बोरी बुद्रुक वीज उपकेंद्राचे काम सहा महिन्यांत पूर्ण करा

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आदेश


पुणे : जुन्नर तालुक्यातील बोरी बुद्रुक येथील महावितरणच्या वीज उपकेंद्राचे काम सहा महिन्यांत पूर्ण करण्यात यावे, त्यासाठी महावितरणच्या अधिकाऱ्यांनी विशेष लक्ष द्यावे,’ असा आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला.


महावितरणच्या मंचर विभागातील बोरी बुद्रुक येथे होणाऱ्या वीज उपकेंद्राचे भूमिपूजन उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते. आमदार दिलीप वळसे पाटील, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, माजी आमदार अतुल बेनके, तसेच सत्यशील शेरकर, सरपंच वनिता डेरे, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, महावितरणचे प्रादेशिक संचालक भुजंग खंदारे, पुणे विभागाचे मुख्य अभियंता सुनील काकडे उपस्थित होते.


जुन्नर तालुक्यातील बोरी बुद्रुक आणि परिसरातील गावे, वाड्या-वस्त्यांना महावितरणच्या शिरोली येथील ३३/११ केव्ही उपकेंद्राद्वारे वीजपुरवठा करण्यात येतो. मात्र, शिरोलीचे उपकेंद्र अतिभारित होत असल्याने वीजपुरवठा कमी दाबाने होत आहे. त्यामुळे वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रमाणही अधिक आहे. त्यावर उपाय म्हणून बोरी बुद्रुक येथे ‘कृषी धोरण २०२०’ या योजनेतून ९ कोटी ८६ लाख रुपये खर्च करून नवीन उपकेंद्र उभारण्यात येत आहे. या उपकेंद्रातून ११ केव्हीच्या ६ वीजवाहिन्या निघणार आहेत. त्याद्वारे बोरी बुद्रुक, बोरी खुर्द, कोरडेमळा, माळवाडी, साईनगर गावठाण, शिंदेमळा, बोरी खुर्द गावठाण, वसईमळा, तसेच वाड्या-वस्त्यांना सुरळीत वीज पुरवठा होणार असल्याची माहिती महावितरणकडून देण्यात आली.

Comments
Add Comment

नागपूर AIMS मधील विद्यार्थ्यांच्या जेवणात आढळल्या चक्क अळ्या..... सोशल मीडियावर चर्चेला उधाण

नागपूर : अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी आपल्या घरापासून दूर असतात. अशावेळी जेवणाची सोय होते ती खाणावळीतून किंवा

Pune ZP News : पुणे : राजकीय हालचालींना वेग; अध्यक्षपदाची खुर्ची कोणाची? निवडीची तारीख ठरली

पुणे : राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांचा धुराळा शांत झाल्यानंतर आता खऱ्या

DA Hike: राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ

मुंबई: राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वीच मोठी आनंदवार्ता जाहीर करण्यात आली आहे.

राज्यात रस्ता अपघाती मृत्यूंमध्ये ८ टक्क्यांची घट; परिवहन विभागाकडून आकडेवारी जाहीर

- २०३० पर्यंत अपघात निम्म्यावर आणण्याचे परिवहन विभागाचे उद्दिष्ट मुंबई : राज्यात रस्ता सुरक्षेसाठी परिवहन

भिगवण प्रकरणात मोठा ट्विस्ट; पाच दिवसात तरुणीने बदलला निर्णय

पुणे : महाष्ट्राभर चर्चा असलेल्या भिगवण प्रकरणात अनेक दावे , प्रतिदावे समोर येत होते, पण आता स्वतः मुलीनेच

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाकडून ४२ मौलिक ग्रंथांचे प्रकाशन

मुंबई : मराठी भाषा गौरव दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळातर्फे यंदा ४२ मौलिक ग्रंथांचे