Rain Update: जोरदार फटकेबाजीनंतर आजही पावसाची रिमझिम सुरूच, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली आणि साताऱ्याला रेड अलर्ट

मुंबई: सोमवारी मुंबईसह महाराष्ट्रात धुंवाधार पाऊस बरसला. या जोरदार पावसामुळे संपूर्ण मुंबईची वाहतूकव्यवस्था कोलमडली होती. ठिकठिकाणी पाणी जमा झाल्याने नागरिकांची प्रचंड तारांबळ झाली. दरम्यान, सोमवारी जोरदार बरसल्यानंतर मंगळवारी सकाळपासून पावसाने काहीशी उसंत घेतली आहे.मात्र तरीही अनेक ठिकाणी रिमझिम पाऊस सुरूच आहे.


मुंबईमध्ये रस्ते वाहतूक व्यवस्थित सुरू आहे तर लोकल गाड्या १० ते १५ मिनिटे उशिराने सुरू आहेत. दरम्यान, सोमवारच्या पावसानंतर मुंबईतील वातावरण थंडावले आहे. हवामान विभागाने आजही मुंबईला पिवळा अलर्ट दिला आहे. त्यामुळे पावसाची शक्यता आहे.


मुंबईत पावसाची रिपरिप सुरू असली तरी राज्यातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली आणि सातारा येथे रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर पुणे, हिंगोली, नांदेड, परभणी तसेत रायगड येथे ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. दरम्यान, मच्छिमारांनी या दरम्यान समुद्रामध्ये जाऊ नये असे आवाहन करण्यात आले आहे.



मुंबई-गोवा महामार्गाची दुर्दशा


जोरदार पावसामुळे मुंबई-गोवा महामार्गाची अवस्था खराब झाली आहे. अनेक ठिकाणी पावसामुळे मोठमोठाले खड्डे पडले आहेत. यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मात्र प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे.

Comments
Add Comment

Ashish Shekar : महानगरपालिका रुग्णालयातील ओपीडी आणि स्वच्छतागृहांचे सध्याचे चित्र तातडीने सुधारा

मुंबई उपनगर जिल्हा पालकमंत्री आशिष शेलार यांचे सार्वजनिक आरोग्य आढावा बैठकीत निर्देश मुंबई (विशेष

Geomagnetic storm : पृथ्वीवर भूचुंबकीय वादळ धडकणार, नासाचा इशारा ; भारतातही ‘ऑरोरा’ दिसण्याची शक्यता

मुंबई : सूर्यावरील एका शक्तिशाली उद्रेकामुळे पृथ्वीच्या दिशेने प्रचंड प्रमाणात चुंबकीय ऊर्जा आणि प्लाझ्माचा

Adani Airport : मुख्यमंत्री कार्यालयाकडून सिडको आणि 'अदानी एअरपोर्ट' प्रशासनाला नोटीस

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांना कार्यक्रमाचे निमंत्रण न पाठवल्याने राजशिष्टाचाराचा

High Court : सामान्य प्रशासन विभागाच्या सचिवांना अवमान नोटीस

उच्च न्यायालयाच्या आदेशाच्या अंमलबजावणीत चालढकल; तात्पुरत्या पदोन्नतीचा मार्ग मोकळा होऊनही आदेश रखडले मुंबई :

Aarey Colony : आरे वसाहतीतील झोपडपट्टी पुनर्वसनाचा प्रस्ताव अखेर रद्द

राज्य शासनाने जागा घेतली ताब्यात; ३३.६ एकर जमिनीबाबत २० वर्षांपूर्वी झाला होता निर्णय मुंबई : आरे दुग्ध

Sagar Mitra : किनारपट्टीवरील ९१ अति संवेदनशील लँडिंग पॉईंटवर ‘सागर मित्र’ नेमणार

मंत्री नितेश राणे यांनी घेतला आढावा; मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेच्या विविध प्रकल्पांना मिळणार गती मुंबई :