Vaishnavi Hagawane Case: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मोठे वक्तव्य, 'कोणालाही सोडलं जाणार नाही, कडक कारवाई होणार’

पुण्यातील वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात एकनाथ शिंदे यांनी घेतली कस्पटे कुटुंबियांची भेट


पुणे: मुळशी येथे वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण संपूर्ण जिल्ह्याला हादरवून सोडणारे आहे. सासरच्या जाचाला आणि अमानुष छळाला कंटाळून वैष्णवी हगवणे हीने आत्महत्या केल्या प्रकरणात अनेक नवनवीन खुलसे समोर येत आहेत. या प्रकरणातील सर्व आरोपी पोलिसांच्या ताब्यात आले असून, यांच्यावर काय कारवाई केली जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहेत. दरम्यान,"ही घटना अतिशय दुर्दैवी असून, माणुसकीला काळीमा फासणारी आहे, या प्रकरणात कडक कारवाई केली जाईल",असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.



वैष्णवीच्या कुटुंबियांची एकनाथ शिंदे यांनी घेतली भेट


उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यानंतर, महाराष्ट्राचे दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील कस्पटे कुटुंबाची भेट घेत वैष्णवीला न्याय देण्याचे आश्वासन दिले आहे. घडलेली घटना ही अतिशय दुर्दैवी आणि माणुसकीला काळीमा फासणारी असल्याचं यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.



काय म्हणाले एकनाथ शिंदे?


समाज प्रगत झाला आहे, राज्यात अशा घटना घडणे वाईट आहे. अमानवी घटना आहे. नऊ महिन्याचं बाळ समोर असातना कोणतीच आई असं करू शकत नाही. या सर्व प्रकरणावर मुख्यमंत्री लक्ष ठेवून आहेत, पोलीस काम करत आहेत. घटनेला जबाबदार असणाऱ्या कोणालाही पाठीशी घालू नये. कुटुंबाची भावना लक्षात घेऊन राज्य सरकार कडक कारवाई करेल, अशा कोणत्याही घटनात राजकारण होता कामा नये, परिस्थिती बदलायला हवी, अशा घटना पुन्हा घडू नये म्हणून कारवाई अपेक्षित आहे, त्यामुळे कठोर कारवाई केली जाईल, मुख्यमंत्री लक्ष ठेवून आहेत, उच्चस्तरीय चौकशी सुरू आहे, यामध्ये कोणीही असेल त्याला गृहविभाग सोडणार नाही, कोणालाही पाठिशी घातलं जाणार नाही, असं यावेळी एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.


दरम्यान या प्रकरणात पोलिसांनी वैष्णवीचं स्त्रीधन जप्त हगवणे कुटुंबीयांकडून जप्त केलं आहे, तसेच तिचा पती आणि तिचा दीर यांच्याकडे असलेलं परवानाधारक पिस्तूल देखील जप्त करण्यात आलं आहे,  तिच्या सासऱ्यानं (राजेंद्र हगवणे) पळून जाण्यासाठी जी कार वापरली होती ती देखील जप्त करण्यात आली आहे.

Comments
Add Comment

वैमानिकाच्या सतर्कतेमुळे मोठे संकट टळले! नागपूरहून उड्डाण केलेल्या विमानाला धडकला पक्षी...

नागपूर: नागपूरहून दिल्लीला निघालेल्या एअर इंडियाच्या विमानावरील मोठे संकट टळले. विमानाने उड्डाण करताच

राज्यातील बांगलादेशी घुसखोरांना दणका! राज्य सरकारचे मोठे पाऊल, रेशनकार्ड पडताळणीचे आदेश

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात बांगलादेशी नागरिकांची घुसखोरी वाढत चालली आहे. याकरता राज्यभरात

‘एमयुएचएस’ च्‍या कुलगुरूपदी डॉ. अजय चंदनवाले

नाशिक : राज्‍य शासनाने वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाचे संचालक डॉ. अजय चंदनवाले यांची नियुक्‍ती ‘महाराष्‍ट्र

“मोदी मिशन हे पुस्तक पुढच्या पिढीला प्रेरणा देणारं”, 'मोदीज् मिशन' मधील काही भाग पाठ्यपुस्तकात समाविष्ट करावा; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सूचना

मुंबई :“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित ‘मोदीज् मिशन’ हे पुस्तक प्रत्येकाने वाचावे आणि संग्रहित

मुंबईनजिक बांधणार देशातील सर्वाधिक लांबीची भिंत! पण यामागचे कारण काय?

मुंबई : पालघर जिल्ह्यात बांधले जाणारे वाढवण बंदर हा केंद्र सरकारचा एक खूप महत्त्वाचा प्रकल्प आहे. या बंदरात

कार्तिकी वारीनिमित्त पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! मध्य रेल्वेकडून विशेष गाड्यांचे आयोजन

सोलापूर: येत्या काही दिवसांत पंढरपूर येथे कार्तिकी वारीचा सोहळा रंगणार आहे. यासाठी विविध राज्यातून वारकऱ्यांचा