कर्जतमध्ये वाहतूक कोंडीमुळे नागरिक त्रस्त;पर्यायी रिंग रोडची चालकांची मागणी

कर्जत :कर्जत शहरात शनिवारी दिवसभर मुख्य रस्त्यावर अनेकदा मोठी वाहतूक कोंडी घडली.दीड किलोमीटरच्या अंतरात तब्बल अर्धा-अर्धा तास वाहने अडकून पडली होती.त्यात दुपारी मुसळधार पावसाने रस्त्यावर पाणी साठल्याने आणखीच भर पडली.शनिवारी लग्न तिथी पण मोठी असल्याने वाहनांची संख्या रस्त्यावर अधिक होती.


कर्जत शहरात मागील आठ दिवसांपासून सतत वाहतूक कोंडी जाणवत आहे. सकाळपासूनच नगर-बारामती मुख्य रस्ता, छत्रपती शिवाजी महाराज चौक ते कुळधरण रोड आणि अंतर्गत रोड देखील अनेक वेळा जाम झाले होते. दुपारी अडीच वाजता अवकाळी मुसळधार पावसाळा सुरुवात झाल्याने रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी वाहिल्याने सखल भागात जलाशयाचे स्वरूप आले होते. त्याने वाहतुक कोंडीत आणखीच भर पडली. शहरातून तब्बल दीड किलोमीटर अंतर पार करण्यासाठी अर्धा-अर्धा तास वाहनांना वेळ लागला. तिन्ही रस्त्यावर वाहनांच्या दुतर्फा रांगा दिवसभर पाहायला मिळाल्या. त्यात शनिवारी लग्न तिथी मोठ्या असल्याने बाहेरील वाहनांची संख्या अधिक होती.


त्यामुळे वारंवार वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली.अनेक वर्षांपासून कर्जतला पर्याय रिंगरोडची मागणी वाहन चालकांमधून पुढे येत आहे. मात्र यावर प्रशासन ठोस उपाययोजना करण्याची मानसिकतेमध्ये दिसून येत नाही. त्यामुळे कर्जतकरांना वाहतूक कोंडी नित्याचीच झाली आहे.

Comments
Add Comment

Ishwarpur Name : मोठी बातमी, 'इस्लामपूर नव्हे, ईश्वरपूर! अखेर केंद्र सरकारचा नामकरणाच्या प्रस्तावावर शिक्कामोर्तब, पत्र जारी

सांगली : सांगली जिल्ह्यातील (Sangli District) इस्लामपूर (Islampur) शहराच्या नामकरणाच्या प्रस्तावाला अखेर केंद्र सरकारची (Central Government)

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग आता दहा पदरी! 'एमएसआरडीसी' लवकरच राज्य सरकारकडे प्रस्ताव पाठवणार

मुंबई : महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) मुंबई–पुणे द्रुतगती मार्गाचे आठऐवजी दहा पदरीकरण

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी प्रदूषणात सरासरी ११.१ टक्के वाढ

ठाणे : नागरिकांनी याही वर्षी दिवाळी सण उत्साहाने साजरा केला असून याकाळात फटाके वाजण्याच्या प्रमाणातही वाढ

‘संरक्षण व एरोस्पेस उत्पादनाचे प्रमुख केंद्र म्हणून नागपूरची आता नवी ओळख’

नागपूर : सोलर डिफेन्स अँड एरोस्पेस ही भारतातील अग्रगण्य उत्पादक कंपनी नागपूर येथे विस्तार करीत आहे. या

Ladki Bahin Yojana : मोठी बातमी! लाडक्या बहिणींची नाराजी दूर, ७० लाख महिलांच्या अपात्रतेची भीती टळली; e-KYCच्या ‘त्या’ निर्णयाला राज्य सरकारची स्थगिती

मुंबई : राज्यातील महिलांमध्ये लोकप्रिय ठरलेली 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजना (Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana) पुन्हा एकदा

लाडक्या बहिणींच्या ‘ई-केवायसी’ला ब्रेक; ऑक्टोबरचा लाभ पुढील आठवड्यात

सोलापूर : विधानसभा निवडणुकीत लाडक्या बहिणींमुळे महायुतीची राज्यात सत्ता आली. त्या लाडक्या बहिणींची नाराजी आता