पालघरमध्ये बंद दगड खाणीत दुर्घटना; दोन अल्पवयीन मुलांचा बुडून मृत्यू

पालघर : पाण्याचा अंदाज न ओळखता आल्याने दोन मुलांचा जीव गेल्याची दुर्दैवी घटना पालघरमध्ये घडली आहे. मनोरजवळील टाकवहाल परिसरातील बंद पडलेल्या दगड खाणीत ही दुर्घटना घडली असून परिसरात शोककळा पसरली आहे.



नेमकं काय घडलं ?


मुंबई–अहमदाबाद महामार्गावरील मस्तान नाका उड्डाणपुलाजवळ असलेल्या खाणीत शुक्रवारी दुपारी काही मुले पोहण्यासाठी उतरली होती. मात्र पाणी किती खोल असेल याचा अंदाज न आल्याने दोन्हीही मुलांचा बुडून मृत्युज आला आहे. या घटनेत जिग्नेश विजय पवार (वय ८) याचा मृतदेह सापडला आहे. तर आयुष मुकेश पवार (वय १५) याचा शोध उशिरापर्यंत सुरू होता. यांचे कुटुंब हे मूळचे इंदोरचे असून रोजगारासाठी पालघरमध्ये मनोर परिसरात कामानिमित्त वास्तव्यास होते.



पोलिसांची शोधमोहीम


घटनेची माहिती मिळताच मनोर पोलीस स्टेशनचे पथक घटनास्थळी दाखल झाले. तसेच वसई -विरार महापालिका अग्निशमन दलाकडून शोधकार्य राबविण्यात आले. या दुर्घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत असून बंद खाणींच्या सुरक्षेबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत. बंद पडलेल्या खाणींमध्ये साचलेल्या पाण्यामुळे धोका वाढत असल्याची चर्चा आहे. अशा ठिकाणी सुरक्षाव्यवस्था आणि इशारे फलक नसल्याने अपघातांची शक्यता वाढते, असे स्थानिकांचे म्हणणे आहे. प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी होत आहे.

Comments
Add Comment

Gold-Silver Rate : आनंदवार्ता! चांदी १४ हजारांनी कोसळली तर सोन्याचा भाव १.६० लाखांच्या खाली

मुंबई : आंतरराष्ट्रीय घडामोडींमुळे मौल्यवान धातूंच्या बाजारात मोठी उलथापालथ पाहायला मिळत आहे. अमेरिका आणि इराण

Crime News : शिट्टी वाजवली, उसाच्या शेतातून 10 ते 12 जण बाहेर आले, अन.... स्वस्तात सोने मिळण्याचे आमिष महागात पडले

अहिल्यानगर : स्वस्तात सोने मिळणार असल्याचं आमिष दाखवत रायगडच्या जिल्हा परिषद सदस्यालाच सापळ्यात ओढून तब्बल 52

India Slam Pakistan at UN : 'खोट्या गोष्टी पसरवण्याची पाकिस्तानला सवय', संयुक्त राष्ट्रात काश्मीर प्रश्नावर भारताची स्पष्ट भूमिका

नवी दिल्ली : भारताने पाकिस्तानला संयुक्त राष्ट्रांमध्ये (UN) त्याची खरी जागा पुन्हा एकदा दाखवून दिली आहे. जम्मू आणि

Cockroach Janta Party : नावात 'कॉकरोच' पण दिल्लीच्या उन्हात निघाली हवा! 'VIP' नेते सौरव दास यांचा सरंजामशाही चेहरा उघडा

नवी दिल्ली : देशाच्या राजधानीत एकीकडे 'नीट २०२६' (NEET 2026) परीक्षेतील गैरव्यवहाराविरोधात विद्यार्थ्यांचा आक्रोश

Asia Cup U-18 Hockey Ind vs Pak : भारताने पाकिस्तानला नमवत गाठली अंतिम फेरी; आशिष तानी पूर्तिचा चौकार, 5-3 ने दणदणीत विजय

Mumbai : पुरुष अंडर-18 हॉकी आशिया कप स्पर्धेच्या उपांत्य फेरीत भारताने कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानवर 5-3 ने पराभव केला.

Mumbai News : मुंबईत १५ वर्षांपासून बेकायदेशीर वास्तव्य? सात बांगलादेशी नागरिक अटकेत, पोलिसांचा तपास सुरू

मुंबई : मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) अवैध स्थलांतराविरोधात मोठी कारवाई करत सात बांगलादेशी (Bangladeshi) नागरिकांना अटक केली