बोरी बुद्रुक वीज उपकेंद्राचे काम सहा महिन्यांत पूर्ण करा

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आदेश


पुणे : जुन्नर तालुक्यातील बोरी बुद्रुक येथील महावितरणच्या वीज उपकेंद्राचे काम सहा महिन्यांत पूर्ण करण्यात यावे, त्यासाठी महावितरणच्या अधिकाऱ्यांनी विशेष लक्ष द्यावे,’ असा आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला.


महावितरणच्या मंचर विभागातील बोरी बुद्रुक येथे होणाऱ्या वीज उपकेंद्राचे भूमिपूजन उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते. आमदार दिलीप वळसे पाटील, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, माजी आमदार अतुल बेनके, तसेच सत्यशील शेरकर, सरपंच वनिता डेरे, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, महावितरणचे प्रादेशिक संचालक भुजंग खंदारे, पुणे विभागाचे मुख्य अभियंता सुनील काकडे उपस्थित होते.


जुन्नर तालुक्यातील बोरी बुद्रुक आणि परिसरातील गावे, वाड्या-वस्त्यांना महावितरणच्या शिरोली येथील ३३/११ केव्ही उपकेंद्राद्वारे वीजपुरवठा करण्यात येतो. मात्र, शिरोलीचे उपकेंद्र अतिभारित होत असल्याने वीजपुरवठा कमी दाबाने होत आहे. त्यामुळे वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रमाणही अधिक आहे. त्यावर उपाय म्हणून बोरी बुद्रुक येथे ‘कृषी धोरण २०२०’ या योजनेतून ९ कोटी ८६ लाख रुपये खर्च करून नवीन उपकेंद्र उभारण्यात येत आहे. या उपकेंद्रातून ११ केव्हीच्या ६ वीजवाहिन्या निघणार आहेत. त्याद्वारे बोरी बुद्रुक, बोरी खुर्द, कोरडेमळा, माळवाडी, साईनगर गावठाण, शिंदेमळा, बोरी खुर्द गावठाण, वसईमळा, तसेच वाड्या-वस्त्यांना सुरळीत वीज पुरवठा होणार असल्याची माहिती महावितरणकडून देण्यात आली.

Comments
Add Comment

OBC Reservation: ओबीसी आरक्षण बचावासाठी बीडमध्ये दुसरी आत्महत्या

छत्रपती संभाजीनगर: ओबीसी समाजाच्या आरक्षणामधली घुसखोरी थांबविली पाहीजे या साठी बीड मध्ये दुसरी आत्महत्या

अचानक येऊन पाहणी करा, पुणेकर महिलेची अजित पवारांकडे मागणी

पुणे : वाहनांची वाढती संख्या विचारात घेता रस्ते रुंद करण्यावर शासनाचा भर आहे, वाढत्या वाहनामुळे वाहतूक कोंडी

कॉल सेंटरमध्ये बेकायदेशीर उद्योग! सीबीआयने आवळल्या मुसक्या, केली मोठी कारवाई

कल्याण: सीबीआयने अलिकडेच महाराष्ट्रातील नाशिक आणि कल्याणमधील इगतपुरी येथील एक बेकायदेशीर कॉल सेंटरचा भंडाफोड

भारत - पाकिस्तान सामन्यावरुन मविआत बेबनाव

नाशिक : आशिया चषक टी २० क्रिकेट स्पर्धेच्या साखळी सामन्यात आज भारत आणि पाकिस्तान दुबईत आमनेसामने असतील. हा सामना

बीएसएनएलची टॉवर उभारण्याची योजना का मंदावली? २,७५१ ऐवजी केवळ ९३० गावांमध्येच टॉवर उभारणार!

बीएसएनएल '४जी' साठी ९३० गावांमध्ये जमीन देण्यास महाराष्ट्र सरकारची मंजुरी मुंबई: ग्रामीण आणि दुर्गम भागांमध्ये

Satara Gazette: जरांगे पाटलांची ती मागणी सुद्धा होणार मान्य, मराठा समाजाला दिलासा!

सातारा गॅझेट लागू करण्यासंदर्भात सरकारी हालचालींना सुरुवात  मुंबई: मराठा समाजाला आणखीन एक दिलासा देणारी बातमी