कर्जतमध्ये वाहतूक कोंडीमुळे नागरिक त्रस्त;पर्यायी रिंग रोडची चालकांची मागणी

कर्जत :कर्जत शहरात शनिवारी दिवसभर मुख्य रस्त्यावर अनेकदा मोठी वाहतूक कोंडी घडली.दीड किलोमीटरच्या अंतरात तब्बल अर्धा-अर्धा तास वाहने अडकून पडली होती.त्यात दुपारी मुसळधार पावसाने रस्त्यावर पाणी साठल्याने आणखीच भर पडली.शनिवारी लग्न तिथी पण मोठी असल्याने वाहनांची संख्या रस्त्यावर अधिक होती.


कर्जत शहरात मागील आठ दिवसांपासून सतत वाहतूक कोंडी जाणवत आहे. सकाळपासूनच नगर-बारामती मुख्य रस्ता, छत्रपती शिवाजी महाराज चौक ते कुळधरण रोड आणि अंतर्गत रोड देखील अनेक वेळा जाम झाले होते. दुपारी अडीच वाजता अवकाळी मुसळधार पावसाळा सुरुवात झाल्याने रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी वाहिल्याने सखल भागात जलाशयाचे स्वरूप आले होते. त्याने वाहतुक कोंडीत आणखीच भर पडली. शहरातून तब्बल दीड किलोमीटर अंतर पार करण्यासाठी अर्धा-अर्धा तास वाहनांना वेळ लागला. तिन्ही रस्त्यावर वाहनांच्या दुतर्फा रांगा दिवसभर पाहायला मिळाल्या. त्यात शनिवारी लग्न तिथी मोठ्या असल्याने बाहेरील वाहनांची संख्या अधिक होती.


त्यामुळे वारंवार वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली.अनेक वर्षांपासून कर्जतला पर्याय रिंगरोडची मागणी वाहन चालकांमधून पुढे येत आहे. मात्र यावर प्रशासन ठोस उपाययोजना करण्याची मानसिकतेमध्ये दिसून येत नाही. त्यामुळे कर्जतकरांना वाहतूक कोंडी नित्याचीच झाली आहे.

Comments
Add Comment

पुण्यातील जि.प. शाळेला ब्रिटनचा सर्वोत्कृष्ट शाळेचा पुरस्कार

ब्रिटनस्थित ‘टी४ एज्युकेशन’ संस्थेने जालिंदरनगर (ता.खेड, जि. पुणे) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची ‘२०२५

What is E-Bond : आजपासून 'कागदी बाँड' हद्दपार! महसूलमंत्र्यांच्या निर्णयामुळे ई-बॉण्डची एन्ट्री; वाचा काय आहे ई-बॉण्ड?

मुंबई : महाराष्ट्रातील आयातदार आणि निर्यातदारांसाठी एक अत्यंत महत्त्वाचा आणि मोठा निर्णय राज्य सरकारने घेतला

दसऱ्याच्या मुहूर्तावर ठाण्यात वाहन खरेदीचा उत्साह, आरटीओमध्ये ४ हजार २२६ वाहनांची नोंदणी

caठाणे (वार्ताहर) : शहरभर नवरात्री आणि दसऱ्याच्या मुहूर्तावर वाहन खरेदीसाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने धाव

गणपतीपुळे संस्थानकडून पूरग्रस्तांसाठी ४२ लाखाची मदत

रत्नागिरी : श्रीक्षेत्र गणपतीपुळे संस्थानकडून मराठवाड्यातील महापुरातील नुकसानग्रस्तांकरिता ४२ लाखाची मदत

'ठाकरें'ना दसऱ्यालाच मोठा झटका! ठाकरे गटाला धक्क्यावर धक्के, कोकणातील नेता शिंदे गटात दाखल

दसऱ्यादिवशीच मेळाव्यातच केला प्रवेश; कोकणातील माजी आमदार राजन तेली यांचा प्रवेश मुंबई: शिवसेना (उद्धव

जरांगेच्या डोक्यात शिजतंय काय? मराठ्यांपाठोपाठ आता शेतक-यांचा मसिहा बनणार, बघा कोणत्या केल्या मागण्या

मनोज जरांगेंची सरकारकडे ८ मोठ्या मागण्यांची यादी, शेतकऱ्याला दरमहा १०,००० पगार ते संपूर्ण कर्जमाफी जरांगेंचा