मुसळधार पावसातही तहानलेल्यांना १७० टँकरचा आधार

६५३ गाव-वाड्यातील तीन लाख नाशिककर पाण्यासाठी व्याकुळ


नाशिक :मे महिन्यात मुसळधार पाऊस कोसळत असतानाही टंचाईची तीव्रता कायम आहे. सद्यस्थितीत १२ तालुक्यातील ६५३ गाव-वाड्यांना १७० टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. जिल्ह्यातील तीन लाख लोक टँकरच्या पाण्यावर अवलंबून आहेत.


दोन आठवड्यांपासून जिल्ह्यात सुरू असलेल्या वळिवाच्या पावसाने जणू पावसाळा सुरू झाल्याची स्थिती आहे. शहरातील प्रमुख रस्ते व चौकांना तलावाचे स्वरुप प्राप्त होत आहे. यामुळे ग्रामीण भागातील पाणी टंचाईचे चटके काहिसे कमी होण्याची आशा पल्लवीत झाली आहे. सध्या १७९ गावे आणि ४७४ वाड्या अशा एकूण ६५३ ठिकाणी टँकरने पाणी द्यावे लागत असल्याचे ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने म्हटले आहे.



पाणी टंचाईची सर्वाधिक झळ नांदगाव तालुक्यास (१५३ गाव-वाडी) बसली. त्याखालोखाल येवला (१२५), सिन्नर (१००), इगतपुरी (७५), मालेगाव (५४), चांदवड (४२), पेठ(३०), त्र्यंबकेश्वर (२५), सुरगाणा(२३), देवळा (१२), कळवण (आठ), बागलाण तालुक्यात (सहा) गाव-वाड्यांचा समावेश आहे.



नाशिक, निफाड, दिंडोरी तालुके टँकरमुक्त 


१२ तालुक्यातील शेकडो गावांना पाणीटंचाईची झळ बसत असताना नाशिक, निफाड आणि दिंडोरी हे तीन तालुके मात्र संपूर्ण उन्हाळ्यात टँकरमुक्त राहिले आहेत. या भागातील एखाद्या गावाची तहान भागविण्यासाठी विहिरीचे अधिग्रहण करण्याची वेळ आलेली नसल्याचे ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या अहवालातून स्पष्ट झाले आहे.



जिल्ह्यात ७७ खासगी विहिरी अधिग्रहित


गावांची तहान भागविण्यासह टँकरसाठी जिल्ह्यात ७७ खासगी विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत. यात गावांसाठी १७, तर टँकरसाठी ६० विहिरींचा समावेश आहे. मालेगाव तालुक्यात सर्वाधिक १७, इगतपुरी १६, पेठ आठ, सुरगाणा सहा, बागलाण आणि येवल्यात प्रत्येकी तीन, चांदवड, देवळा, मालेगाव कळवण तालुक्यात प्रत्येकी दोन, सिन्नरमधील एका विहिरीचा समावेश आहे.

Comments
Add Comment

रस्त्यावरील व दुर्लक्षित बालकांच्या पुनर्वसनासाठी ‘फिरते पथक; मंत्री आदिती तटकरे

मुंबई :  रस्त्यावर राहणाऱ्या, अनाथ, एकल आणि दुर्लक्षित बालकांच्या पुनर्वसनासाठी ‘फिरते पथक’ पथदर्शी योजना सहा

IPL 2026 : आरसीबीसाठी दिलासादायक बातमी! विराट कोहलीचा ओपनिंग पार्टनर प्लेऑफपूर्वी संघात परतणार...

RCB : आयपीएल २०२६ मध्ये अनेक खेळाडू दुखापतीमुळे संघातून बाहेर झाले आहेत. त्यामुळे संघांना त्याचा मोठा फटका बसला

अनुदानित खतांसोबत विना अनुदानित खतांची सक्तीची विक्री बंद

कृषी विभागाचा निर्णय; नियमभंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई होणार मुंबई : "राज्यात काही खत उत्पादक आणि पुरवठादार

टेक-महाइम्पॅक्ट परिषदेत पहिल्याच दिवशी १५० कोटींचे करार

मुंबई : राज्याच्या तंत्रज्ञान आणि औद्योगिक विकासाला मोठी गती देण्यासाठी ‘आयटी’ विभागाच्या वतीने बुधवारी

भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेत; कृषि मंत्री दत्तात्रय भरणे

द्राक्ष पिकाचा समावेश करण्याचे निर्देश मुंबई : राज्यातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळावा यासाठी

Riyan Parag :‘मी काहीही केलं तरी…’ रियान परागचा संताप अनावर; समालोचकांनाही दिला थेट इशारा

IPL 2026 : आयपीएल २०२६ मध्ये काल म्हणजेच मंगळवार, १९ मे रोजी राजस्थान रॉयल्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात जयपूरच्या