कल्याण-डोंबिवलीत वर्षभरात चौदा हजार नागरिकांना श्वानदंश

कल्याण  : कल्याण-डोंबिवली पालिका हद्दीत दिवसेंदिवस भटक्या श्वानांचे प्रमाण वाढत आहे. या भटक्या श्वानांनी सन २०२४-२०२५ या वर्षभराच्या कालावधीत पालिका हद्दीतील १४ हजार २४८ नागरिकांना दंश केला आहे. मागील दोन वर्षाच्या कालावधीत कल्याण, डोंबिवली परिसरातील सुमारे ३६ हजारांहून अधिक नागरिकांना भटक्या श्वानांनी दंश केला आहे. पालिकेच्या वैद्यकीय आरोग्य विभागातून ही माहिती उपलब्ध झाली आहे.


कल्याण-डोंबिवली पालिका हद्दीत सुमारे ८० हजारांहून अधिक भटके श्वान आहेत. या भटक्या श्वानांच्या पिसाळल्याच्या, दंश करत असल्याच्या वाढत्या तक्रारी पालिकेच्या वैद्यकीय आरोग्य विभागाकडे आल्या की त्या श्वानांना पालिकेच्या निर्बिजीकरण केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून पकडून त्यांच्यावर निर्बिजीकरण, लसीकरणच्या प्रक्रिया वेळोवेळी पार पाडण्यात येतात. रात्रीच्या वेळेत कामावरून घरी परतणाऱ्या नागरिकांना ते पायी असताना, रिक्षा, दुचाकीवर असताना भटके श्वान त्यांच्या पाठीमागे लागून त्यांना दंश करण्याचे प्रकार अलीकडे वाढले आहेत. त्यामुळे कल्याण डोंबिवली शहरांच्या काही भागातून रात्रीच्या वेळेत प्रवास करणे भटक्या श्वानांमुळे जोखमीचे झाले आहे, अशा नागरिकांच्या तक्रारी आहेत.



श्वान दंश झाल्यानंतर नागरिकांना पालिकेच्या शास्त्रीनगर, रुक्मिणीबाई रुग्णालयांमध्ये, आरोग्य केंद्रांमध्ये श्वान दंश प्रतिबंधित लस उपलब्ध करून देण्यात येते. सन २०२२-२०२३ मध्ये कल्याण, डोंबिवली, टिटवाळा, २७ गाव परिसरातील १६ हजार ४१४ नागरिकांना श्वान दंश झाला. यामध्ये लहान बालकांचाही सहभाग आहे. २०२३-२०२४ मध्ये २० हजार ३९० नागरिकांना श्वान दंश झाला, अशी माहिती पालिकेच्या आरोग्य विभागातील आरोग्य निरीक्षक कमलेश सोनवणे यांनी दिली. २०२४-२५ मध्ये १५ हजार ४४५ श्वानांवर निर्बिजीकरणाच्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या. यावर्षी ३९६ श्वानांना रेबिज झाले होते, असे आरोग्य निरीक्षक सोनवणे यांनी सांगितले. खासगी दवाखान्यांमध्ये श्वान दंश उपचार घेतले तर एका इंजेक्शनसाठी सुमारे सातशे ते आठशे रूपये मोजावे लागतात. श्वान दंश झाल्यावर पालिकेत मोफत उपचार केले जातात. त्यामुळे बहुतांशी नागरिकांचा ओढा पालिकेत असतो, असे रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.


भटक्या श्वानांवर निर्बिजीकरणाची प्रक्रिया करण्यासाठी कल्याणमध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीजवळ एक केंद्र आहे. येथे उपचाराच्या सर्व सुविधा आहेत. असेच एक केंद्र डोंबिवली एमआयडीसी भागात सुरू करण्यात येणार आहे. नागरिकांना श्वान दंश झाल्यावर त्यांच्यावर जखमेप्रमाणे पालिका रुग्णालय, दवाखान्यांमध्ये तातडीने उपचार केले जातात.

Comments
Add Comment

Kalyan Railway Station Viral Video : उकाड्याचा कहर! प्रवाशाने थेट पाणपोईखालीच केली आंघोळ; VIDEO झाला व्हायरल

कल्याण : कल्याण रेल्वे स्टेशन (Kalyan Junction railway station) येथे घडलेला एक अनोखा प्रकार सध्या सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आला आहे.

Eknath Shinde : गावदेवी मार्केट आग, मृतांच्या वारसांना आणि जखमींना मदत जाहीर

ठाणे : शहरातील गावदेवी मार्केटला आज पहाटे लागलेल्या भीषण आगीत मृत्युमुखी पडलेला एक अग्निशमन दलाचा जवान आणि एका

Davkhare : गावदेवी भाजी मंडई आग दुर्घटनेप्रकरणी दुर्घटनाग्रस्तांना नुकसानभरपाई द्या, आमदार डावखरेंची मागणी

Thane : ठाण्यातील रेल्वे स्थानकाजवळ असलेल्या गजबजलेल्या गावदेवी भाजी मंडईमध्ये आज पहाटेच्या सुमारास भीषण आग लागून

Thane Fire : ठाण्यात गावदेवी मार्केटला भीषण आग; दोन जणांचा मृत्यू, अग्निशमन दलाचे जवान जखमी

ठाणे : ठाणे पश्चिममधील नौपाडा परिसरातील गोखले रोडवरील गावदेवी भाजी मार्केटच्या इमारतीला गुरुवारी पहाटे भीषण आग

Kalyan-Dombivli Municipal Corporation (KDMC) : अनधिकृत होर्डिंग्जमुळे KDMC ला मोठं नुकसान; भाजपचे नगरसेवक दीपेश म्हात्रेंचा गंभीर आरोप

कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेत (KDMC) अनधिकृत होर्डिंग्जच्या माध्यमातून सुरू असलेल्या कथित गैरव्यवहारामुळे

Badlapur Crime : बदलापूरमधील पीडित चिमुकलींच्या शिक्षणाची जबाबदारी अखेर सरकारने उचलली!

घोषणेनंतर तब्बल दोन वर्षांनी दहावीपर्यंतचे शुल्क मंजूर; 'आरटीई'अंतर्गत शाळांना थेट निधी देणार मुंबई : संपूर्ण