Janjira Fort Close: मुरुड जंजिरा किल्ला पर्यटनासाठी होणार बंद! कारण आले समोर

अलिबाग: केरळमध्ये मान्सूनचे आगमन झाले असून, महाराष्ट्रात काही दिवसातच त्याचे आगमन होणार असल्याकारणामुळे, पर्यटकाच्या सुरक्षिततेचा विचार करून पुरातत्व खात्याने दिनांक 26 मे पासून जंजिरा किल्ला पर्यटनासाठी बंद (Murud Janjira Fort Closed for Tourism) करण्याची घोषणा केली आहे.


सध्या राज्यभर अवकाळी पावसाने कहर केला आहे, समुद्रकिनार पट्टीवर देखील हवामान खात्याकडून अनेकदा अलर्ट जारी करण्यात आले आहेत, त्याचप्रमाणे मान्सूनच्या  ढगाळ वातावरणासोबत समुद्रात वाढणाऱ्या लाटांच्या पार्श्वभूमीवर जंजिरा किल्ला पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांना धोका पोहोचण्याची शक्यता असल्याकारणामुळे, पुरातत्व खात्याद्वारे हा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र या निर्णयामुळे पर्यटकांचा हिरमोड झाला आहे.


खरे तर लहान मुलांची उन्हाळ्याची सुट्टी अद्याप संपलेली नाही. त्यामुळे, शिवाजी महाराजांचे गडकिल्ले दाखवण्यासाठी सर्वाधिक पालक मुंबईपासून काही किलोमीटर अंतरावर असलेल्या जंजिरा किल्ल्यावर गर्दी करतात. सुट्टीच्या काळांत जंजिरा किल्ला पाहण्यासाठी प्रवेश द्वाराजवळ उतरताना प्रवाशांची होणारी कसरत लक्षात घेता, पावसाळ्यात त्याचे व्यवस्थापन करणे जिकरीचे ठरू शकते. खास करून पावसाळ्यात समुद्रात उंच उसळणाऱ्या लाटा, वादळ, हेलकावे यामुळे होऊ शकणारी दुर्घटना टाळण्यासाठी पुरातत्व विभाग आणि मेरिटाइम बोर्ड दरवर्षी पावसाळ्यात सुरक्षितता म्हणून राजपुरी खाडीतील जंजिरा जलदुर्ग पर्यटकांना पाहण्यासाठी बंद ठेवतात. त्यामुळे पर्यटकांना जंजिरा किल्ला पाहण्यासाठी पावसाळा संपण्याची वाट पहावी लागणार आहे.

Comments
Add Comment

कोल्हापूरमधील ‘ईव्हीएम स्ट्राँग रूम’ बाहेरील सीसीटीव्ही हटवल्याप्रकरणी सखोल चौकशी होणार – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे; सरकारने घेतली गंभीर दखल

नागपूर : कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्याच्या पेठ-वडगाव नगरपालिका निवडणुकीदरम्यान ईव्हीएम स्ट्राँग

वर्ध्यात 'डीआरआय'च्या टीमकडून ड्रग्जचा कारखाना उद्ध्वस्त; पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

नागपूर : कारंजा (वर्धा) परिसरातील दुर्गम भागात अवैधरित्या उभारण्यात आलेला ‘मेफेड्रोन’ निर्मितीचा कारखाना

थकीत ₹५००० कोटी दंड वसुलीसाठी फडणवीसांची 'कठोर' घोषणा; लवकरच नवी पॉलिसी

नागपूर : विधान परिषदेत आज टू-व्हीलर पार्किंग आणि वाहनधारकांकडून थकीत चालान वसूल करण्याच्या प्रश्नावर

येत्या आठ दिवसांत ई-वाहनांना टोलमाफीची अंमलबजावणी होणार

नागपूर : राज्यातील ईव्ही व ई-बाइक वापरकर्त्यांना टोलमाफी देण्याबाबत पुढील आठ दिवसांत कार्यवाही करावी, असे

वर्सोवा क्रिस्टल पॉईंट मॉलमधील अनधिकृत बांधकामावर कारवाई- नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ

नागपूर : वर्सोवा क्रिस्टल पॉईंट मॉल मधील अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती नगरविकास

ओबीसी समाजासाठी मिनी महामंडळांची स्थापना, मुख्यमंत्र्यांची घोषणा

नागपूर :  विधान परिषदेमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसी समाजाच्या कल्याणासाठी एक महत्त्वपूर्ण