कर्जतमध्ये वाहतूक कोंडीमुळे नागरिक त्रस्त;पर्यायी रिंग रोडची चालकांची मागणी

कर्जत :कर्जत शहरात शनिवारी दिवसभर मुख्य रस्त्यावर अनेकदा मोठी वाहतूक कोंडी घडली.दीड किलोमीटरच्या अंतरात तब्बल अर्धा-अर्धा तास वाहने अडकून पडली होती.त्यात दुपारी मुसळधार पावसाने रस्त्यावर पाणी साठल्याने आणखीच भर पडली.शनिवारी लग्न तिथी पण मोठी असल्याने वाहनांची संख्या रस्त्यावर अधिक होती.


कर्जत शहरात मागील आठ दिवसांपासून सतत वाहतूक कोंडी जाणवत आहे. सकाळपासूनच नगर-बारामती मुख्य रस्ता, छत्रपती शिवाजी महाराज चौक ते कुळधरण रोड आणि अंतर्गत रोड देखील अनेक वेळा जाम झाले होते. दुपारी अडीच वाजता अवकाळी मुसळधार पावसाळा सुरुवात झाल्याने रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी वाहिल्याने सखल भागात जलाशयाचे स्वरूप आले होते. त्याने वाहतुक कोंडीत आणखीच भर पडली. शहरातून तब्बल दीड किलोमीटर अंतर पार करण्यासाठी अर्धा-अर्धा तास वाहनांना वेळ लागला. तिन्ही रस्त्यावर वाहनांच्या दुतर्फा रांगा दिवसभर पाहायला मिळाल्या. त्यात शनिवारी लग्न तिथी मोठ्या असल्याने बाहेरील वाहनांची संख्या अधिक होती.


त्यामुळे वारंवार वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली.अनेक वर्षांपासून कर्जतला पर्याय रिंगरोडची मागणी वाहन चालकांमधून पुढे येत आहे. मात्र यावर प्रशासन ठोस उपाययोजना करण्याची मानसिकतेमध्ये दिसून येत नाही. त्यामुळे कर्जतकरांना वाहतूक कोंडी नित्याचीच झाली आहे.

Comments
Add Comment

नागपूर AIMS मधील विद्यार्थ्यांच्या जेवणात आढळल्या चक्क अळ्या..... सोशल मीडियावर चर्चेला उधाण

नागपूर : अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी आपल्या घरापासून दूर असतात. अशावेळी जेवणाची सोय होते ती खाणावळीतून किंवा

Pune ZP News : पुणे : राजकीय हालचालींना वेग; अध्यक्षपदाची खुर्ची कोणाची? निवडीची तारीख ठरली

पुणे : राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांचा धुराळा शांत झाल्यानंतर आता खऱ्या

DA Hike: राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ

मुंबई: राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वीच मोठी आनंदवार्ता जाहीर करण्यात आली आहे.

राज्यात रस्ता अपघाती मृत्यूंमध्ये ८ टक्क्यांची घट; परिवहन विभागाकडून आकडेवारी जाहीर

- २०३० पर्यंत अपघात निम्म्यावर आणण्याचे परिवहन विभागाचे उद्दिष्ट मुंबई : राज्यात रस्ता सुरक्षेसाठी परिवहन

भिगवण प्रकरणात मोठा ट्विस्ट; पाच दिवसात तरुणीने बदलला निर्णय

पुणे : महाष्ट्राभर चर्चा असलेल्या भिगवण प्रकरणात अनेक दावे , प्रतिदावे समोर येत होते, पण आता स्वतः मुलीनेच

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाकडून ४२ मौलिक ग्रंथांचे प्रकाशन

मुंबई : मराठी भाषा गौरव दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळातर्फे यंदा ४२ मौलिक ग्रंथांचे