Vaishnavi Hagawane Case: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मोठे वक्तव्य, 'कोणालाही सोडलं जाणार नाही, कडक कारवाई होणार’

  748

पुण्यातील वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात एकनाथ शिंदे यांनी घेतली कस्पटे कुटुंबियांची भेट


पुणे: मुळशी येथे वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण संपूर्ण जिल्ह्याला हादरवून सोडणारे आहे. सासरच्या जाचाला आणि अमानुष छळाला कंटाळून वैष्णवी हगवणे हीने आत्महत्या केल्या प्रकरणात अनेक नवनवीन खुलसे समोर येत आहेत. या प्रकरणातील सर्व आरोपी पोलिसांच्या ताब्यात आले असून, यांच्यावर काय कारवाई केली जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहेत. दरम्यान,"ही घटना अतिशय दुर्दैवी असून, माणुसकीला काळीमा फासणारी आहे, या प्रकरणात कडक कारवाई केली जाईल",असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.



वैष्णवीच्या कुटुंबियांची एकनाथ शिंदे यांनी घेतली भेट


उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यानंतर, महाराष्ट्राचे दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील कस्पटे कुटुंबाची भेट घेत वैष्णवीला न्याय देण्याचे आश्वासन दिले आहे. घडलेली घटना ही अतिशय दुर्दैवी आणि माणुसकीला काळीमा फासणारी असल्याचं यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.



काय म्हणाले एकनाथ शिंदे?


समाज प्रगत झाला आहे, राज्यात अशा घटना घडणे वाईट आहे. अमानवी घटना आहे. नऊ महिन्याचं बाळ समोर असातना कोणतीच आई असं करू शकत नाही. या सर्व प्रकरणावर मुख्यमंत्री लक्ष ठेवून आहेत, पोलीस काम करत आहेत. घटनेला जबाबदार असणाऱ्या कोणालाही पाठीशी घालू नये. कुटुंबाची भावना लक्षात घेऊन राज्य सरकार कडक कारवाई करेल, अशा कोणत्याही घटनात राजकारण होता कामा नये, परिस्थिती बदलायला हवी, अशा घटना पुन्हा घडू नये म्हणून कारवाई अपेक्षित आहे, त्यामुळे कठोर कारवाई केली जाईल, मुख्यमंत्री लक्ष ठेवून आहेत, उच्चस्तरीय चौकशी सुरू आहे, यामध्ये कोणीही असेल त्याला गृहविभाग सोडणार नाही, कोणालाही पाठिशी घातलं जाणार नाही, असं यावेळी एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.


दरम्यान या प्रकरणात पोलिसांनी वैष्णवीचं स्त्रीधन जप्त हगवणे कुटुंबीयांकडून जप्त केलं आहे, तसेच तिचा पती आणि तिचा दीर यांच्याकडे असलेलं परवानाधारक पिस्तूल देखील जप्त करण्यात आलं आहे,  तिच्या सासऱ्यानं (राजेंद्र हगवणे) पळून जाण्यासाठी जी कार वापरली होती ती देखील जप्त करण्यात आली आहे.

Comments
Add Comment

Ramdas Athawale : हिंदी ही राष्ट्रभाषा आहे आणि तिला विरोध करणं योग्य नाही, रामदास आठवलेंची प्रतिक्रिया...

मुंबई : राज्यात शाळांमध्ये त्रिभाषा सूत्र राबण्याचा सरकारने घेतलेला निर्णय वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. याच

Madhuri Misal : नागरिकांना मिळणार दिलासा ! मिळकतकरासंदर्भातील प्रस्ताव महापालिकेने राज्यसरकारकडे पाठवावा...

पुणे :  मिळकत करावर दंड आणि व्याज लावला जात असल्याने राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी नागरिकांसाठी मोठा निर्णय

Navi Mumbai Airport : नवी मुंबई विमानतळावर प्रवाशांना भरवा लागणार युजर शुल्क

नवी मुंबई : नवी मुंबई विमानतळ कधी सुरु होणार या प्रतिक्षेत गेल्या अनेक महिन्यांपासून नवी मुंबईकर आहेत. परंतू

Nitin Gadkari : दुचाकी चालकांकडून कोणत्याही टोल घेतला जाणार नाही, नितीन गडकरी यांची सोशल मीडियावरती पोस्ट...

मुंबई : राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने १५ जलै २०२५ पासून दुचाकी वाहन चालकांकडून टोल वसूल करण्यात येईल. अशा

Devendra Fadanvis 'आम्ही सर्व जनतेचे सेवक', लोणीकरांच्या वादग्रस्त वक्तव्यावर मुख्यमंत्र्यांची स्पष्ट भूमिका...

मुंबई : भाजपचे आमदार बबनराव लोणीकर यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. त्यामुळे त्यांच्या विधानावरुन अडचणीत वाढ

पंचवटीसह द्वारका परिसरात सलग पाचव्या दिवशी पाणीटंचाई

नागरिक त्रस्त : निलगिरी बाग केंद्रावर तांत्रिक बिघाड जैसे थे नाशिक : निलगिरी बाग जलशुद्धीकरण केंद्राला