पालघरमध्ये बंद दगड खाणीत दुर्घटना; दोन अल्पवयीन मुलांचा बुडून मृत्यू

पालघर : पाण्याचा अंदाज न ओळखता आल्याने दोन मुलांचा जीव गेल्याची दुर्दैवी घटना पालघरमध्ये घडली आहे. मनोरजवळील टाकवहाल परिसरातील बंद पडलेल्या दगड खाणीत ही दुर्घटना घडली असून परिसरात शोककळा पसरली आहे.



नेमकं काय घडलं ?


मुंबई–अहमदाबाद महामार्गावरील मस्तान नाका उड्डाणपुलाजवळ असलेल्या खाणीत शुक्रवारी दुपारी काही मुले पोहण्यासाठी उतरली होती. मात्र पाणी किती खोल असेल याचा अंदाज न आल्याने दोन्हीही मुलांचा बुडून मृत्युज आला आहे. या घटनेत जिग्नेश विजय पवार (वय ८) याचा मृतदेह सापडला आहे. तर आयुष मुकेश पवार (वय १५) याचा शोध उशिरापर्यंत सुरू होता. यांचे कुटुंब हे मूळचे इंदोरचे असून रोजगारासाठी पालघरमध्ये मनोर परिसरात कामानिमित्त वास्तव्यास होते.



पोलिसांची शोधमोहीम


घटनेची माहिती मिळताच मनोर पोलीस स्टेशनचे पथक घटनास्थळी दाखल झाले. तसेच वसई -विरार महापालिका अग्निशमन दलाकडून शोधकार्य राबविण्यात आले. या दुर्घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत असून बंद खाणींच्या सुरक्षेबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत. बंद पडलेल्या खाणींमध्ये साचलेल्या पाण्यामुळे धोका वाढत असल्याची चर्चा आहे. अशा ठिकाणी सुरक्षाव्यवस्था आणि इशारे फलक नसल्याने अपघातांची शक्यता वाढते, असे स्थानिकांचे म्हणणे आहे. प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी होत आहे.

Comments
Add Comment

Home Minister Amit Shah : एका पंधरवड्यात ६ हजार कोटी रुपयांचे ड्रग्ज जाळणार

एका पंधरवड्यात ६ हजार कोटी रुपयांचे ड्रग्ज जाळणार नवी दिल्ली : पुढील १५ दिवसांत संपूर्ण देशात ६००० कोटी रुपये

TET exam : टीईटी परीक्षेत सीसीटीव्हीमध्ये चेहरा दिसणे बंधनकारक

टीईटी परीक्षेत सीसीटीव्हीमध्ये चेहरा दिसणे बंधनकारक बुरखा, दुपट्टा किंवा ओढणीला बंदी नाही- राज्य परीक्षा

Prajakta Lavangare : महिला आणि बालकांच्या आरोग्याच्या दृष्टीने अधिक प्रभावी सुविधा देण्यासाठी उपाययोजना करा

सार्वजनिक आरोग्य विभागाच्या कामकाजाचा, सुविधांचा अतिरिक्त आयुक्तांकडून आढावा मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या

Vilas Ghule : विलास घुले हत्या प्रकरणावरून धनंजय मुंडेंचा सवाल; निष्पक्ष तपासाची मागणी

बीड : बीड (Beed) जिल्ह्यातील केज तालुक्यातील विलास घुले (Vilas Ghule) हत्या प्रकरणावरून (Murder) माजी मंत्री आणि आमदार धनंजय मुंडे

Deputy Chief Minister Sunetra Ajit Pawar : श्रीक्षेत्र आळंदीच्या विकासासाठी शासन सकारात्मक;

पुणे : उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजितदादा पवार यांनी आज

Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस - उद्धव ठाकरेंचा एकत्र विमान प्रवास

ऑपरेशन टायगर’नंतरची पहिलीच भेट मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात कधी काय घडेल याचा नेम नाही, असे म्हणतात. उबाठा