने पाकिस्तानला नमवत गाठली अंतिम फेरी; आशिष तानी पूर्तिचा चौकार, 5-3 ने दणदणीत विजय

Mumbai : पुरुष अंडर-18 हॉकी आशिया कप स्पर्धेच्या उपांत्य फेरीत भारताने कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानवर 5-3 ने पराभव केला.

Mumbai News : मुंबईत १५ वर्षांपासून बेकायदेशीर वास्तव्य? सात बांगलादेशी नागरिक अटकेत, पोलिसांचा तपास सुरू

मुंबई : मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) अवैध स्थलांतराविरोधात मोठी कारवाई करत सात बांगलादेशी (Bangladeshi) नागरिकांना अटक केली