पाकिस्तानला लागून असलेल्या सीमेवरील 'या' राज्यांमध्ये गुरूवारी मॉकड्रिल

  50

नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धबंदी असूनही, दोन्ही देशांमध्ये तणाव कायम आहे. दरम्यान, उद्या गुरुवारी (दि.२९) पाकिस्तानला लागून असलेल्या राज्यांमध्ये नागरी संरक्षण मॉकड्रिल आयोजित केले आहे. हे मॉक ड्रिल गुजरात, राजस्थान आणि जम्मू-काश्मीरमध्ये आयोजित केले आहे. या काळात नागरिकांना सतर्क राहण्याचे निर्देशही दिले जातील.


गुरुवारी(दि.२९) होणाऱ्या मॉक ड्रिलचा उद्देश संभाव्य दहशतवादी धोक्यांविरुद्ध तयारीची चाचणी घेणे आणि ओलिस संकट किंवा दहशतवादी हल्ल्याच्या बाबतीत सुरक्षा एजन्सींच्या प्रतिसाद धोरणाचे मूल्यांकन करणे आहे. त्यानुसार, गुरुवारी (दि.२९) मोठ्या प्रमाणात मॉकड्रिल करण्याची तयारी सुरू आहे. भारताच्या या सीमावर्ती भागात हवाई संरक्षण यंत्रणाही सतर्क आहेत. पाकिस्तानची दहशत आणि नियंत्रण रेषेवर होणारा गोळीबार पाहून भारतीय सैन्याने काश्मीरच्या 10 जिल्ह्यांमध्ये नियंत्रण केंद्रे स्थापन केली आहेत. आता अशातच सीमावर्ती भागात मॉक ड्रिल आयोजित केल्यामुळे पाकिस्तानही सतर्क झाला आहे.


पाकिस्तानसोबत वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृह मंत्रालयाने सर्व राज्यांना ७ मे रोजी 'मॉक ड्रिल' करण्याचे निर्देश दिले होते.यामध्ये देशभरातील विविध राज्यांमध्ये आधुनिक शस्त्रांनी सुसज्ज असलेल्या दहशतवादविरोधी पथके आणि कमांडोंनी वास्तविक दहशतवादी हल्ल्यासारख्या परिस्थितींचा सराव केला होता. गृह मंत्रालयाने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य सचिवांना पाठवलेल्या परिपत्रकात असे म्हटले आहे की, 'मॉक ड्रिल' दरम्यान करावयाच्या उपाययोजनांमध्ये हवाई हल्ल्याचा इशारा देणारे सायरन वाजवणे, 'कोणत्याही हल्ल्याच्या' बाबतीत स्वतःचे संरक्षण करण्यासाठी नागरिकांना सुरक्षा पैलूंवर प्रशिक्षण देणे आणि बंकर आणि खंदकांची साफसफाई करणे समाविष्ट आहे.


भारताच्या ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तानमध्ये प्रचंड घबराटीचे वातावरण आहे. ऑपरेशन सिंदूरसारख्या आणखी एका ऑपरेशनची पाकिस्तानला भीती आहे. भारताने आतापर्यंत फक्त 9 दहशतवादी तळांवर हवाई हल्ले केले आहेत. अशा परिस्थितीत पाकिस्तानमधील आणखी 12 दहशतवादी तळांची यादी भारताकडे आहे. यापूर्वीच भारताने स्पष्ट केले होते की, दहशतवाद्यांचे उर्वरित तळही नष्ट केले जातील.पहलगाम हल्ल्यानंतर, देशभरातील सुरक्षा एजन्सींना सतर्क ठेवण्यात आले आहे आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना वाढविण्यात आल्या आहेत.


दरम्यान, भारताने 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत ६-७ मे च्या रात्री पाकिस्तान आणि पाकव्याप्त जम्मू आणि काश्मीरमधील दहशतवादी छावण्यांवर प्रतिहल्ला सुरू केला होता. २२ एप्रिल रोजी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. लष्करी प्रत्युत्तरात भारतीय सैन्याने जैश-ए-मोहम्मद, लष्कर-ए-तैयबा आणि हिजबुल मुजाहिदीन सारख्या दहशतवादी गटांशी संबंधित १०० हून अधिक दहशतवाद्यांना ठार मारले. त्या ऑपरेशनदरम्यान देशभरात मॉक ड्रिल राबविण्यात आले होते.

Comments
Add Comment

सोनिया गांधी सिमल्याच्या रुग्णालयात

सिमला : काँग्रेसच्या संसदीय पक्षाच्या अध्यक्ष आणि राज्यसभा खासदार सोनिया गांधी यांना सिमला येथील इंदिरा गांधी

Kedarnath Helicopter Video : केदारनाथकडे जाणाऱ्या हेलिकॉप्टरची महामार्गावर आपत्कालीन लँडिंग; व्हिडिओ पाहा

रुद्रप्रयाग : केदारनाथ धामकडे जाणाऱ्या खाजगी हेलिकॉप्टरने गुप्तकाशी जि. रुद्रप्रयाग येथे तांत्रिक बिघाडामुळे

Mahua Moitra Ties The Knot : दोन नेते जर्मनीत भेटले अन् गुपचूप विवाहबंधनात अडकले

गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री शिवांगी वर्मा आणि ७० वर्षीय अभिनेता गोविंद नामदेव यांचा विवाह जोरदार चर्चेत

Gangatok : उत्तर सिक्किममधील हवाई बचाव मोहीम पूर्ण; ७६ सैनिकांना वाचवण्यात यश

गंगटोक : उत्तर सिक्किममधील छातेन येथून सुरु असलेली हवाई बचाव मोहीम आज शनिवारी सकाळी एमआय-१७ हेलिकॉप्टरच्या

काँग्रेस काळजी नक्षलवाद्यांची, भाजपाकडे केली शस्त्रसंधीची मागणी

नवी दिल्ली : भारताला नक्षलवादमुक्त करण्यासाठी केंद्र सरकारच्या नेतृत्वात देशव्यापी मोहीम सुरू आहे. सर्व

Longest Tunnel T50 Vande Bharat : जम्मू-श्रीनगर-बारामुला रेल्वेमार्गाचे स्वप्न पूर्ण! T-५० मधून सुसाट धावली वंदे भारत; रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी केला प्रवास

जम्मू-कश्मीर : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी शुक्रवारी जम्मू-कश्मीरमधील कटरा (Katra) आणि श्रीनगर (Shrinagar)