बेलापूरमध्ये तीन बिबट्यांच्या हल्ल्यात १४ मेंढ्यांचा मृत्यू

अकोले:तालुक्यातील पठार भागातील बेलापूर परिसरातील एका मेंढपाळाच्या मेंढ्यावर बछड्यासह तीन बिबट्यांनी हल्ला करून १४ मेंढ्या ठार केल्या. बेलापूर परिसरातील काठडी मळ्यात ही घटना घडली. मेंढ्यावर हल्लाबोल करताना भेदरलेल्या मेंढ्यानी आरडाओरड केल्याने स्थानिक नागरिक मदतीसाठी धावून गेले. नंतर बिबट्यांनी भक्ष्य सोडून जंगलाकडे धूम ठोकली. मात्र एका बिबट्याने या जमावाला न जुमानता एक साक्ज आपल्या जबड्यात पकडून सोबत नेलेच. बेलापूर गावात मेंढपाळ संतोष मोहन बरकडे (रा. चोंबूत ता. पारनेर) हे वडिलोपार्जित मेंढपाळ व्यवसाय सांभाळत काठडी मळ्यात तात्पुरते वास्तव्यास आहेत.


बेलापूर गावच्या परिसरात संतोष बरकडे हे कुटुंबासह मेंढ्या चारण्याचे काम करतात. मेंढपाळ बरकडे यांनी बेलापूर परिसरातून मेंढ्या चारून सायंकाळी विश्रांतीसाठी काठडी मळ्यातील शेतकऱ्यांच्या खासगी क्षेत्रांत आपल्या मेंढ्याचा वाडा टाकला. त्यांनी मेंढ्यांना वाघूरी लावले व कुटुंबासमवेत जेवण करत होते. यापूर्वदिखील बिबट्याने या मेंढपाळच्या मेंढ्यावर १५ दिवसांपूर्वी हल्ला केला होता. या हल्ल्यात बिबट्याने एक मेंढी ठार केली होती. आता पुनः रात्री ११ च्या सुमारास बिबट्यांनी मेढ्यावर हल्लाबोल केला. यावेळी दोन बिबटे व एक बछडा एकत्रित सोबत होते. बरकडे यांनी नेहमीप्रमाणेच वाघुर लावली होती, पण शिकारीत तरबेज बिबट्यांनी वाघुर खालून मेंढ्यांच्या कळपात प्रवेश केला. वाघुरात अडकलेल्या मेंढ्यांवर बछड्यासह तिन्ही बिबट्यांनी ताव मारायला सुरुवात केली.


दरम्यान, मेंढ्याचे ओरडण्याचा आवाज ऐकून बरकडे कुटुंबाला जाग आली. मात्र, समोर बछड्यासह दोन भले मोठे बिबटे पाहून तेही घाबरले. त्यांच्यासोबत लहान मुले असल्याने संपूर्ण कुटुंबच समोरचा अनाकलनीय प्रकार पाहून भयभीत झाले. प्रसंगावधान राखून त्यांनीही मदतीसाठी आरडाओरडा केला. त्यानंतर लोक धावून आले. जमावाला पाहून बछड्यासह बिबट्यांनी तेथून धूम ठोकली. मात्र, एकाने जाताना मेंढी जबड्यात पकडून डोंगराच्या दिशेने जंगलात नेली. बिबट्यांनी १४ मेंढ्या ठार केल्या, वनरक्षक दीपक शिंदे, वनमजूर अशोक उघडे, नितीन वारे यांनी या घटनेची माहिती वरिष्ठांना दिली. ठार झालेल्या मेढ्याचे पंचनामे करून
अहवाल पाठविला.

Comments
Add Comment

मतमोजणी २१ डिसेंबरलाच! नागपूर खंडपीठाने दिलेल्या निर्णयावर सुप्रीम कोर्टाचा शिक्कामोर्तब

नवी दिल्ली: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या पहिल्या टप्प्यातील मतदान पूर्ण झाले. ज्यामध्ये

पाच हजार कोटींच्या कांदा घोटाळ्याची चौकशी सुरू

मुंबई  : केंद्र सरकारने किंमत स्थिरीकरण योजनेअंतर्गत नाफेड आणि एनसीसीएफला फार्मर प्रोड्युसर कंपन्यांकडून

राज्यातील निवडणूक वादावर आज 'सर्वोच्च' सुनावणी! नागपूर खंडपीठाच्या निर्णयाला स्थगिती मिळणार?

नवी दिल्ली: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या पहिल्या टप्प्यातील मतदान पूर्ण झाले. ज्यामध्ये

चंद्रपूर-यवतमाळ एसटीला अपघात

करंजी : करंजीजवळ महाराष्ट्र परिवहन महामंडळाच्या एसटी बसला झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला आणि दहा जण गंभीर

हॉलतिकीट नाही म्हणून परीक्षा नाही, विद्यार्थी गेले थेट पोलीस ठाण्यात ; धक्कादायक परीक्षा व्यवस्थापन

छत्रपती संभाजीनगर : मास्टर ऑफ कॉम्प्युटर अ‍ॅप्लिकेशनच्या (एमसीए) विद्यार्थ्यांना हॉलिकीट मिळाले नाही. यामुळे हे

उद्या मुंबईतील शाळांना सुट्टी; शाळा बंद आंदोलनाला मुंबई मुख्याध्यापक संघटनेचा जाहीर पाठिंबा

मुंबई: राज्यातील शिक्षक बांधवांच्या हक्कासाठी महाराष्ट्र राज्य शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी समन्वय