काव्यरंग

कधी तू ...



कधी तू रिमझिम झरणारी बरसात
कधी तू चमचम करणारी चांदण्यांत
कधी तू कोसळत्या धारा, थैमान वारा
बिजलीची नक्षी अंबरात
सळसळत्या लाटा
भिजलेल्या वाटा
चिंब पावसाची ओली रात
कधी तू रिमझिम झरणारी बरसात
कधी तू चमचम करणारी चांदण्यांत


कधी तू अंग अंग मोहरणारी
आसमंत दरवळणारी रातराणी वेड्या जंगलात
कधी तू हिरव्या चाफ्याच्या पाकळ्यांत
जरी तू कळले तरी ना कळणारे
दिसले तरी ना दिसणारे, विरणारे मृगजळ एक क्षणांत
तरी तू मिटलेल्या माझ्या पापण्यांत


गीत : श्रीरंग गोडबोले
स्वर : हृषिकेश रानडे



मेघ नसता वीज नसता...



मेघ नसता वीज नसता मोर नाचू लागले
जाहले इतुकेच होते की तुला मी पाहिले !


गोरट्या गालांवरी का चोरटा हा रक्तिमा?
तू मला चोरून बघताना तुला मी पाहिले !


एवढे नाजुक आहे वय तुझे माझ्या फुला
रंगदेखील पाकळ्यांवर भार वाटू लागले !


लाख नक्षत्रे उराशी, नभ तरीही हळहळे
हे तुझे नक्षत्रवैभव का धरेवर राहिले?


पाहता तुज रंग उडुनी होई गजरा पांढरा
शल्य हे त्याच्या उरातील बघ सुगंधू लागले !


भर पहाटे मी फुलांनी दृष्ट काढून टाकली
पाहती स्वप्‍नी तुला जे भय तयांचे वाटले !


गीत : संदीप खरे
स्वर : संदीप खरे

Comments
Add Comment

शहराचा विकास, माणसांची कोंडी

- संवाद; निशा वर्तक शहर वाढत आहे. उंच इमारती उभ्या राहत आहेत. रस्ते रुंद होत आहेत. मेट्रो, पूल, मॉल्स आणि आधुनिक

हम होंगे कामयाब...

नॉस्टॅल्जिया; श्रीनिवास बेलसरे कालच देशाचा ८०वा स्वातंत्र्य दिन देशभर आणि जगातील सर्व भारतीय वकिलातीत साजरा

बहीण-भावाचे नाते आयुष्यभर जपले!

- स्मृतीपटल; अनिल रा. तोरणे रक्षाबंधन हा सण काळानुसार बदलला असला, तरी बहीण-भावाच्या प्रेमाचे आणि अतूट नात्याचे

श्रावण मास

-  निमित्त; संध्या काटदरे बालकवींनी श्रावण मासाचे सुंदर वर्णन केले आहे - ‘श्रावण मासी हर्ष मानसी, हिरवळ दाटे

आला श्रावण...

-प्रासंगिक; मंजिरी ढेरे श्रावणात प्रत्येकाच्या मनात निळा घन बरसत असतो. परंपरारक्षणाचा संदेश देणारा हा मास

मुलांनो, विचार बदला… भविष्य बदलेल !

- आनंदी पालकत्व; डॉ. स्वाती गानू मुलांनो, आयुष्यात बदल घडवायचा असेल, तर नेहमी परिस्थिती बदलण्यापासून सुरुवात