वसई-विरारचा अर्थसंकल्प ‘वेटिंग’वर!

स्थायी समिती सभापतींची निवड लांबल्याने मार्चचा मुहूर्त


विरार : महापौर, उपमहापौर निवडणूक उशिरा होऊनही मुंबई महापालिकेचे स्थायी समिती सभापती तसेच विषय समित्यांचे सभापती निवडले गेले आहेत. विशेष म्हणजे मुंबईत स्वीकृत सदस्यांची निवडसुद्धा झाली असून, अर्थसंकल्पही सादर झालेला आहे. वसई-विरारमध्ये मात्र ही सर्व प्रक्रिया संथगतीने सुरू असून, स्थायी समिती सभापती नसल्याने यावर्षी अर्थसंकल्प सादर करण्यासाठी मार्च महिन्याचा मुहूर्त निघणार आहे.


वसई-विरार महापालिकेत स्थायी समितीच्या १६ सदस्यांची निवड २० फेब्रुवारी रोजी महासभेत करण्यात आली आहे. आता याच सदस्यांमधून स्थायी समिती सभापती निवडले जाणार आहेत. यासाठी ५ मार्च रोजी सभापती निवडणुकीचा कार्यक्रम जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली लावण्यात आला आहे. पालिकेत बहुजन विकास आघाडीकडे स्थायी समितीत १० सदस्य असून, भाजपकडे ६ सदस्य आहेत. त्यामुळे सभापती पदावर बहुजन विकास आघाडीच्याच सदस्यांची वर्णी लागणार आहे. दरम्यान, महापालिकेचा वार्षिक अर्थसंकल्प आयुक्तांकडून स्थायी समिती सभापती यांना सादर केला जातो. मात्र वसई-विरार महापालिकेत स्थायी समितीचे सभापती अद्याप निवडले गेले नाहीत.त्यामुळे अर्थसंकल्प सादर करण्यात आलेला नाही. ५ मार्च रोजी नवे सभापती निवडले जाणार असल्याने ६ मार्च रोजी अर्थसंकल्प सादर होणार असल्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे यावर्षीचा अर्थसंकल्प गेल्या वर्षीच्या तुलनेत ७००/८०० कोटी रुपयांनी कमी असण्याची शक्यता आहे.


गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात प्रशासकीय काळात सादर करण्यात आलेला अर्थसंकल्प ३ हजार ९२६ कोटी रुपयांचा होता. मालमत्ता कर, पाणीपट्टी यामध्ये वाढ करण्यासह पाणीपुरवठा लाभ कर आणि मल सुविधा लाभ कर तसेच सिसी प्रमाणपत्र घेतलेल्या आणि ओसी प्रमाणपत्र न घेतलेल्या विकासकांकडून दंड म्हणून वसूल करणे अशा प्रकारे पालिकेचे उत्पन्न वाढविण्याची योजना प्रशासनाने आखली होती. मात्र उपरोक्त बाबींपैकी एकही निर्णय महापालिका प्रशासन घेऊ शकले नाही. त्यामुळे अर्थसंकल्प सादर केल्यानंतर अवघ्या चार महिन्यातच सर्व विभागाचा खर्च ३० टक्क्याने कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला. आजही उत्पन्न वाढीच्या दृष्टीने परिस्थिती "जैसे थे" अशीच असल्याने यावर्षीचा अर्थसंकल्प गेल्या वर्षीच्या तुलनेत ७००/८०० कोटी रुपयांनी कमी असण्याची शक्यता आहे. स्थायी समिती सभापती निवडीनंतर म्हणजेच मार्च महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात अर्थसंकल्प सादर होण्याची शक्यता आहे.



स्वीकृत सदस्य पदासाठी प्रतीक्षा :


महापौर, उपमहापौर, सभागृह नेते, विरोधी पक्षनेता या सर्वांच्या निवडीनंतर सर्वच महापालिकेत स्वीकृत सदस्य पदाची उत्सुकता असते. मुंबईसह काही महापालिकांमध्ये स्वीकृत सदस्य निवडल्या गेले आहेत. वसई-विरारमध्ये मात्र याबाबत सुद्धा प्रशासकीय स्तरावरून काहीही हालचाल झालेली नाही. सदस्य संख्याबळानुसार बहुजन विकास आघाडीचे सहा आणि भाजपचे चार सदस्य निवडले जाणार आहेत. यासाठी दोन्ही राजकीय पक्षांमध्ये चांगलीच स्पर्धा आहे. दरम्यान, परिवहन समिती, वृक्ष प्राधिकरण समिती, वैद्यकीय आरोग्य सहाय्य समिती या समित्यांचे गठन सुद्धा अद्याप झालेले नसून त्यांचे सभापती देखील निवडले गेलेले नाहीत. त्याचप्रमाणे नऊ झोन सभापतीची निवडदेखील करावी लागणार आहे. या प्रक्रियेकडे सुद्धा दोन्ही राजकीय पक्षांच्या नगरसेवकांचे लक्ष लागलेले आहे आणि प्रशासकीय स्तरावर मात्र याबाबत काहीही हालचाली नाहीत.

Comments
Add Comment

Morning Routine : सकाळी उठल्यावर कधीही करू नका या ८ सवयी; आरोग्यावर होऊ शकतो परिणाम

सकाळच्या छोट्या सवयी तुमच्या आरोग्यावर मोठा परिणाम करू शकतात. चला जाणून घेऊ दिवसाची सुरुवात कशी करावी.  ( Morning

‘ Samarth Marathi Movie : समर्थ’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

समर्थ रामदास स्वामींच्या प्रेरणादायी विचारांना आजच्या काळाशी जोडणाऱ्या ‘समर्थ’ या आगामी मराठी चित्रपटाचा

Ramayana Movie : 'रामायण'च्या ट्रेलरला सेन्सॉर बोर्डाची मंजुरी

मुंबई : रणबीर कपूरची मुख्य भूमिका असलेल्या आणि अत्यंत बहुप्रतिक्षित अशा 'रामायण: पार्ट १' ( Ramayana Movie) या पौराणिक

Solar Eclipse : ऑगस्टमध्ये खग्रास सूर्यग्रहण; भारतातून दिसणार की नाही ? युरोपमधून दिसेल दुर्मिळ खगोलीय दृश्य !

नवी दिल्ली : तब्बल दोन वर्षांनंतर पुन्हा एकदा खग्रास सूर्यग्रहणाचे साक्षीदार होण्याची संधी जगाला मिळणार आहे.

Ahilyanagar : श्रीरामपूरमध्ये स्थानिक गुन्हे शाखेची सलग दुसऱ्या दिवशी मोठी कारवाई; एमडी तस्कर जेरबंद, अडीच लाखांचा मुद्देमाल जप्त

अहिल्यानगर (श्रीरामपूर) : श्रीरामपूर शहरात अंमली पदार्थांविरोधात स्थानिक गुन्हे शाखेने सलग दुसऱ्या दिवशी मोठी

Ahilyanagar : अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग, आरोपीला अटक; दोन गावे कडकडीत बंद

Ahilyanagar ( राहुरी /आश्वी प्रतिनिधी ) : अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी (Rahuri) तालुक्यात तुळापूर (Tulapur) येथील एक संतापजनक घटना