Janjira Fort Close: मुरुड जंजिरा किल्ला पर्यटनासाठी होणार बंद! कारण आले समोर

अलिबाग: केरळमध्ये मान्सूनचे आगमन झाले असून, महाराष्ट्रात काही दिवसातच त्याचे आगमन होणार असल्याकारणामुळे, पर्यटकाच्या सुरक्षिततेचा विचार करून पुरातत्व खात्याने दिनांक 26 मे पासून जंजिरा किल्ला पर्यटनासाठी बंद (Murud Janjira Fort Closed for Tourism) करण्याची घोषणा केली आहे.


सध्या राज्यभर अवकाळी पावसाने कहर केला आहे, समुद्रकिनार पट्टीवर देखील हवामान खात्याकडून अनेकदा अलर्ट जारी करण्यात आले आहेत, त्याचप्रमाणे मान्सूनच्या  ढगाळ वातावरणासोबत समुद्रात वाढणाऱ्या लाटांच्या पार्श्वभूमीवर जंजिरा किल्ला पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांना धोका पोहोचण्याची शक्यता असल्याकारणामुळे, पुरातत्व खात्याद्वारे हा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र या निर्णयामुळे पर्यटकांचा हिरमोड झाला आहे.


खरे तर लहान मुलांची उन्हाळ्याची सुट्टी अद्याप संपलेली नाही. त्यामुळे, शिवाजी महाराजांचे गडकिल्ले दाखवण्यासाठी सर्वाधिक पालक मुंबईपासून काही किलोमीटर अंतरावर असलेल्या जंजिरा किल्ल्यावर गर्दी करतात. सुट्टीच्या काळांत जंजिरा किल्ला पाहण्यासाठी प्रवेश द्वाराजवळ उतरताना प्रवाशांची होणारी कसरत लक्षात घेता, पावसाळ्यात त्याचे व्यवस्थापन करणे जिकरीचे ठरू शकते. खास करून पावसाळ्यात समुद्रात उंच उसळणाऱ्या लाटा, वादळ, हेलकावे यामुळे होऊ शकणारी दुर्घटना टाळण्यासाठी पुरातत्व विभाग आणि मेरिटाइम बोर्ड दरवर्षी पावसाळ्यात सुरक्षितता म्हणून राजपुरी खाडीतील जंजिरा जलदुर्ग पर्यटकांना पाहण्यासाठी बंद ठेवतात. त्यामुळे पर्यटकांना जंजिरा किल्ला पाहण्यासाठी पावसाळा संपण्याची वाट पहावी लागणार आहे.

Comments
Add Comment

मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर आणखी एक अपघात, वाहतुकीची कोंडीच कोंडी

पुणे : मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर खंडाळा घाटातील आडोशी बोगद्याजवळ पुण्याकडून मुंबईच्या दिशेने प्रोपिलीन वायू

आपत्कालीन परिस्थितीतील वाहतूक आराखडा तत्काळ तयार करा - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

मुंबई पुणे द्रुतगती महामार्ग वाहतूक कोंडीची उपमुख्यमंत्र्यांकडून गंभीर दखल मिसिंग लिंकचे कामही लवकरात लवकर

अमरावती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयासाठी १२ हेक्टर जागा मंजूर

देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेवरून महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा निर्णय १०० विद्यार्थी प्रवेश ⁠४३०

पुणे एक्सप्रेस वे अपघात प्रकरणी महाराष्ट्र राज्य परिवहन सेवेच्या १३९ फेऱ्या रद्द

मुंबई : पुणे–मुंबई एक्सप्रेस वेवर झालेल्या टँकर अपघातामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली असून या

एक्सप्रेवेवर प्रचंड मोठी वाहतूक कोंडी अन् २५ किलोमीटर पर्यंत रांगा; नेमकं पुण्यात घडलं काय ?

लोणावळा : मुंबई–पुणे द्रुतगती महामार्गावर मंगळवारी सायंकाळी घडलेल्या एका अपघातामुळे संपूर्ण मार्गावर

Congress: काँग्रेसमधला वाद चव्हाट्यावर, नगरसेवक थेट दिल्लीत पोहोचले, बैठकीत नेमकं घडलं काय?

दिल्ली: चंद्रपूर महापालिकेत सर्वाधिक जागा जिंकूनही काँग्रेसमध्ये गटातील राजकारणामुळे सत्ता गमावण्याची वेळ