पवई तलावातील पक्ष्यांचा अधिवास धोक्यात

जलपर्णी काढण्याच्या कामामुळे पक्ष्यांची अंडी उबवण्यात अडसर


मुंबई : गत सहा महिन्यांत सुमारे २५ हजार मेट्रिक टन इतकी जलपर्णी हटविण्यात आली आहे. मात्र, पवई तलावात येथे कांस्यपंखी कमळपक्षी आणि जांभळी पाणकोंबडी यांचा अधिवास आहे. सामान्यपणे दरवर्षी जून ते सप्टेंबरपर्यंतचा कालावधी हा या पक्ष्यांचा प्रजोत्पादन तथा विणीचा हंगाम म्हणून ओळखला जातो. जलपर्णी काढण्याच्या कामामुळे या पक्ष्यांनी घातलेली अंडी उबवण्यात अडसर निर्माण होवू शकतो, पर्यायाने त्यांचा नैसर्गिक अधिवास धोक्यात येवू शकतो, असे मतप्रदर्शन बी.एन.एच. एस.प्रतिनिधींनी नोंदविले आहे.


पवई तलावातील जलपर्णी, तरंगत्या वनस्पती काढण्याची कार्यवाही सुरु आहे. गत सहा महिन्यांत सुमारे २५ हजार मेट्रिक टन इतकी जलपर्णी हटविण्यात आली आहे. तरीही, जलपर्णी वाढीचा वेग अधिक असल्याने ती तलाव क्षेत्रात मोठ्या प्रमाणात फोफावली आहे. ज्या गतीने जलपर्णी काढली जात आहे, त्यापेक्षा कित्येक पट अधिक गतीने जलपर्णी वाढत आहे. एकूणच, जलपर्णीच्या आच्छादनात वाढ झाल्याचे दिसून येत आहे. पवई तलावात सांडपाणी, मलजल मिसळत असल्याने जलपर्णी मोठ्या प्रमाणावर फोफावते. त्याला प्रतिबंध करण्यासाठी मलजल वाहिन्या अन्यत्र वळविणे हाच कायमस्वरूपी तोडगा आहे. जोपर्यंत मलजल वाहिन्या वळविण्याचे काम पूर्ण होणार नाही, तोपर्यंत जलपर्णी काढण्याची गती अधिक वाढविणे आवश्यक असल्याचे अभिजीत बांगर यांनी नमूद केले होते.



आजमितीला पवई तलावातील जलपर्णी काढण्याची कार्यवाही २ मशिनद्वारे सुरू आहे. ती अधिक प्रभावी होण्यासाठी तात्काळ ५ मशिन्स माध्यमातून जलपर्णी काढण्याचे काम सुरू करावे. त्यासाठी दोन सत्रांमध्ये (शिफ्ट) अधिकचे मनुष्यबळ वापरून जलपर्णी हटविण्याच्या कार्यवाहीस अधिक वेग देण्यात येणार आहे. पावसाळ्यानंतर ६ मशिन्स तैनात करावीत. जलपर्णी काढल्यानंतर डम्पिंग ग्राउंडवर विनाविलंब विल्हेवाट लावली जाणार आहे.

पवई तलाव येथे कांस्यपंखी कमळपक्षी आणि जांभळी पाणकोंबडी यांचा अधिवास आहे. सामान्यपणे दरवर्षी जून ते सप्टेंबरपर्यंतचा कालावधी हा या पक्ष्यांचा प्रजोत्पादन तथा विणीचा हंगाम म्हणून ओळखला जातो. जलपर्णी काढण्याच्या कामामुळे या पक्ष्यांनी घातलेली अंडी उबवण्यात अडसर निर्माण होवू शकतो, असे मतप्रदर्शन बी.एन.एच. एस.प्रतिनिधींनी नोंदविले.

Comments
Add Comment

X अर्थात Twitter बंद पडलं, युझर त्रस्त

मुंबई : सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स (X) जो आधी ट्विटर (Twitter) या नावाने ओळखला जात होता तो शुक्रवार १६ जानेवारी २०२६ रोजी

काँग्रेसमुळे मुंबईत ठाकरे बंधूंच्या ७ जागा पडल्या

मुंबई : ज्या काँग्रेसपायी उबाठाने भाजपशी नाते तोडले, त्याच काँग्रेसमुळे मुंबई पालिका निवडणुकीत त्यांना ७

भावनिक आवाहनाला न फसता महाराष्ट्राच्या विकासाला मतदारांची पसंती - भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण

मुंबई : वर्षानुवर्षे भाजपा कार्यकर्त्याने यशाच्या दिशेने पार्टीला नेण्याचे स्वप्न पाहिले आणि ते स्वप्न साकार

BMC Election 2026 : भाजपची ऐतिहासिक मुसंडी तर ठाकरे, काँग्रेसचं काय? २९ महापालिकांच्या रणसंग्रामाचे 'A to Z' अपडेट्स!

मुंबई : भाजपचे निर्विवाद वर्चस्व राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने (भाजप) दणदणीत

 कॅबिनेट मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी मलबार हिलचा गड राखला, भाजपाचे पाचही उमेदवार विजयी - मलबार हिल मध्ये कार्यकर्त्यांचा जल्लोष

मुंबई : राज्याचे कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दक्षिण मुंबईतला आपला मलबार हिलचा गड राखला आहे. त्यांच्या

BMC Election 2026 : शरद पवारांच्या राष्ट्रवादीची २९ पैकी १४ महापालिकेत घसरगुंडी! पुणे-पिंपरी चिंचवडमध्येही भोपळा फुटला नाही

मुंबई : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांचा निकाल आज समोर येत असून, शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील