बेलापूरमध्ये तीन बिबट्यांच्या हल्ल्यात १४ मेंढ्यांचा मृत्यू

  30

अकोले:तालुक्यातील पठार भागातील बेलापूर परिसरातील एका मेंढपाळाच्या मेंढ्यावर बछड्यासह तीन बिबट्यांनी हल्ला करून १४ मेंढ्या ठार केल्या. बेलापूर परिसरातील काठडी मळ्यात ही घटना घडली. मेंढ्यावर हल्लाबोल करताना भेदरलेल्या मेंढ्यानी आरडाओरड केल्याने स्थानिक नागरिक मदतीसाठी धावून गेले. नंतर बिबट्यांनी भक्ष्य सोडून जंगलाकडे धूम ठोकली. मात्र एका बिबट्याने या जमावाला न जुमानता एक साक्ज आपल्या जबड्यात पकडून सोबत नेलेच. बेलापूर गावात मेंढपाळ संतोष मोहन बरकडे (रा. चोंबूत ता. पारनेर) हे वडिलोपार्जित मेंढपाळ व्यवसाय सांभाळत काठडी मळ्यात तात्पुरते वास्तव्यास आहेत.


बेलापूर गावच्या परिसरात संतोष बरकडे हे कुटुंबासह मेंढ्या चारण्याचे काम करतात. मेंढपाळ बरकडे यांनी बेलापूर परिसरातून मेंढ्या चारून सायंकाळी विश्रांतीसाठी काठडी मळ्यातील शेतकऱ्यांच्या खासगी क्षेत्रांत आपल्या मेंढ्याचा वाडा टाकला. त्यांनी मेंढ्यांना वाघूरी लावले व कुटुंबासमवेत जेवण करत होते. यापूर्वदिखील बिबट्याने या मेंढपाळच्या मेंढ्यावर १५ दिवसांपूर्वी हल्ला केला होता. या हल्ल्यात बिबट्याने एक मेंढी ठार केली होती. आता पुनः रात्री ११ च्या सुमारास बिबट्यांनी मेढ्यावर हल्लाबोल केला. यावेळी दोन बिबटे व एक बछडा एकत्रित सोबत होते. बरकडे यांनी नेहमीप्रमाणेच वाघुर लावली होती, पण शिकारीत तरबेज बिबट्यांनी वाघुर खालून मेंढ्यांच्या कळपात प्रवेश केला. वाघुरात अडकलेल्या मेंढ्यांवर बछड्यासह तिन्ही बिबट्यांनी ताव मारायला सुरुवात केली.


दरम्यान, मेंढ्याचे ओरडण्याचा आवाज ऐकून बरकडे कुटुंबाला जाग आली. मात्र, समोर बछड्यासह दोन भले मोठे बिबटे पाहून तेही घाबरले. त्यांच्यासोबत लहान मुले असल्याने संपूर्ण कुटुंबच समोरचा अनाकलनीय प्रकार पाहून भयभीत झाले. प्रसंगावधान राखून त्यांनीही मदतीसाठी आरडाओरडा केला. त्यानंतर लोक धावून आले. जमावाला पाहून बछड्यासह बिबट्यांनी तेथून धूम ठोकली. मात्र, एकाने जाताना मेंढी जबड्यात पकडून डोंगराच्या दिशेने जंगलात नेली. बिबट्यांनी १४ मेंढ्या ठार केल्या, वनरक्षक दीपक शिंदे, वनमजूर अशोक उघडे, नितीन वारे यांनी या घटनेची माहिती वरिष्ठांना दिली. ठार झालेल्या मेढ्याचे पंचनामे करून
अहवाल पाठविला.

Comments
Add Comment

Chandrashekhar Bawankule: मर्सिडीजमधून फिरणाऱ्या, आणि फार्म हाऊसवाल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही; महसूलमंत्री बावनकुळे स्पष्टच बोलले

अमरावती: राज्यात शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची मागणी जोर धरत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या

ST : विना तिकिट प्रवास करणाऱ्यांवर कारवाई, एसटीने वसूल केला ३ लाखांचा दंड...

पुणे : विना तिकिट प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर एसटी महामंडळाने कारवाई करण्यासाठी सुरवात केली आहे. २०२४-२०२५ या

Samruddhi Mahamarg Accident : समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, आलिशान मर्सिडीजने ३ वेळा पलटी घेतली अन्...;

नाशिकच्या प्रसिद्ध उद्योजकाचा मृत्यू नागपूर : समृद्धी महामार्गावर (Samruddhi Mahamarg) भीषण अपघाताची (Accident News) आणखी एक घटना

Pandharpur Vitthal Mandir: आषाढी वारीनिमित्त विठुरायाचं आजपासून २४ तास दर्शन सुरू

पंढरपूर: पंढरपूरची वारी हा महाराष्ट्रातील एक महत्त्वपूर्ण धार्मिक आणि सांस्कृतिक उत्सव असतो. या वारीत

Pune Airport: प्रवाशांना घेऊन विमान पुण्यात तर आलं, पण सामान मागेच राहीलं!

स्पाइसजेटच्या दुबई-पुणे विमानाने इंधन भारामुळे प्रवाशांचे सामान न घेताच पुण्यात लँडिंग केले.  पुणे:  दुबईहून

जिओमध्ये गुंतवणूक ही माझ्या आयुष्यातली मोठी रिस्क : मुकेश अंबानी

रिलायन्स आता डीप-टेक, अ‍ॅडव्हान्स मॅन्युफॅक्चरिंग कंपनी बनण्याच्या मार्गावर मुंबई  : टेलिकॉम क्षेत्रातील