वसई-विरारचा अर्थसंकल्प ‘वेटिंग’वर!

स्थायी समिती सभापतींची निवड लांबल्याने मार्चचा मुहूर्त


विरार : महापौर, उपमहापौर निवडणूक उशिरा होऊनही मुंबई महापालिकेचे स्थायी समिती सभापती तसेच विषय समित्यांचे सभापती निवडले गेले आहेत. विशेष म्हणजे मुंबईत स्वीकृत सदस्यांची निवडसुद्धा झाली असून, अर्थसंकल्पही सादर झालेला आहे. वसई-विरारमध्ये मात्र ही सर्व प्रक्रिया संथगतीने सुरू असून, स्थायी समिती सभापती नसल्याने यावर्षी अर्थसंकल्प सादर करण्यासाठी मार्च महिन्याचा मुहूर्त निघणार आहे.


वसई-विरार महापालिकेत स्थायी समितीच्या १६ सदस्यांची निवड २० फेब्रुवारी रोजी महासभेत करण्यात आली आहे. आता याच सदस्यांमधून स्थायी समिती सभापती निवडले जाणार आहेत. यासाठी ५ मार्च रोजी सभापती निवडणुकीचा कार्यक्रम जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली लावण्यात आला आहे. पालिकेत बहुजन विकास आघाडीकडे स्थायी समितीत १० सदस्य असून, भाजपकडे ६ सदस्य आहेत. त्यामुळे सभापती पदावर बहुजन विकास आघाडीच्याच सदस्यांची वर्णी लागणार आहे. दरम्यान, महापालिकेचा वार्षिक अर्थसंकल्प आयुक्तांकडून स्थायी समिती सभापती यांना सादर केला जातो. मात्र वसई-विरार महापालिकेत स्थायी समितीचे सभापती अद्याप निवडले गेले नाहीत.त्यामुळे अर्थसंकल्प सादर करण्यात आलेला नाही. ५ मार्च रोजी नवे सभापती निवडले जाणार असल्याने ६ मार्च रोजी अर्थसंकल्प सादर होणार असल्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे यावर्षीचा अर्थसंकल्प गेल्या वर्षीच्या तुलनेत ७००/८०० कोटी रुपयांनी कमी असण्याची शक्यता आहे.


गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात प्रशासकीय काळात सादर करण्यात आलेला अर्थसंकल्प ३ हजार ९२६ कोटी रुपयांचा होता. मालमत्ता कर, पाणीपट्टी यामध्ये वाढ करण्यासह पाणीपुरवठा लाभ कर आणि मल सुविधा लाभ कर तसेच सिसी प्रमाणपत्र घेतलेल्या आणि ओसी प्रमाणपत्र न घेतलेल्या विकासकांकडून दंड म्हणून वसूल करणे अशा प्रकारे पालिकेचे उत्पन्न वाढविण्याची योजना प्रशासनाने आखली होती. मात्र उपरोक्त बाबींपैकी एकही निर्णय महापालिका प्रशासन घेऊ शकले नाही. त्यामुळे अर्थसंकल्प सादर केल्यानंतर अवघ्या चार महिन्यातच सर्व विभागाचा खर्च ३० टक्क्याने कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला. आजही उत्पन्न वाढीच्या दृष्टीने परिस्थिती "जैसे थे" अशीच असल्याने यावर्षीचा अर्थसंकल्प गेल्या वर्षीच्या तुलनेत ७००/८०० कोटी रुपयांनी कमी असण्याची शक्यता आहे. स्थायी समिती सभापती निवडीनंतर म्हणजेच मार्च महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात अर्थसंकल्प सादर होण्याची शक्यता आहे.



स्वीकृत सदस्य पदासाठी प्रतीक्षा :


महापौर, उपमहापौर, सभागृह नेते, विरोधी पक्षनेता या सर्वांच्या निवडीनंतर सर्वच महापालिकेत स्वीकृत सदस्य पदाची उत्सुकता असते. मुंबईसह काही महापालिकांमध्ये स्वीकृत सदस्य निवडल्या गेले आहेत. वसई-विरारमध्ये मात्र याबाबत सुद्धा प्रशासकीय स्तरावरून काहीही हालचाल झालेली नाही. सदस्य संख्याबळानुसार बहुजन विकास आघाडीचे सहा आणि भाजपचे चार सदस्य निवडले जाणार आहेत. यासाठी दोन्ही राजकीय पक्षांमध्ये चांगलीच स्पर्धा आहे. दरम्यान, परिवहन समिती, वृक्ष प्राधिकरण समिती, वैद्यकीय आरोग्य सहाय्य समिती या समित्यांचे गठन सुद्धा अद्याप झालेले नसून त्यांचे सभापती देखील निवडले गेलेले नाहीत. त्याचप्रमाणे नऊ झोन सभापतीची निवडदेखील करावी लागणार आहे. या प्रक्रियेकडे सुद्धा दोन्ही राजकीय पक्षांच्या नगरसेवकांचे लक्ष लागलेले आहे आणि प्रशासकीय स्तरावर मात्र याबाबत काहीही हालचाली नाहीत.

Comments
Add Comment

Devendra Fadnavis : कला, संस्कृती अन् खाद्यसंस्कृतीची ओळख पटवून देणारा 'माटी ९ पूर्वांचल महोत्सव' : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : भारतीय संस्कृती महान असून ही संस्कृती समृद्ध करण्यासाठी महाराष्ट्राने anj पूर्वांचलने महत्त्वपूर्ण

Belgium national football team : बेल्जियमचा वर्ल्ड कप संघ जाहीर, केविन डी. ब्रुयनला कर्णधारपद, ओपेंडा संघातून बाहेर

आगामी फिफा वर्ल्डकप २०२६ साठी (FIFA WORLD CUP 2026) बेल्जियम फुटबॉल फेडरेशनने २६ खेळाडूंच्या संघाची घोषणा केली आहे. यावेळी

Ranbir Kapoor : रणबीर कपूर झाला अयोध्यावासी! ‘रामायण’ रिलीजआधी राम मंदिराजवळ ३.३१ कोटींची प्रॉपर्टी खरेदी

अयोध्या : रणबीर कपूर (Ranbir Kapoor) सध्या त्याच्या बहुचर्चित रामायण (Ramayana) चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात तो प्रभू

Rachin Ravindra : केकेआरला मोठा धक्का ! एकही सामना न खेळता स्टार खेळाडू हंगामातून बाहेर

IPL 2026 : आयपीएल २०२६ मध्ये केकेआरने अपेक्षेप्रमाणे कामगिरी केली नाही. या हंगामात ११ पैकी चार सामने जिंकत ९ गुण मिळवले

IPL 2026 : प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी चेन्नईच्या संघात कुलदीप यादवची एन्ट्री तर RCB मध्येही मोठा बदल

चेन्नई : आयपीएलच्या १९ व्या हंगामात प्लेऑफमध्ये कोणते संघ पोहोचणार याकडे सर्व क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागले आहे.

New Jail In Mumbai : मुंबईत मानखुर्द परिसरात ११ एकर भूखंडावर उभारणार नवे कारागृह

मुंबई : राज्यातील कारागृहांवरील वाढता ताण आणि कैद्यांची वाढती संख्या लक्षात घेता मुंबईतील घाटकोपर-मानखुर्द